AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Union Budget 2021 | सीतारमन यांनी सादर केलेला अर्थसंकल्प म्हणजे भाजपाचा निवडणूक जाहीरनामा : यशोमती ठाकूर

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) यांनी मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्ममधील तिसरा अर्थसंकल्प सादर केला.

Union Budget 2021 | सीतारमन यांनी सादर केलेला अर्थसंकल्प म्हणजे भाजपाचा निवडणूक जाहीरनामा : यशोमती ठाकूर
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण
| Updated on: Feb 01, 2021 | 2:21 PM
Share

नवी दिल्ली : “निर्मला सीतारमन (Nirmala Sitaraman) यांनी सादर केलेला अर्थसंकल्प (Union Budget 2021) म्हणजे भाजपाचा निवडणूक जाहीरनामा (BJP) आहे, असा घणाघात महिला बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) केला आहे. ठाकूर यांनी ट्विटद्वारे या अर्थसंकल्पाबाबत आपली प्रतिक्रिया दिली आहे. (Union Budget 2021 opposition party leaders reactions)

महाराष्ट्राच्या तोंडाला पानं पुसणारा हा अर्थसंकल्प

“सीतारमन यांनी सादर केलेला अर्थसंकल्प म्हणजे भाजपाचा निवडणूक जाहीरनामा आहे. ज्या राज्यात निवडणुका तिथे मोठमोठ्या आकड्यांचे पॅकेज द्यायचं”, असं ट्विट त्यांनी केलं आहे. मुंबईतून सरकारला सर्वाधिक कर मिळतो. अनेकांना रोजगाराची संधी आणि स्थैर्य मुंबई आमि महाराष्ट्रात प्राप्त होतं. मात्र यानंतरही केंद्रीय अर्थसंकल्पातून मुंबईच्या वाट्याला काहीच आलेलं नाही. हा अर्थसंकल्प म्हणजे मुंबई आणि महाराष्ट्राच्या तोंडाला पानं पुसणारा आहे, असंही ठाकूर यांनी नमूद केलं.

“कोरोना लशीचा उल्लेख नाही”

राज्यात काही दिवसांपूर्वी कोरोना लसीकरणाच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली. “कोरोना लस सर्वसामन्यांना मोफत देण्यात येणार की नाही, याबाबतची कोणतीही घोषणा या अर्थसंकल्पात करण्यात आली नाही. तसेच या बजेटमधून कामगार वर्गासाठी कोणत्याही घोषणा करण्यात आल्या नाहीत. फक्त रोजगार पोर्टल बनवण्याची घोषणा म्हणजे जखमेवर मीठ चोळण्यासारखं आहे” असं ठाकूर यांनी स्पष्ट केलं.

“करदात्या मध्यमवर्गाची निराशा”

“या बजेटमधून करदाता असेलल्या मध्यमवर्गाला काहीच मिळालं नाही. यावेळेस स्लॅब बदलेल, अशी आशा होती. पण अर्थमंत्र्यांनी घोर निराशा केली”, असंही ठाकूर म्हणाल्या.

निवडणूक असलेल्या ‘त्या’ तीन राज्यांना अर्थसंकल्पातून काय ?

भारतमाला प्रोजेक्टसाठी 3.3 लाख कोटी रुपये दिले आहेत. रस्ते इन्फ्रास्ट्रक्चरसाठी इकॉनॉमिक कॉरिडोर बनवणार, 3,500 किमी नॅशनल हाईवेझ प्रोजेक्टअंतर्गत तामिळनाडुमध्ये 1.03 लाख कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. या बांधकामाला प्रत्यक्ष सुरुवात ही पुढील वर्षात करण्यात येणार आहे. यानुसार 1100 किलोमीटरचं केरळमध्ये राष्ट्रीय महामार्ग बनवण्यात येणार आहे. याअंतर्गत मुंबई-कन्याकुमारी कॉरिडोरही बनेल, केरळमध्ये यावर 65 हजार कोटी रुपये खर्च होतील. बंगालमध्ये 25 हजार कोटी रुपये देऊन उड्डाणपुल तयार करण्यात येणार आहे. तसेच कोलकाता-सिलीगुडी रस्त्याचं अपग्रेडेशन होणार आहे. सोबतच 34 हजार कोटी रुपये हे आसाममधील राष्ट्रीय महामार्गावर खर्चिले जाणार आहेत.

संबंधित बातम्या :

Union Budget 2021 | टॅक्स स्लॅब जैसे थे, शेतकऱ्यांना दीडपट जास्त MSP, काय स्वस्त-काय महाग? केंद्रीय अर्थसंकल्पातील महत्वाचे मुद्दे

Union Budget 2021 highlights : टॅक्स स्लॅब ते उद्योग व्यापार, काय महाग, काय स्वस्त, अर्थसंकल्प जसाच्या तसा!

(Union Budget 2021 opposition party leaders reactions)

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.