AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भात शेतीला धोक्याची घंटा, आवश्यकता योग्य रणनितीची

भारतीय शेती ही मान्सूनवर आधारित आहे. शिवाय निसर्गाचा लहरीपणामुळे उत्पादन हाती पडेल असे नाही. यातच भविष्यात पावसाचे प्रमाण कमी असल्याचे संकेत देण्यात आले आहेत त्यामुळे देशात भातशेती ही धोक्यात असून योग्य वेळा योग्य रणनिती करणे आवश्यक झाले आहे.

भात शेतीला धोक्याची घंटा, आवश्यकता योग्य रणनितीची
संग्रहीत छायिचित्र
| Edited By: राजेंद्र खराडे | Updated on: Oct 08, 2021 | 5:45 PM
Share

मुंबई : भारतीय शेती ही मान्सूनवर आधारित आहे. शिवाय निसर्गाचा लहरीपणामुळे उत्पादन हाती पडेल असे नाही. यातच भविष्यात पावसाचे प्रमाण कमी असल्याचे संकेत देण्यात आले आहेत त्यामुळे देशात भातशेती ही धोक्यात असून योग्य वेळी तांदळाबाबची रणनिती करणे आवश्यक झाले आहे. अन्यथा देशातील तांदळाचे उत्पादन कमी होण्याचा धोका निर्माण झाला आहे. याबाबत रेटिंग एजन्सी इन्फोमेरिक्स व्हॅल्यूएशन अँड रेटिंगने अहवाल सादर केला आहे. नैसर्गिकचक्रबरोबरच सरकारचे धोरण, तांदूळ प्रक्रिया कंपन्यांची भूमिका यामुळे उत्पादन वाढीचे अव्हान समोर उभे राहणार आहे.

रेटिंग एजन्सी इन्फोमेरिक्स व्हॅल्यूएशन अँड रेटिंग चा अहवाल काय सांगतो

तांदूळ प्रक्रिया कंपन्यांची वाढती संख्या आणि वाढती निर्यात यांचा भारतीय तांदूळ उद्योगावर सकारात्मक परिणाम झाला असला तरी सरकारी उपक्रमांच्या मर्यादा कमी करण्याचे आणि पावसाळी अनिश्चिततेवर अवलंबून राहण्याचे मोठे अव्हान असणार आहे. याकरिता योग्य रणनिती करुन त्यानुसार मार्गक्रमण गरजेचे आहे. नवीन प्रणाली, तंत्रज्ञान आणि तांदळाच्या बियाण्यांच्या नवीन प्रकारांवर लक्ष केंद्रित करून सर्वसमावेशक तांदूळ धोरणाची गरज असल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

वाढत्या कर्जाचाही परिणाम

अहवालात म्हटले आहे की तांदळाचे उत्पादन विविध जोखमींनी वेढलेले आहे. खतांच्या वाढत्या किंमती, पाण्याची घटती पातळी, बाजार भावातील अनिश्चितता इत्यादीचा धोका उत्पादकांना यामध्ये आहे. शिवाय कृषी यंत्रणेचे वाढते भाडे, खराब वाहतूक, निकृष्ट सुविधा आणि वेळेत वाहतूक साधनसामुग्री मिळत नसल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे.

या तीन गोष्टींचाही उत्पादनावर परिणाम

देशातील तांदूळ क्षेत्राला तीन मुख्य धोके आहेत – कंटेनरची कमतरता, कमी पाऊस आणि कमी किंमत इत्यादींमुळे सुमारे उत्पादनात घट होत आहे. तांदळाची वाहतूक ही कंटेनरच्या माध्यमातून केली जाते मात्र, अनेक कंटेनर हे बंदरावरच पडून आहेत. त्यामुळे बासमती तांदळाच्या निर्यातीचे मोठे नुकसान झाले आहे. अनियमित पावसामुळे पीक उत्पादनावर परिणाम होऊ शकतो. कमी पावसाच्या भीतीने यावर्षी शेतकऱ्यांनी इतर पिकाची लागवड केली आहे. हे सर्व असले तरी भारतीय हवामान खात्याने भविष्यात मान्सून हा कमीच राहणार असल्याचे सांगितले आहे.

किमान आधारभूत किंमतीचाही लाभ मिळू शकत नाही

खासगी व्यापाऱ्यांचा कमी सहभाग, कमी पायाभूत सुविधा मिळत नसल्याने दिवसेंदिवस उत्पादन हे घटत आहे. 2013 साली उत्पन्न 17% होते तर 2019 साली 2.7% टक्क्यावर आले आहे. अहवालात म्हटले आहे की, जमीन हक्क आणि जमिनीची मालकी, अन्न सुरक्षा, राजकीय स्थैर्य, नैसर्गिक संकटात संरक्षण आणि कृषी विविधीकरण या व्यापक प्रश्नावरच तांदळाचे उत्पादन अवलंबून आहे. भारतीय शेती पावसावरच अवलंबून आहे. त्यामुळे तांदूळ उत्पादनातील धोके लक्षात घेता पीक विमा, आधारभूत किंमत याबाबत ठोस भूमिका असणे आवश्यक आहे. अन्यथा दिवसेंदिवस उत्पादन घटणार असल्याचा अंदाज रेटिंग एजन्सी इन्फोमेरिक्स व्हॅल्यूएशन अँड रेटिंगने व्यक्त केला आहे.

संबंधित बातम्या :

शेतकऱ्याला हमीभावाचा आधार, राज्यात मूग-उडदाच्या खरेदी केंद्राला परवानगी

सोयाबीनची आवक वाढली तर दर घसरले, पावसाचा परिणाम सोयाबीन पीकावर

दोन वर्षांपासून रखडलेला पीक विमा मिळणार पुढच्या वर्षी, उच्च न्यायालयाचे आदेश

Follow Us
परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स...
FDA Raid | परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्सचा अन्न परवाना निलंबित
गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात...
Mumbai | गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात फलकांवर बंदी; उल्लंघन केल्यास कारवाई होणार
पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात
Nashik | पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात; संतप्त नागरिकांचा महापालिकेत ठिय्या
बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर
Navi Mumbai | बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर; दुकान मालकाने चूक मान्य करत...
मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात..
Mumbai Local | मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात रुळावरून पायी चालण्याची आली वेळ
अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा
Amit Shah | अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा, पुढे म्हणाले...
नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब...
Nanded | नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब; शेतकऱ्यांनी चौकात मांडली करपलेल्या पिकांची व्यथा
जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू...
Radhakrishna Vikhepatil | जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू... मराठा आरक्षणावर मोठी अपडेट समोर
तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं!
Shivendraraje Bhonsle | तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं! शिवेंद्रराजे भोसले स्पष्टच बोलले, पुढे म्हणाले...
संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; बन यांचा सडेतोड पलटवार
Sanjay Raut Vs Navnath Ban | संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; नवनाथ बन यांचा सडेतोड पलटवार, मुंबई दौऱ्यावरून वार- पलटवार सुरूच