AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सोयाबीनच्या दरात होतेय सुधारणा, शेतकऱ्यांना काय आहे मोलाचा सल्ला..?

अखेर दोन महिन्यानंतर का होईना सोयाबीनच्या दरात काही प्रमाणात सुधारणा होऊ लागली आहे. दिवाळीनंतर सोयाबीनच्या बाजारात सकारात्मक बदल दिसून येत आहेत. गेल्या चार दिवसांपासून दिवसाकाठी 100 ते 150 रुपयांची वाढ ही प्रति क्विंटलमागे होत आहे. मागणी वाढत असल्यामुळे हा बदल होत आहे.

सोयाबीनच्या दरात होतेय सुधारणा, शेतकऱ्यांना काय आहे मोलाचा सल्ला..?
सोयाबीनचे संग्रहीत छायाचित्र
| Edited By: राजेंद्र खराडे | Updated on: Nov 15, 2021 | 1:27 PM
Share

लातूर : अखेर दोन महिन्यानंतर का होईना ( Improvement in soybean prices) सोयाबीनच्या दरात काही प्रमाणात सुधारणा होऊ लागली आहे. दिवाळीनंतर सोयाबीनच्या बाजारात सकारात्मक बदल दिसून येत आहेत. गेल्या चार दिवसांपासून दिवसाकाठी 100 ते 150 रुपयांची वाढ ही प्रति क्विंटलमागे होत आहे. मागणी वाढत असल्यामुळे हा बदल होत आहे. मात्र, (benefits of storage to farmers) जर वाढत्या दराबरोबर आवक वाढली तर याचे विपरीत परिणाम बाजारावर होणार आहेत. त्यामुळे आता चित्र तर बदलले आहे. पण याचा लाभ कसा घ्यावयाचा याबाबत कृषी अधिकारी व्यापारी हे शेतकऱ्यांना काय सल्ला देत आहेत ते ही महत्वाचे आहे.

दर कायम ठेवण्यासाठी शेतकऱ्यांनी काय काळजी घ्यायला हवी हे आपण पाहणार आहोत. हंगामाच्या सुरवातीपासून सोयबीनच्या दरात घट होती. सोयाबीन हे खरिपातील मुख्य पिक असून शेतकऱ्यांचे अर्थकारण बदलण्यात या पिकाचा मोठा वाटा समजला जातो. पण घटत्या दरामुळे शेतकऱ्यांची चिंता ही वाढलेली होती. दिवाळीनंतर बाजारपेठेत बदल दिसत असून दरात वाढ होत आहे.

वेट अँड वॉच, फरक जाणवेल

सोयाबीनची आवक ही सुरवातीपासून कमीच राहिलेली आहे. लातूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दिवसाला 10 ते 15 हजार क्विंटलची आवक होत आहे. मात्र, मागणी वाढल्याने सोयाबीनच्या दरात सुधारणा होत आहे. अणखीन काही दिवस सोयाबीनची साठवणूक केली तर वाढत्या दराचा फायदा हा शेतकऱ्यांना होणार आहे. त्यामुळे अणखीन काही दिवस शेतकऱ्यांनी दर वाढीची वाट पाहणे गरजेचे असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणने आहे.

साठवणूकीचा होणार फायदा

हंगामाच्या सुरवातीपासूनच सोयाबीनला दर नसल्याने शेतकऱ्यांनी साठवणूकीवर भर दिलेला होता. काही शेतकऱ्यांनी तर यंदा प्रथमच शेती माल तारण योजनेचा फायदा घेतला होता. बाजारपेठेचे गणित कळल्याप्रमाणे शेतकरी हे उडीद व इतर पिकांची विक्री करीत होते पण सोयाबीनच्या साठवणूकीवर भर देत होते. त्या दरम्यान, शेतकऱ्यांनी घेतलेला निर्णय योग्य होता हे आताच्या दरावरुन निदर्शनास येत आहे.

असे राहिले आहेत सोयाबीनचे दर

हंगाम सुरु होण्यापूर्वी सोयाबीनला जूनमध्ये 8 हजार 900 चा दर होता. मात्र, सोयाबीन काढणीच्या दरम्यान राज्यात अतिवृष्टी झाली होती. त्यामुळे उत्पादनावर त्याचा परिणाम झाल्याने सोयाबीनचे दर गगणाला भिडणार असेच चित्र निर्माण झाले होते. शिवाय, मुहूर्ताच्या दरामुळे शेतकऱ्यांच्या आशा ऊंचावल्या होत्या. कारण मुहूर्ताच्या सोयाबीनला हिंगोली, बार्शी आणि अकोला बाजार समितीमध्ये 11 हजाराचा भाव मिळाला होता. मात्र, तो काही दिवसांपूरताच मर्यादीत राहिला होता. त्यानंतर मात्र, ऑक्टोंबर महिन्यात तर सोयाबीनचे दर हे 4 हजार 800 वर येऊन ठेपले होते. या हंगामात शेतकऱ्यांनी उच्चांकी आणि सर्वात कमी असे दोन्हीही दर पाहिले आहेत. पण आता दरात सुधारणा होत असल्याने दिलासा मिळत आहे.

मागणी वाढल्याचा परिणाम बाजारपेठेत

सोयापेंडची आयात होऊन देखील सोयाबीनच्या मागणीत वाढ होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी अजून काही काळ दरवाढीची प्रतिक्षा केली तर फायदा हा होणारच आहे. पण या दरम्यान वाढीव दरामुळे बाजार पेठेत मोठ्या प्रमाणात आवक वाढली तर त्याचा विपरीत परिणाम होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी टप्प्याटप्प्याने सोयीबीनची विक्री केली तरच फायदा होणार आहे.

संबंधित बातम्या :

फवारणी पिकांची अन् जीव धोक्यात शेतकऱ्यांचा, अशी घ्या काळजी..!

गायरान जमिन म्हणजे नेमके काय ? काळाच्या ओघात का वाढत आहे अतिक्रमण ?

विमा कंपनी – सरकारच्या वादात शेतकऱ्यांचे मरण, एकाही शेतकऱ्याला ‘या’ कंपनीची भरपाई नाही

Follow Us
राज्यसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली, छगन भुजळ यांना...
राज्यसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली, छगन भुजळ यांना...मोठी अपडेट समोर!
चार अल्पवयीन मुलांसोबत स्टंट, आजोबांचा कारनामा महागात पडला, पोलिसांनी
चार अल्पवयीन मुलांसोबत स्टंट, आजोबांचा कारनामा महागात पडला, पोलिसांनी थेट...व्हिडीओ व्हायरल
अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; 1.02 कोटी रुपयांचा अवैध गुटखा जप्त
Dharashiv | धाराशिवमध्ये अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; 1.02 कोटी रुपयांचा अवैध गुटखा जप्त
मुंबई | गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरचा भीषण अपघात; गॅस गळतीने खळबळ, पहा Vi
मुंबई | गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरचा भीषण अपघात; गॅस गळतीने खळबळ, पहा Video
राष्ट्रवादीला सहकार्य पडलं महागात? सेनेच्या 38 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
मोठी घडामोड! राष्ट्रवादीला सहकार्य पडलं महागात? रायगडमध्ये शिंदेसेनेत नाराजी; 38 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
लोकलचा खोळंबा! मध्य रेल्वेममध्ये सिग्लनचा बिघाड; वाचा कुठं काय घडलं?
लोकलचा खोळंबा! मध्य रेल्वेममध्ये सिग्लनचा बिघाड; वाचा कुठं काय घडलं? लोकल किती लेट?
भुजबळांसाठी दिल्ली दरबारचे दरवाजे उघडणार?; अंतिम निर्णय फडणवीसांच्या क
मोठी बातमी! भुजबळांसाठी दिल्ली दरबारचे दरवाजे उघडणार?; अंतिम निर्णय फडणवीसांच्या कोर्टात
उद्धव ठाकरेंचा कॉकरोच जनता पार्टीला पाठिंबा? पहिली प्रतिक्रिया समोर,
उद्धव ठाकरेंचा कॉकरोच जनता पार्टीला पाठिंबा? पहिली प्रतिक्रिया समोर, थेट म्हणाले...
कल्याणमध्ये रिक्षाचालकांसाठी मराठीची शाळा; आरटीओचा मोठा निर्णय
Kalyan | कल्याणमध्ये रिक्षाचालकांसाठी मराठीची शाळा; दर रविवारी शिकवले जाणार मराठी भाषेचे धडे
गारपीटीमुळे फळबागांचं नुकसान; पंचनामे करून मदत द्या, शेतकऱ्यांची....
Baramati Crop Loss | बारामतीत गारपीटीमुळे फळबागांचं नुकसान; पंचनामे करून मदत द्या, शेतकऱ्यांची आर्त हाक