AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

इतक्या लाख हेक्टरच्या औपचारिक नुकसानीचा आकडा, भरपाईबाबत मंत्रिमंडळाच्या बैठकीत काय ठरलं?

32 केंद्रात 8 हजार रुपयांपर्यंत कापसाचा भाव आहे.

इतक्या लाख हेक्टरच्या औपचारिक नुकसानीचा आकडा, भरपाईबाबत मंत्रिमंडळाच्या बैठकीत काय ठरलं?
अब्दुल सत्तारImage Credit source: tv 9
| Edited By: | Updated on: Nov 02, 2022 | 8:56 PM
Share

मुंबई : राज्याच्या मंत्रिमंडळाची आज बैठक झाली. बैठकीनंतर कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी त्यांच्या विभागाविषयीची माहिती पत्रकारांना दिली. अब्दुल सत्तार म्हणाले, ज्या ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं. त्यांच्याबाबत कॅबिनेटमध्ये निर्णय झाला. 24 लाख हेक्टर नुकसानाचा औपचारिक आकडा आला आहे. जुलै, ऑगस्टमध्ये नुकसान झालं. त्याचे पैसे सप्टेंबरमध्ये दिले. चार हजार सहाशे कोटी रुपयांचा निधी शेतकऱ्यांच्या ऑनलाईन अकाउंटवर गेले. ते त्यांनी विड्रालही केलेत.

आताही येणाऱ्या काही दिवसांत तीन हेक्टरपर्यंत नुकसान झाल्यास त्यांनाही देण्यात येईल. एनडीआरएफच्या नियमापेक्षा जास्त मदत देण्याबाबत चर्चा झाली. अंतिम निर्णय अद्याप झाला नाही, असंही अब्दुल सत्तार यांनी सांगितलं.

काही लोकं बांधावर जाऊन शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण करू लागले. कोणताही नुकसान झालेला शेतकरी भरपाईपासून वंचित राहणार नाही, अशी ग्वाही कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिली.

शेतकऱ्यांच्या बाबतीत हे सरकार गतिमान पद्धतीनं निर्णय घेत आहे. नुकसान झालेला शेतकरी भरपाईपासून वंचित राहणार नाही. उद्योगांच्या बाबतीतही संभ्रम निर्माण करू लागलेत. त्याचाही खुलासा उदय सामंत यांनी दिला आहे. तीन-साडेतीन महिन्यात कोणताही उद्योग बाहेर गेलेले नाहीत. बाहेर गेलेल्या उद्योग हे यापूर्वीच्या सरकारच्या काळात गेले आहेत.

कापसाची खरेदी करायला व्यापारी मार्केटमध्ये तयार आहे. 32 केंद्रात 8 हजार रुपयांपर्यंत कापसाचा भाव आहे. हा भाव हमीभावापेक्षा जास्त आहे. त्यामुळं कापूस विकण्यास शेतकऱ्यांना काही अडचण नाही.

कोणाच्या काळात वेदांता प्रकल्प गेला. कधी गेला. याचा खुलासा करण्यात आलाय. नवीन सरकारच्या काळात एकही प्रकल्प बाहेर गेला नाही. हा पुरावा श्वेतपत्रिकेपेक्षा काही कमी नसल्याचं अब्दुल सत्तार म्हणाले.

शेतकरी आणि उद्योगाबाबत चर्चा झाली. तारखेनिहाय खुलासा देण्यात आला आहे. इतर सविस्तर माहिती मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री देतील, असंही सत्तार यांनी सांगितलं.

खासदार डॉ. श्रीकांत हेसुद्धा आदित्य ठाकरे येणार असलेल्या दिवशी सिल्लोडला येणार आहेत. 7 तारखेला तुम्ही या. तुम्हालाही सिल्लोडचं निमंत्रण, असंही अब्दुल सत्तार यांनी म्हंटलं.

गडचिरोलीत शेतकरी खुश, लाल मिरचीला चांगला दर; एक क्विंटलचा भाव तब्बल..
गडचिरोलीत शेतकरी खुश, लाल मिरचीला चांगला दर; एक क्विंटलचा भाव तब्बल...
विलिनीकरणावर सुनेत्रा पवारच योग्य निर्णय घेतील; भरणेंचा ठाम विश्वास
विलिनीकरणावर सुनेत्रा पवारच योग्य निर्णय घेतील; भरणेंचा ठाम विश्वास.
अजितदादांना ते कॉन्ट्रक्ट नको होते, रोहित पवार यांच्या दाव्याने खळबळ
अजितदादांना ते कॉन्ट्रक्ट नको होते, रोहित पवार यांच्या दाव्याने खळबळ.
कोश्यारींना खूप चोपला असता... नाव बदलावे; मनसेचं आक्रमक प्रत्युत्तर
कोश्यारींना खूप चोपला असता... नाव बदलावे; मनसेचं आक्रमक प्रत्युत्तर.
तुम करो तो रासलीला, हम करे तो... मनसेचा ठाकरे सेनेवर हल्लाबोल
तुम करो तो रासलीला, हम करे तो... मनसेचा ठाकरे सेनेवर हल्लाबोल.
नाशिकमध्ये घाटांचे सुशोभीकरणाचे काम सुरु करताच पर्यावरणप्रेमी संतापले
नाशिकमध्ये घाटांचे सुशोभीकरणाचे काम सुरु करताच पर्यावरणप्रेमी संतापले.
एका डोळ्यात आनंद, एका डोळ्यात अश्रू; सुळे दादांच्या आठवणींनी भावूक
एका डोळ्यात आनंद, एका डोळ्यात अश्रू; सुळे दादांच्या आठवणींनी भावूक.
पैशाचा महापूर येऊन सुद्धा निष्ठेची भिंत तोडता आली नाही
पैशाचा महापूर येऊन सुद्धा निष्ठेची भिंत तोडता आली नाही.
मुंबई महापालिकेत 40 वर्षांनंतर भाजपचा महापौर; शपथविधी सोहळ्यात...
मुंबई महापालिकेत 40 वर्षांनंतर भाजपचा महापौर; शपथविधी सोहळ्यात....
तपास यंत्रणांवरून संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल
तपास यंत्रणांवरून संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल.