AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Grape Damage : अवकाळीचा परिणाम थेट द्राक्ष दरावर, शेतकऱ्यांकडे आता एकच पर्याय..!

उत्पादन वाढीची उरली-सुरली आशा हंगामाच्या अंतिम टप्प्यात झालेल्या अवकाळीमुळे मावळली आहे. गेल्या दोन दिवसांपासून नाशिकसह उत्तर महाराष्ट्रात झालेल्या अवकाळीचा सर्वाधिक फटका हा द्राक्ष उत्पादकांनाच झालेला आहे. निफाड, कोळगाव परिसरात तर द्राक्ष बागा जमिनदोस्त झाल्या असून पावसामुळे थेट द्राक्षालाच तडे गेले आहेत. त्यामुळे याचा दरावर परिणाम होणार आहे. हंगामाच्या सुरवातीपासून सुरु झालेली संकटाची मालिक ही अंतिम टप्प्यातही कायम राहिल्याने आता बागांवर झालेला खर्चही पदरी पडतो की नाही अशी स्थिती आहे.

Grape Damage : अवकाळीचा परिणाम थेट द्राक्ष दरावर, शेतकऱ्यांकडे आता एकच पर्याय..!
वातावरणातील बदलामुळे आता खराब द्राक्षाचे बेदाण्याचे उत्पादन घेतले जाणार आहे.
| Updated on: Mar 14, 2022 | 5:10 AM
Share

नाशिक : उत्पादन वाढीची उरली-सुरली आशा हंगामाच्या अंतिम टप्प्यात झालेल्या अवकाळीमुळे मावळली आहे. गेल्या दोन दिवसांपासून नाशिकसह उत्तर महाराष्ट्रात झालेल्या अवकाळीचा सर्वाधिक फटका हा (Grape Production) द्राक्ष उत्पादकांनाच झालेला आहे. निफाड, कोळगाव परिसरात तर (Vineyard) द्राक्ष बागा जमिनदोस्त झाल्या असून पावसामुळे थेट (Grape Damage ) द्राक्षालाच तडे गेले आहेत. त्यामुळे याचा दरावर परिणाम होणार आहे. हंगामाच्या सुरवातीपासून सुरु झालेली संकटाची मालिक ही अंतिम टप्प्यातही कायम राहिल्याने आता बागांवर झालेला खर्चही पदरी पडतो की नाही अशी स्थिती आहे. खराब झालेल्या द्राक्षापासून बेदाणा उत्पादन घेण्याशिवाय आता शेतकऱ्यांकडे पर्यायच उरलेला नाही. शिवाय नाशिक जिल्ह्यात अजूनही 40 टक्के द्राक्षबागा काढणीच्या प्रतिक्षेत आहेत.

तर निर्यातीवरही परिणाम

द्राक्षाची निर्यात करताना त्याच्या दर्जाची तपासणी केली जाते आणि मगच निर्यातीचा निर्णय घेतला जातो. डिसेंबर महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे द्राक्षांचे मोठे नुकसान झाले होते. त्याचा परिणाम अजूनही जाणवत आहे. हे कमी म्हणून की काय युक्रेन-रशियाच्या युध्दाचा परिणाम सुरु असतानाच पुन्हा अवकाळीने अवकृपा दाखवलेली आहे. आता याचा थेट परिणाम दरावर आणि निर्यातीवर होणार असल्याचे निर्यातदारांचे म्हणणे आहे. सध्या द्राक्षाला 30 ते 40 रुपये किलो असा दर आहे पण आता त्यामध्ये 15 रुपयांची घसरण होईल असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

आता बेदाणा उत्पादनावर भर

द्राक्ष उत्पादनातून जे साध्य झाले नाही ते बेदाण्यातून काय होणार. मात्र, अधिकचा खर्च टाळण्यासाठी आणि खराब झालेल्या द्राक्षाचा उपयोग होण्यासाठी द्राक्ष उत्पादकांचा आता बेदाणा निर्मितीवर भर राहणार आहे. परंतू, त्यासाठीही स्वच्छ सूर्यप्रकाश आवश्यक असतो. पण गेल्या आठ दिवसांपासून ढगाळ वातावरण तर आहेच पण धुक्याचेही सावट आहे. त्यामुळे बेदाणा निर्मिती तर लांबणीवर पडणारच आहे पण या वातावरणाचा परिणाम बेदाण्यावर होऊ नये यासाठी प्रयत्न केले जात आहेत.

तरीही शेतकरी आशादायी

द्राक्षामध्ये गोडवा उतरण्यासाठी उष्णता वाढीची आवश्यकता असते. शनिवारी दुपारनंतर या भागात अवकाळीचे संकट दूर झाले होते. जर आता कडक ऊन पडले तर द्राक्षामध्ये गोडवा उतरेल. सध्याच्या प्रतिकूल परस्थितीचा परिणाम दरावर होणार असला तरी मार्च-एप्रिलमध्ये उत्तर प्रदेश, बिहार, दिल्ली या भागातून द्राक्षाला मागणी असते. त्या दरम्यान तरी चांगला दर मिळेल अशी आशा शेतकऱ्यांना आहे. तर दुसरीकडे नुकसानभरपाई मिळावी अशी मागणीही शेतकऱ्यांमधून होत आहे.

संबंधित बातम्या :

सोयाबीनची साठवणूक अन् हरभऱ्याची विक्री, काय स्थिती आहे खरेदी केंद्रावरची?

Hingoli : वसमतमध्ये हळद संशोधन केंद्राची होणार उभारणी, शेतकऱ्यांना नेमका फायदा काय?

Rabi Season : हंगामाच्या अंतिम टप्प्यातील व्यवस्थापनाने वाढेल उत्पादन, काय आहे कृषितज्ञांचा सल्ला?

Follow Us
150 व्हिडिओ, मोठा तपास; तरीही नीलम गोऱ्हे का गप्प? खरात प्रकरणावर....
150 व्हिडिओ, मोठा तपास; तरीही नीलम गोऱ्हे का गप्प? खरात प्रकरणावर.....
नीलम गोऱ्हे आणि अशोक खरात भेटीवर प्रश्नचिन्ह
नीलम गोऱ्हे आणि अशोक खरात भेटीवर प्रश्नचिन्ह.
आदित्य ठाकरे थेट भाजपच्या बड्या नेत्याच्या घरी, राजकीय चर्चांना उधाण
आदित्य ठाकरे थेट भाजपच्या बड्या नेत्याच्या घरी, राजकीय चर्चांना उधाण.
39 आमदार भेटले होते, मग फक्त मलाच का टार्गेट केलं जातंय?
39 आमदार भेटले होते, मग फक्त मलाच का टार्गेट केलं जातंय?.
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.