AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Dal Price : सर्वसामान्यांना मोठा दिलासा! यंदा डाळींच्या किंमती नाही होणार बेभाव, रामबाण ठरणार केंद्र सरकारचा हा उपाय

Dal Price : केंद्र सरकारच्या योजनेमुळे यंदा डाळीचे भाव गगनाला भिडणार नाहीत. त्यासाठी काय उपाय करण्यात आले आहेत?

Dal Price : सर्वसामान्यांना मोठा दिलासा! यंदा डाळींच्या किंमती नाही होणार बेभाव, रामबाण ठरणार केंद्र सरकारचा हा उपाय
डाळीचे भाव नियंत्रणात
| Updated on: Jan 13, 2023 | 10:19 PM
Share

नवी दिल्ली : देशातील महागाई (Inflation) नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्र सरकारने यंदा वर्ष सुरु होताच उपाय योजना केली आहे. या वर्षात डाळीच्या भावावरुन (Plus Rate) रान पेटणार नाही, याची काळजी केंद्र सरकारने अगोदरच घेतली आहे. त्यासाठी विविध उपाय योजना आखण्यात आल्या आहेत. देशात तूर डाळीचा (Tur Dal) साठा कमी होऊ नये यासाठी केंद्राने उपाय केल्या आहेत. त्यासाठी केंद्र सरकारने 10 लाख टन तूर डाळ आयात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नाफेड खुल्या बाजारात हरभरा डाळ (Chana Dal) स्वस्तात विक्रीचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे हरभरा डाळीच्या किंमती कमी ठेवण्यासाठी मदत मिळेल.

कृषी मंत्रालयाने याविषयीची आकडेवारी सादर केली. त्यानुसार, 2022-23 (जुलै-जून) या काळात डाळींचे उत्पादन किती झाले,याची माहिती दिली. मटारचे उत्पादन मागील वर्षातील 43.4 लाख टनांवरून 38.9 लाख टनांपर्यंत कमी होण्याची शक्यता आहे.

तूर डाळीचे उत्पादनात कर्नाटक अग्रेसर आहे. पण राज्यात अनेक ठिकाणी खराब हवामान आणि पीकांवरील रोगांमुळे तूर डाळीच्या उत्पादनावर मोठा परिणाम झाला. त्यामुळे उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे. त्याचा फटका  ग्राहकांना बसण्याची शक्यता होती.

देशात गेल्या सत्रात हरबरा डाळीचे चांगले उत्पादन झाले होते. नाफेडने गेल्या हंगामात एमएसपीवर शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात हरबरा खरेदी केली होती. पण नाफेड खुल्या बाजारातून ठोक खरेदीदारांसाठी निविदा प्रक्रिया 4700 रुपये प्रति क्विंटल दराने विक्री होत आहे.

नाफेडने हरबरा डाळ विक्री केल्याने बाजारात डाळीच्या किंमती 4,800-4,900 रुपये प्रति क्विंटल सुरु आहे. 2022-23 च्या हंगामात हरबरा डाळीचा भाव 5,335 रुपये प्रति क्विंटल होता.  यंदा डाळीच्या किंमती नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्र कसोशिने प्रयत्न करत आहे.

गेल्या वर्षी डिसेंबर 2022 मध्ये भारताने 2 लाख टन तूर डाळ आयात केली. भारत आफ्रिकी देश आणि म्यानमारमधून सर्वाधिक तूर डाळ आयात करतो. आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये भारताने एकूण 7.6 लाख टन तूरडाळ आयात केली होती.

Follow Us
आयटी कंपनीनंतर आता मुंबईच्या नामांकित बँकेत धर्मपरिवर्तन? पतीचा...
आयटी कंपनीनंतर आता मुंबईच्या नामांकित बँकेत धर्मपरिवर्तन? पतीचा....
शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी खूश खबर... अखेर कांदा प्रश्नावर तोडगा निघणार
शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी खूश खबर... अखेर कांदा प्रश्नावर तोडगा निघणार.
कोणाला सुगावा लागू नये म्हणून चक्क... कसून चौकशी केल्यानंतर तेजस शाह..
कोणाला सुगावा लागू नये म्हणून चक्क... कसून चौकशी केल्यानंतर तेजस शाह...
पंतप्रधान मोदींवर सपकाळांची जहरी टीका; पनोती वक्तव्याने महाराष्ट्रात..
पंतप्रधान मोदींवर सपकाळांची जहरी टीका; पनोती वक्तव्याने महाराष्ट्रात...
EDच्या कारवाईनंतर CPI(M) कार्यकर्ते आक्रमक; अधिकाऱ्यांच्या गाड्यांवर..
EDच्या कारवाईनंतर CPI(M) कार्यकर्ते आक्रमक; अधिकाऱ्यांच्या गाड्यांवर...
नीट पेपरफुटी प्रकरणी मोठी कारवाई, प्राध्यापक तेजस शाहच्या कॅबिनमध्ये..
नीट पेपरफुटी प्रकरणी मोठी कारवाई, प्राध्यापक तेजस शाहच्या कॅबिनमध्ये...
रवींद्र चव्हाणांची दिल्लीवारी; 48 नावांची यादी दिल्ली दरबारात!
रवींद्र चव्हाणांची दिल्लीवारी; 48 नावांची यादी दिल्ली दरबारात!.
मुंबईकरांचं रक्त विकण्याचा डाव; ठाकरे गटाच्या विरोधानंतर फेरविचार,
मुंबईकरांचं रक्त विकण्याचा डाव; ठाकरे गटाच्या विरोधानंतर फेरविचार,.
मोटेगावकरने ज्याच्यासाठी पेपर फोडला त्याच लेकाचा खळबळजनक गौप्यस्फोट;
मोटेगावकरने ज्याच्यासाठी पेपर फोडला त्याच लेकाचा खळबळजनक गौप्यस्फोट;.
मीरा रोडनंतर घाटकोपर पेटलं? किरीट सोमय्यांचा थेट इशारा, म्हणाले....
मीरा रोडनंतर घाटकोपर पेटलं? किरीट सोमय्यांचा थेट इशारा, म्हणाले.....