AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सकारात्मक : लातूरमध्ये सोयाबीनची आवकही वाढली अन् दरही, आता शेतकऱ्यांचीच भूमिकाच महत्वाची

ज्याची प्रतिक्षा गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून शेतकऱ्यांना होती त्या सोयाबीनच्या दराबाबत सकारात्मक चित्र सध्या दिसू लागले आहे. गेल्या दोन दिवसांपासून सोयाबीनच्या दरात वाढ होत आहे. तर शनिवारी सोयाबीनची आवकही वाढली होती. हंगामाच्या सुरवातीपासून दरात घट असल्याने शेतकऱ्यांच्या पदरी निराशा होती. पण दिवाळीनंतर चित्र हे बदलत आहे. शनिवारी सोयाबीनला पोटलीमध्ये 5350 चा दर मिळाला होता.

सकारात्मक : लातूरमध्ये सोयाबीनची आवकही वाढली अन् दरही, आता शेतकऱ्यांचीच भूमिकाच महत्वाची
लातूर कृषी उत्पन्न बाजार समिती
| Edited By: | Updated on: Nov 13, 2021 | 3:03 PM
Share

लातूर : ज्याची प्रतिक्षा गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून शेतकऱ्यांना होती त्या (Soybean prices) सोयाबीनच्या दराबाबत सकारात्मक चित्र सध्या दिसू लागले आहे. (Latur market) गेल्या दोन दिवसांपासून सोयाबीनच्या दरात वाढ होत आहे. तर शनिवारी सोयाबीनची (soybean arrivals) आवकही वाढली होती. हंगामाच्या सुरवातीपासून दरात घट असल्याने शेतकऱ्यांच्या पदरी निराशा होती. पण दिवाळीनंतर चित्र हे बदलत आहे. शनिवारी सोयाबीनला पोटलीमध्ये 5350 चा दर मिळाला होता. मुहुर्ताच्या दरानंतर हा सर्वाधिक दर मानला जात आहे. अशी वाढ होत गेली तर शेतकऱ्यांना अपेक्षित दर प्रत्यक्षात मिळेल आणि झालेले नुकसान भरुन काढण्यास हातभार लागेल अशी आशा शेतकरी व्यक्त करीत आहेत.

दिवाळीपूर्वी आणि नंतर सोयाबीनच्या बाजारपेठेत मोठे बदल झाले आहेत. याकरिता केंद्र सरकारचे धोरणही परिणामकारक असल्याचे व्यापारी म्हणत आहेत. कारण कडधान्यावरील साठा मर्यादेची मुदत ही 31 ऑक्टोंबर ही होती. त्यानंतर मात्र, कडधान्याची साठवणूक करायची की नाही याबाबत सरकारने खुलासाच केला नाही. मात्र, आता व्यापारी साठवणूकीवर भर देत आहेत. त्यामुळेच सोयाबीनच्या दरात वाढ होत असल्याचे चित्र आहे. मात्र, बऱ्याच प्रतिक्षेनंतर सोयाबीनच्या दरात सुधारणा होत आहे.

सलग दोन दिवस वाढले दर

दिवाळीनंतर सोयाबीनचे दर हे स्थिर होते. मात्र, शुक्रवारपासून दरात सुधारणा होत आहे. शुक्रवारी पोटलीत 5250 तर आज (शनिवारी) 5350 चा दर मिळालेला आहे. आतापर्यंत दर स्थिर राहिले तरी समाधान व्यक्त केले जात होते. पण आता दर दिवसागणिस वाढत असल्याने शनिवारी आवकही वाढली होती. हंगामाच्या सुरवातीला सोयाबीनला 11 हजार हा मुहूर्ताचा दर मिळाला होता. त्यामुळे शेतकऱ्यांच्या अपेक्षा ह्या वाढलेल्या होत्या. योग्य दर मिळत नाही तोपर्यंत मालाची साठवणूक करण्याचा निर्धारच शेतकऱ्यांनी केला होता.

दरच दर टिकून राहतील

शनिवारी सोयाबीनला सौद्यामध्ये 5630 चा भाव निघाला होता. मात्र, पोटलीत 5350 दर प्रत्यक्ष शेतकऱ्यांना मिळालेला आहे. मात्र, हाच दर टिकवून ठेवायचा असेल तर सोयाबीनची आवक एकदम न वाढू देता टप्प्याटप्प्याने आवक होणे गरजेचे आहे. आता 16 हजार क्विंटल सोयाबीनची आवक होत आहे. यापेक्षा अचानक आवक वाढली तर दर कमी होण्याचा धोका आहे. त्यामुळे आवक याच प्रमाणात राहणे तेवढेच महत्वाचे आहे.

इतर शेतीमालाचे कसे आहेत दर

लातूर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दुपारी 12 च्या दरम्यान शेतीमालाचे सौदे होतात. शनिवारी लाल तूर- 6100 रुपये क्विंटल, पांढरी तूर 5950 रुपये क्विंटल, पिंकू तूर 6050 रुपये क्विंटल, जानकी चना 5000 रुपये क्विंटल, विजय चणा 5200, चना मिल 4850, सोयाबीन 5630, चमकी मूग 7200, मिल मूग 6200 तर उडीदाचा दर 7150 एवढा राहिला होता.

संबंधित बातम्या :

डाळिंबाच्या दरात घट, फळबागायत शेतकऱ्यांचा साठवणुकीवरच भर

कृषीपंपाचे नुकसान टाळण्यासाठी ‘हे’ आहेत पर्याय, शेतकऱ्यांसाठी महत्वाचे

पुन्हा पावसाचा अंदाज, रब्बीसह खरिपातील पिकांची ‘अशी’ घ्या काळजी..!

भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.