AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Automobile : कारच्या टायरचे आयुष्य वाढवायचे आहे? या चुका अवश्य टाळा

टायर बदण्यासाठी मोठा खर्च करावा लागत असल्याने बरेच लोकं त्यांना बदलण्यास कचरतात. पण तुमच्या कारचे टायर खराब न होता वर्षानुवर्षे सुस्थितीत राहिले तर?

Automobile : कारच्या टायरचे आयुष्य वाढवायचे आहे? या चुका अवश्य टाळा
टायर टिप्सImage Credit source: Social Media
| Updated on: May 01, 2023 | 9:49 PM
Share

मुंबई : टायर हा कोणत्याही वाहनाचा अत्यंत महत्त्वाचा भाग असतो कारण त्यांचा थेट संपर्क रस्त्याशी असतो. कारचे परफॉर्मन्स आणि मायलेजही त्यावर बऱ्याच अंशी अवलंबून असते. हे टायर अति वापराणे जीर्ण होतात आणि नंतर ते बदलावे लागतात. कारण खराब टायरने (Car Tyre Tips) प्रवास केल्याने कधीही अपघात होऊ शकतो. मात्र टायर बदण्यासाठी मोठा खर्च करावा लागत असल्याने बरेच लोकं त्यांना बदलण्यास कचरतात. पण तुमच्या कारचे टायर खराब न होता वर्षानुवर्षे सुस्थितीत राहिले तर? तुम्हालाही याविषयी नक्कीच जाणून घ्यायचे असेल. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला अशाच काही टिप्स सांगणार आहोत, ज्याचा अवलंब करून तुम्ही तुमच्या वाहनाच्या टायरचे आयुष्य वाढवू शकता.

वेळोवेळी टायरची अदला बदल करा

वाहनाचे टायर लवकर खराब होऊ नयेत यासाठी दर 4-5 हजार किलोमीटर अंतरावर वाहनाचे टायर बदला. म्हणजे, वाहनाचे पुढचे टायर मागच्या बाजूला आणि मागचे टायर पुढच्या बाजूला घ्या.

व्हील बॅलन्सिंगची काळजी घ्या

वाहनाच्या सर्व टायर्समध्ये योग्य संतुलन राखणे अत्यंत आवश्यक आहे. यामध्ये जेव्हा अडचण येते तेव्हा वाहनाच्या आत कंपन आणि धक्के जाणवतात, तसेच टायरही खूप वेगाने झिजतात. म्हणूनच वाहनाचे व्हील अलाइनमेंट आणि बॅलन्सिंग वेळोवेळी करणे आवश्यक आहे.

टायरची हवा तपासा

टायर खराब होण्यापासून रोखण्यासाठी, दर आठ दिवसांनी वाहनाच्या टायरची हवा तपासली पाहिजे. यासोबतच टायर्सचा थर आणि साइडवॉलही नियमितपणे तपासले पाहिजे आणि कोणताही टायर पूर्णपणे खराब झाला असेल तर तो लवकर बदलणे हाच एकमेव पर्याय आहे.

खडतर रस्त्यांवरून चालविणे टाळा

कार खडतर रस्त्यावरून चालविणे टाळा. यामुळे टायरची अनावश्यक झिज होते. याशिवाय टायरमधले अलायमेंटसुद्धा बिघडते.

गडचिरोलीत शेतकरी खुश, लाल मिरचीला चांगला दर; एक क्विंटलचा भाव तब्बल..
गडचिरोलीत शेतकरी खुश, लाल मिरचीला चांगला दर; एक क्विंटलचा भाव तब्बल...
विलिनीकरणावर सुनेत्रा पवारच योग्य निर्णय घेतील; भरणेंचा ठाम विश्वास
विलिनीकरणावर सुनेत्रा पवारच योग्य निर्णय घेतील; भरणेंचा ठाम विश्वास.
अजितदादांना ते कॉन्ट्रक्ट नको होते, रोहित पवार यांच्या दाव्याने खळबळ
अजितदादांना ते कॉन्ट्रक्ट नको होते, रोहित पवार यांच्या दाव्याने खळबळ.
कोश्यारींना खूप चोपला असता... नाव बदलावे; मनसेचं आक्रमक प्रत्युत्तर
कोश्यारींना खूप चोपला असता... नाव बदलावे; मनसेचं आक्रमक प्रत्युत्तर.
तुम करो तो रासलीला, हम करे तो... मनसेचा ठाकरे सेनेवर हल्लाबोल
तुम करो तो रासलीला, हम करे तो... मनसेचा ठाकरे सेनेवर हल्लाबोल.
नाशिकमध्ये घाटांचे सुशोभीकरणाचे काम सुरु करताच पर्यावरणप्रेमी संतापले
नाशिकमध्ये घाटांचे सुशोभीकरणाचे काम सुरु करताच पर्यावरणप्रेमी संतापले.
एका डोळ्यात आनंद, एका डोळ्यात अश्रू; सुळे दादांच्या आठवणींनी भावूक
एका डोळ्यात आनंद, एका डोळ्यात अश्रू; सुळे दादांच्या आठवणींनी भावूक.
पैशाचा महापूर येऊन सुद्धा निष्ठेची भिंत तोडता आली नाही
पैशाचा महापूर येऊन सुद्धा निष्ठेची भिंत तोडता आली नाही.
मुंबई महापालिकेत 40 वर्षांनंतर भाजपचा महापौर; शपथविधी सोहळ्यात...
मुंबई महापालिकेत 40 वर्षांनंतर भाजपचा महापौर; शपथविधी सोहळ्यात....
तपास यंत्रणांवरून संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल
तपास यंत्रणांवरून संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल.