AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Agriculture News : राज्यभरातील शेतीच्या विविध घटना पाहा फक्त एका क्लिकवर

गेल्या तीन दिवसात अवकाळी पावसाने धुमाकूळ घातल्याने नाशिक जिल्ह्यातील जवळपास चार हजार हेक्टर पिकांचे नुकसान केले आहे. साडेपाच हजार शेतकऱ्यांना या अवकाळी पावसाचा फटका बसला आहे.

Agriculture News : राज्यभरातील शेतीच्या विविध घटना पाहा फक्त एका क्लिकवर
Agriculture News dhuleImage Credit source: tv9marathi
महेश घोलप
महेश घोलप | Updated on: Mar 09, 2023 | 2:44 PM
Share

नंदुरबार : उत्तर महाराष्ट्र आणि नंदुरबार (Nandurbar) जिल्ह्यात मार्च महिन्याचा पहिल्याच आठवड्यात वाढलेले तापमान (Temprature) पपई आणि केळी उत्पादक शेतकऱ्यांसाठी चिंतेची बाब ठरली आहे. वाढत्या तापमानामुळे केळी आणि पपईचे फळे खराब होण्याची संभावना वाढली आहे. फळाच्या संरक्षणासाठी शेतकरी विविध उपाय योजना करण्यास सुरुवात केली आहे.जिल्ह्यात तापमान चाळीस अंश सेल्सियस तापमानाच्या जवळपास गेल्याने पपई आणि केळीचे फळे खराब होण्याची शक्यता वाढली आहे. त्यासोबत विषाणूजन्य रोगांमुळे केळी आणि पपईच्या बागांमध्ये (cutivativatin fruit) मोठ्या प्रमाणात पानगळ होऊन फळे उघडे पडण्याच प्रमाण वाढले आहे. वाढत्या तापमानामुळे केळी आणि पपईच्या फळांवर कापड आणि गोणपाट टाकत फळे झाकत असून फळावर टाकलेल्या आच्छादनामुळे उष्णताची तीव्रता कमी होऊन फळांच्या संरक्षण होत आहे.

वादळी वाऱ्यासह पडलेल्या अवकाळी पावसामुळं कांदा पीकाचं अतोनात नुकसान

वाशिमच्या वाडी रायताळ, मोहोजा इंगोले, किनखेडा, मोरगव्हाण सह अनेक ठिकाणी 7 फेब्रुवारी झालेल्या वादळी वाऱ्यासह पडलेल्या अवकाळी पावसामुळं कांदा पीकाचं अतोनात नुकसान झालं आहे. यामुळं शेतकरी हवालदिल झाले असून कांदा बीज नुकसानीचे दोन दिवस झाले पंचनामे केले नसून त्याचे पंचनामे करून भरीव आर्थिक मदत देण्याची मागणी कांदा बीज उत्पादक शेतकऱ्यांनी शासनाकडे करीत आहेत.

अहमदनगर जिल्ह्यात 4479 हेक्टरवरील पिकांना ‘अवकाळी’ चा तडाखा

अहमदनगर जिल्ह्यात 4479 हेक्टरवरील पिकांना ‘अवकाळी’ चा तडाखा बसला आहे. यामुळे 8 हजार 791 शेतकरी बाधित झाले असून सर्वाधिक नुकसान हे राहुरी, नेवासा तालुक्यात झालं आहे. जिल्ह्यात अवकाळी पावसाने सोमवार आणि मंगळवारी असे दोन दिवस अनेक भागात हजेरी लावली. जिल्ह्याच्या उत्तर भागात अवकाळीचा मोठा तडाखा बसला. रब्बी हंगामातील गहू, मका, हरभरा, टोमॅटो, कांदा, कोबी, संत्रा, आंबा या पिकांचे नुकसान झालं आहे.

9 मार्च रोजी कोकणात उष्णतेचा लाटेचा इशारा

राज्यातील अनेक भागात अवकाळी पाऊस आणि दाट धुके व गारपीटाने तडाका दिला. यामुळे हवेत काहीसा गारवा निर्माण झाला आहे. परंतु आता राज्यातील उकाडा पुन्हा वाढणार आहे, राज्यातील तापमान चार ते सहा अंश सेल्सिअस ने वाढण्याचा इशारा भारतीय हवामान विभागाने दिला आहे. 9 मार्च रोजी कोकणात उष्णतेचा लाटेचा इशारा देण्यात आला आहे.

दहा हजार शेतकऱ्यांच नुकसान

धुळे जिल्ह्यात अवकाळी पाऊस व गारपिटीने तब्बल दहा हजार शेतकऱ्यांच नुकसान केले आहे. जिल्ह्यातील 149 गावांना या अवकाळी पावसाचा फटका बसला असून, यात हजारो हेक्टर शेत जमिनीचे पिकं उद्धवस्त झाल्याचा अहवाल शासनाला सादर करण्यात आला आहे. यात सर्वाधिक नुकसानी साक्री, शिरपूर आणि शिंदखेडा तालुक्यामध्ये झाल्याच समोर आले आहे. महसूल आणि कृषी विभागाने संयुक्त पंचानामे करत हा प्राथमिक अहवाल तयार केलेला आहे.

अवकाळी पावसाने चार हजार हेक्‍टरवरील पिकांचे नुकसान

गेल्या तीन दिवसात अवकाळी पावसाने धुमाकूळ घातल्याने नाशिक जिल्ह्यातील जवळपास चार हजार हेक्टर पिकांचे नुकसान केले आहे. साडेपाच हजार शेतकऱ्यांना या अवकाळी पावसाचा फटका बसला आहे. 3141 हेक्टरवरील बागायती क्षेत्र, तर 1013 हेक्टरवरील बागायती फळपिकांचे नुकसान झाले आहे. निफाड तालुक्यात सर्वाधिक 2433, सिन्नर 510, चांदवड 245, तर येवला येथील 863 शेतकऱ्यांना याचा फटका बसला आहे.

Follow Us
भगवा टिळा अन् धीरज परदेशी प्रकरण; आमदाराच्या खळबळजनक आरोपानंतर संताप,
भगवा टिळा अन् धीरज परदेशी प्रकरण; आमदाराच्या खळबळजनक आरोपानंतर संताप, अखेर मुख्यमंत्र्यांनी...
भारत-चीन सीमावाद पुन्हा चर्चेत, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाण...
भारत-चीन सीमावाद पुन्हा चर्चेत, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाण... अखेर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने चीनचे टोचले कान, काय घडलं?
पंतप्रधानांच्या नव्या व्हिडीओचा सोशल मीडियावर धुमाकूळ!
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नव्या व्हिडीओचा सोशल मीडियावर धुमाकूळ; नेमकं काय म्हणाले?
सुनावणी संपताच ठाकरेंच्या वकिलांची कोर्टाकडे मोठी मागणी; काय घडलं?
ShivSena | सुनावणी संपताच ठाकरेंच्या वकिलांची कोर्टाकडे मोठी मागणी; नेमकं काय घडलं?
शिवसेना पक्ष-चिन्हाचा फैसला जवळ? संजय राऊत म्हणाले, आशेचा किरण...
Sanjay Raut | शिवसेना पक्ष-चिन्हाचा फैसला जवळ? कपिल सिब्बलांच्या युक्तिवादानंतर संजय राऊत म्हणाले, आशेचा किरण...
विधिमंडळ पक्षात फूट म्हणजे राजकीय पक्षात फूट नाही!
Shivsena Case Hearing | विधिमंडळ पक्षात फूट म्हणजे राजकीय पक्षात फूट नाही!; कपिल सिब्बलांचा सुप्रीम कोर्टात जोरदार युक्तिवाद
आमचा युक्तीवाद सुरु होईल तेव्हा... कपिल सिब्बल यांच्या दाव्यांवर शिंदे
आमचा युक्तीवाद सुरु होईल तेव्हा... कपिल सिब्बल यांच्या दाव्यांवर शिंदे गटाकडून सर्वात मोठी प्रतिक्रिया
2018ची घटना असंवैधानिक तर शिंदेंची निवड संवैधानिक कशी?
मोठी बातमी! 2018ची घटना असंवैधानिक तर शिंदेंची निवड संवैधानिक कशी? कपिल सिब्बलांचा कोर्टात मोठा युक्तिवाद
अखेर मुळ शिवसेना कुणाची? सिब्बलांकडून थेट लेखी निवेदनाची प्रत सादर
अखेर मुळ शिवसेना कुणाची? सिब्बलांकडून थेट लेखी निवेदनाची प्रत सादर, चार मुद्यामध्येच... कोर्टात नेमकं काय घडलं?
TET पेपरफुटीचं महाराष्ट्र कनेक्शन उघड! खासगी अकॅडमी चालकाला अटक
TET पेपरफुटीचं महाराष्ट्र कनेक्शन उघड! सोलापुरातून खासगी अकॅडमी चालकाला अटक