AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gautam Adani : गौतम अदानी यांच्या या कंपनीचे बदलणार नाव, तुमचा फायदा काय

Gautam Adani : अदानी समूहाच्या या कंपनीचे नाव बदलणार आहे. या नाम बदलाचा काय फायदा होईल, त्यामागील कारणं समजून घ्या...

Gautam Adani : गौतम अदानी यांच्या या कंपनीचे बदलणार नाव, तुमचा फायदा काय
| Updated on: May 30, 2023 | 8:41 PM
Share

नवी दिल्ली : अमेरिकन शॉर्ट सेलिंग फर्म हिंडनबर्ग रिसर्चने (Hindenburg Research) अदानी समूहाची पोलखोल करण्याचा दावा केला होता. 24 जानेवारी 2023 रोजी हा दावा करण्यात आला. या फर्मच्या अहवालानंतर भारतासह जगात खळबळ माजली होती. अदानी समूहाने (Gautam Adani Group) सर्व आरोप फेटाळले होते. पण तरीही समूहाच्या सर्व शेअरमध्ये घसरणीचे सत्र सुरु झाले होते. या सर्व घडामोडीत अदानी समूहाचे मार्केट कॅप 12 लाख कोटींनी घसरले. पण नंतर हा ग्रुप सावरला. या समुहातील अनेक कंपन्यांनी जोरदार कामगिरी बजावली. गुंतवणूकदारांना लॉटरी लागली. पण आता अदानी समूहाने त्यांच्या या कंपनीचे नाव बदलण्याचा निर्णय घेतला आहे. याविषयीची माहिती त्यांनी शेअर बाजाराला दिली आहे.

अदानी ट्रान्समिशन अदानी ट्रान्समिशनच्या चौथ्या तिमाहीत जोरदार निकाल दिसून आला. कंपनीने 31 मार्च रोजी संपलेल्या तिमाहीत 85 टक्के नफा कमाविला. स्टॉक एक्सचेंजच्या फायलिंगमध्ये कंपनीने नाव बदलाची माहिती दिली. त्यानुसार, Adani Transmission चे नाव बदलण्यात येऊ शकते.

नवीन नाव काय असेल? अदानी समूहाने दिलेल्या माहितीनुसार, गौतम अदानी यांची अदानी ट्रान्समिशनचे (Adani Transmission) नाव अदानी एनर्जी सोल्यूशन्सन (Adani Energy Solutions) असे असू शकते. अदानी ट्रान्समिशनने तिमाही निकाल जोरदार दिले आहेत. कंपनीच्या संचालक मंडळाकडून नाव बदलण्याच्या प्रस्तावावर मोहर लावण्यात आली आहे.

निव्वळ 440 कोटींचा नफा चौथ्या तिमाहीच्या निकालात कंपनीने आकडे सादर केले आहेत. त्यानुसार, Adani Transmission ची आर्थिक स्थिती अत्यंत चांगली राहिली आहे. मार्च तिमाहीत कंपनीला 440 कोटींचा निव्वळ नफा झाला आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत 237 कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला होता. कंपनीचद्या महसूलात 10 टक्क्यांची वाढ झाली. गेल्या वर्षी एकूण 3,165 कोटी रुपयांचा महसूल मिळाला तर यावर्षी कंपनीला 3,495 कोटी रुपयांचा महसूल मिळाला.

नाव बदलण्याचे कारण काय नाव बदलण्यामागील कारण कंपनीने स्पष्ट केलेले नाही. हिंडनबर्ग अहवालानंतरही कंपनीच्या महसूलात कुठेच कमी आलेली नाही. कंपनीच्या निव्वळ नफ्यातही चांगलीच वाढ झालेली आहे. या नाव बदलामुळे गुंतवणूकदारांचा नक्कीच फायदा होईल, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे.

एप्रिल महिन्यात नवीन कंपनी उद्योगपती गौतम अदानी यांनी समूहाला या गर्तेतून बाहेर काढण्यासाठी धोरणात अमुलाग्र बदल केला आहे. नवनवीन कंपन्यांच्या मार्फत अदानी समूह आता विविध क्षेत्रात नशीब अजमावत आहे. ही व्यावसायिक रणनीती हिंडनबर्ग अहवालानंतर समूहाला तारण्यासाठी सुरु करण्यात आली आहे. अदानी समूहाची फ्लॅगशिप कंपनी अदानी एंटरप्राईजेस लिमिटेडतंर्गत (Adani Enterprises Ltd)ही कंपनी सुरु करण्यात आली आहे. शेअर बाजाराला याविषयीची माहिती देण्यात आली.

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.