AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Foxconn-Vedanta | गुजरातमध्ये प्लँट, महाराष्ट्रात राजकारण तर चीनसहीत तैवानच्या डोक्याला ताप, एका प्रकल्पाचे तीन परिणाम..

Foxconn-Vedanta | वेदांताने गुजरातमध्ये चिप , सेमीकंडक्टर उत्पादन प्रकल्प सुरु करण्याचा करार केला आणि त्यावरुन महाराष्ट्रात राजकीय घमासान सुरु असतानाच आंतरराष्ट्रीय पातळीवरही त्याचे पडसाद उमटत आहे.

Foxconn-Vedanta | गुजरातमध्ये प्लँट, महाराष्ट्रात राजकारण तर चीनसहीत तैवानच्या डोक्याला ताप, एका प्रकल्पाचे तीन परिणाम..
प्रकल्प एक, परिणाम तीन Image Credit source: सोशल मीडिया
| Updated on: Sep 16, 2022 | 11:57 AM
Share

Foxconn-Vedanta | वेदांता प्रकल्प (Vedanta Plant) राज्यबाहेर गेल्यावरुन महाराष्ट्रात राजकीय घमासान (Political War) सुरु आहे. तर आंतरराष्ट्रीय पातळीवर चीनलाही (Chiana) यामुळे धडकी भरली आहे. तैवानच्याही (Taiwan) डोक्याला ताप झाला आहे. एकाच प्रकल्पाचे हे तीन परिणाम जाणून घेऊयात..

तैवान येथील फॉक्सकॉनसोबत भारतीय वेदांता ग्रुपने करार केला. या कंपन्या गुजरातमधील अहमदाबाद जवळ चिप, सेमीकंडक्टरचे उत्पादन सुरु करणार आहेत.

या प्रकल्पासाठी 1.54 लाख रुपयांची गुंतवणूक करण्यात येणार आहे. या संयुक्त प्रकल्पात वेदांता समुहाचा 60 टक्के वाटा असेल. तर फॉक्सकॉन 40 टक्के भागीदार असेल.

या प्रकल्पात सेमीकंडक्टर, डिस्प्ले ग्लास तयार करण्यात येतील. या प्रकल्पामुळे ऑटोमोबाईल आणि इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनात आवश्यक चिपचे उत्पादन करण्यात येईल.

या प्रकल्पामुळे मात्र महाराष्ट्रात राजकारण तापले आहे. हा प्लँट अगोदर पुण्याजवळील तळेगाव येथे उभारण्यात येणार होता. यापूर्वीच्या सरकारसोबत सोपास्कारही झाला होता.

पण अचानक कंपनीने गुजरात राज्याकडे मोर्चा वळविला. त्यावरुन महाराष्ट्रात राजकारण तापले. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसने नव्या सरकारची या मुद्यावरुन कोंडी केली.

माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी हे सरकार, स्वतःसाठी खोका आणि महाराष्ट्राला धोका देत असल्याचा जोरदार हल्ला चढवला. उद्योजकांना सरकारवर विश्वास नसल्यानेच प्रकल्प अचानक राज्यबाहेर गेल्याचा त्यांनी आरोप केला.

या प्रकल्पामुळे राज्यातील तरुणांना 1 लाख नोकऱ्यांची संधी होती. ही संधी राज्याने गमावल्याचा आरोप विरोधकांनी केला. तळेगाव जवळील 1,000 एकर जमीन या प्रकल्पासाठी देण्याचे ठरले होते. सर्व प्रक्रिया अंतिम टप्प्यात होती. परंतु, अचानक कंपनीने गुजरातचा रस्ता धरला.

प्रकल्प महाराष्ट्राबाहेर गेल्याने राज्य सरकारला मोठा झटका बसला आहे. तर विरोधकांना आयते कोलीत मिळाले आहे. राज्यात या मुद्यावरुन राजकारण तापलं आहे. या प्रकल्पाचे देशातंर्गत परिणाम आपण पाहिले. आता या प्रकल्पाचे आंतरराष्ट्रीय पडसादही पाहुयात..

चिप आणि डिस्प्ले उत्पादनात सध्या तैवान, चीन-हाँगकाँग, दक्षिण कोरिया यांचा दबदबा आहे. एकट्या तैवानचा सेमीकंडक्टर उत्पादनात 92 टक्के वाटा आहे. आता भारतात सेमीकंडक्टर आणि चिपचे उत्पादन सुरु होणार आहे. त्यामुळे या देशातील बाजारपेठेला धक्का बसणार आहे.

एका रिपोर्टनुसार, 2026 पर्यंत भारत सेमीकंडक्टर आणि चिपची 17 टक्के गरज देशातूनच पूर्ण करेल. त्यामुळे आयातीवरचा खर्च कमी होईल.इंडिया सेमीकंडक्टर मार्केट रिपोर्ट 2019-2026 नुसार, भारतात 300 अरब डॉलरची बाजारपेठ उभी राहील.

इलेक्ट्रॉनिक आणि ऑटोमोबाईल क्षेत्रातील चीनी कंपन्यांच्या वर्चस्वाला धक्का बसेल. त्यामुळे येत्या 5 वर्षातच त्यांना भारताशी स्पर्धा करावी लागणार आहे.

गडचिरोलीत शेतकरी खुश, लाल मिरचीला चांगला दर; एक क्विंटलचा भाव तब्बल..
गडचिरोलीत शेतकरी खुश, लाल मिरचीला चांगला दर; एक क्विंटलचा भाव तब्बल...
विलिनीकरणावर सुनेत्रा पवारच योग्य निर्णय घेतील; भरणेंचा ठाम विश्वास
विलिनीकरणावर सुनेत्रा पवारच योग्य निर्णय घेतील; भरणेंचा ठाम विश्वास.
अजितदादांना ते कॉन्ट्रक्ट नको होते, रोहित पवार यांच्या दाव्याने खळबळ
अजितदादांना ते कॉन्ट्रक्ट नको होते, रोहित पवार यांच्या दाव्याने खळबळ.
कोश्यारींना खूप चोपला असता... नाव बदलावे; मनसेचं आक्रमक प्रत्युत्तर
कोश्यारींना खूप चोपला असता... नाव बदलावे; मनसेचं आक्रमक प्रत्युत्तर.
तुम करो तो रासलीला, हम करे तो... मनसेचा ठाकरे सेनेवर हल्लाबोल
तुम करो तो रासलीला, हम करे तो... मनसेचा ठाकरे सेनेवर हल्लाबोल.
नाशिकमध्ये घाटांचे सुशोभीकरणाचे काम सुरु करताच पर्यावरणप्रेमी संतापले
नाशिकमध्ये घाटांचे सुशोभीकरणाचे काम सुरु करताच पर्यावरणप्रेमी संतापले.
एका डोळ्यात आनंद, एका डोळ्यात अश्रू; सुळे दादांच्या आठवणींनी भावूक
एका डोळ्यात आनंद, एका डोळ्यात अश्रू; सुळे दादांच्या आठवणींनी भावूक.
पैशाचा महापूर येऊन सुद्धा निष्ठेची भिंत तोडता आली नाही
पैशाचा महापूर येऊन सुद्धा निष्ठेची भिंत तोडता आली नाही.
मुंबई महापालिकेत 40 वर्षांनंतर भाजपचा महापौर; शपथविधी सोहळ्यात...
मुंबई महापालिकेत 40 वर्षांनंतर भाजपचा महापौर; शपथविधी सोहळ्यात....
तपास यंत्रणांवरून संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल
तपास यंत्रणांवरून संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल.