AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rabi Season : यंदाच्या सुगीमध्ये यंत्राचा वापर, मजूरांपेक्षा खर्च कमी अन् वेळेचीही बचत

खरिपाप्रमाणेच अनेक संकटाची शर्यत पार करीत रब्बी हंगामही अंतिम टप्प्यात आला आहे. हंगामातील गहू, हरभरा, ज्वारी ही मुख्य पीके एकाच वेळी काढणीला आलेली आहेत. दरवर्षी रब्बीतील सुगी म्हणजे दीड महिन्याचा खेळ असतो. यंदा मात्र ऐन सुगीच्या दिवसांमध्ये गेल्या 4 दिवसांपासून ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. पावसाच्या धास्तीने शेतीकामे उरकून घेण्यावर शेतकऱ्यांचा भर असून आता गव्हाची कापणी आणि मळणीची कामे ही हार्वेस्टरच्या माध्यमातूनच केली जात आहे.

Rabi Season : यंदाच्या सुगीमध्ये यंत्राचा वापर, मजूरांपेक्षा खर्च कमी अन् वेळेचीही बचत
रब्बी हंगामातील पीक काढणीसाठी यंदा हार्वेस्टरचा वापर वाढला आहे.
| Edited By: राजेंद्र खराडे | Updated on: Mar 26, 2022 | 2:44 PM
Share

औरंगाबाद : खरिपाप्रमाणेच अनेक संकटाची शर्यत पार करीत (Rabi Season) रब्बी हंगामही अंतिम टप्प्यात आला आहे. हंगामातील गहू, हरभरा, ज्वारी ही मुख्य पीके एकाच वेळी काढणीला आलेली आहेत. दरवर्षी रब्बीतील सुगी म्हणजे दीड महिन्याचा खेळ असतो. यंदा मात्र ऐन सुगीच्या दिवसांमध्ये गेल्या 4 दिवसांपासून (Cloudy Weather) ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. पावसाच्या धास्तीने शेतीकामे उरकून घेण्यावर शेतकऱ्यांचा भर असून आता गव्हाची कापणी आणि मळणीची कामे ही (Harvester) हार्वेस्टरच्या माध्यमातूनच केली जात आहे. यामुळे मजुरांवर होणारा खर्च तर टळला आहेच पण वेळेतही बचत शिवाय ढगाळ वातावरणाचा धोका टळत आहे. आतापर्यंत शेतकरी यंत्राचा वापर म्हणले की, पाठ फिरवत होता पण आता परस्थितीनेच यंत्राचा वापर करण्यास भाग पाडले आहे. म्हणून मजुरांची जागा यंत्राने घेतल्याचे चित्र मराठवाड्यात पाहवयास मिळत आहे.

परराज्यातून हार्वेस्टर मराठवाड्यात

हार्वेस्टर सारखे यंत्र अजूनही मराठवाड्यात अधिक प्रमाणात नाहीत. रब्बी आणि खरीप हंगाम सुरु होताच हरियाणा, पंजाब येथून या मिशनरी राज्यात दाखल होतात. त्यामुळे गव्हाची कापणी आणि मळणीचे काम हे सोपे झाले आहे. शिवाय मजुरांसाठीची शेतकऱ्यांची भटकंतीही थांबली आहे. यंदा ऐन सुगीच्या दिवसांमध्येच ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने हातातोंडाशी आलेला घास पुन्हा निसर्गाने हिसकावून घेऊ नये म्हणून यंत्राच्या सहायाने कामे उरकून घेण्यावर शेतकऱ्यांचा भर आहे.

खर्चही कमी अन् नासाडीही टळली

एका एकरातील गहू करण्यासाठी मजुरांकडून काढणी, बांधणी आणि पुन्हा मळणी यासाठी किमान 10 मजूर तर आवश्यकच होते. मात्र, हेच काम हार्वेस्टर किमान अर्धा तासात करीत आहे. याकरिता शेतकऱ्यांना एकरी 2 हजार रुपये मोजावे लागतात. शिवाय मजुरांकडून होणारी पिकांची नासाडी टळली आहे. हंगाम सुरु होताच मजुरांची टंचाई हे नित्याचेच झाले आहे. यंदाच्या हंगामात मजूरी ही 500 वर गेली आहे.त्यामुळे पारंपरिक पध्दतीपेक्षा शेतकरी आता आधुनिकतेची कास धरु लागला आहे.

ढगाळ वातावरणाचा धोका कायम

उन्हाळा सुरु होताच पुन्हा एकदा निसर्गाने आपला लहरीपणा दाखवलेला आहे. भर उन्हाळ्यात पावसाळ्याप्रमाणे वातावरण झाले आहे. यामुळे पिकांवर किडीचा प्रादुर्भावाचा धोका तर कायम आहेच पण रब्बी हंगामातील काढणी कामे सुरु असून आता पावसाने हजेरी लावली तर मात्र, न भरुन निघणारे नुकसान होणार आहे. निसर्गाचा लहरीपणा असतो पण तो 2 दिवसांपुरता यंदा पण यावेळी गेल्या 8 दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे. त्यामुळे खरिपात जे झाले ते रब्बी हंगामात होऊ नये अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करीत आहेत.

संबंधित बातम्या :

Soybean Market : सोयाबीनच्या दरात वाढ, साठवणूक की विक्री प्रश्न कायम..!

Photo Gallery : कॅनॉलचे पाणी शेतशिवारात, पीकं वाचवताना शेतकऱ्याच्या काळजाचं पाणी..!

Latur : प्रतीक्षा संपली, उर्वरित 25 टक्केही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर

Follow Us
पावसाचा हाहाकार! पवित्र नदीचं रौद्र रूप, तब्बल 30 हजार क्युसेकने...
पावसाचा हाहाकार! पवित्र नदीचं रौद्र रूप, तब्बल 30 हजार क्युसेकने विसर्ग सुरूच
व्हिडीओ पाहा, पोट धरून हसाल; मुंबई पोलिसांच्या तावडीतून कॉक्रोच पळाले
Viral Video | व्हिडीओ पाहा, पोट धरून हसाल; मुंबई पोलिसांच्या तावडीतून कॉक्रोच पळाले
संध्याकाळी 6 वाजता राहुल गांधींची खासदारांसोबत बैठक,
संध्याकाळी 6 वाजता बैठक, पंतप्रधानांच्या निवासस्थानाबाहेरील आंदोलनानंतर कॉंग्रेसची पुढील रणनीती काय?
मी फक्त भारताच्या बाजूने... सुव्रत जोशींची पोस्ट चर्चेत
Suvrat Joshi | मी फक्त भारताच्या बाजूने... सुव्रत जोशींची पोस्ट चर्चेत; विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला समर्थन
मोठी बातमी! CJPच्या आंदोलनानंतर केंद्रात मोठ्या हालचाली, अमित शहा...
मोठी बातमी! CJPच्या आंदोलनानंतर केंद्रात मोठ्या हालचाली, अमित शहा घेणार लोकसभा अध्यक्षांची भेट
आसाममध्ये महापूराचं संकट कायम; 24 तासांत मृतांचा आकडा 31 वर
Assam Flood | आसाममध्ये महापूराचं संकट कायम; 24 तासांत मृतांचा आकडा 31 वर
एका हाताने पोलिस व्हॅन रोखली! मुंबईच्या तरुणीचा व्हिडीओ तुफान व्हायरल
Viral Video | एका हाताने पोलिस व्हॅन रोखली! मुंबईच्या तरुणीचा व्हिडीओ तुफान व्हायरल
मंत्रीपदासाठी थेट पक्षच बदलता येत नाही; CM फडणवीसांचं नाव घेत...
मंत्रीपदासाठी थेट पक्षच बदलता येत नाही; CM फडणवीसांचं नाव घेत शिंदेंचा नेता स्पष्टच म्हणाला
MPSC कडून निवड पद्धतीत मोठा बदल, अंतिम गुणवत्ता यादी जाहीर होण्याआधी..
MPSC कडून निवड पद्धतीत मोठा बदल, आता अंतिम गुणवत्ता यादी जाहीर होण्याआधी...काय बदलणार?
राहुल गांधींना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं थेट आव्हान, तुम्ही....
Devendra Fadnavis| राहुल गांधींना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं थेट आव्हान, तुम्ही पळकुटेपणा...