AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारतीय हवाई दलात नोकरी करण्याची सुवर्णसंधी, बारावी पास उमेदवार…

IAF Agniveer Recruitment 2024 : नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी एक मोठी सुवर्णसंधी आहे. विशेष म्हणजे भरती प्रक्रियेला सुरूवात झालीये. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावा. विशेष म्हणजे थेट भारतीय हवाई दलात नोकरी करण्याची संधी तुमच्याकडे आहे.

भारतीय हवाई दलात नोकरी करण्याची सुवर्णसंधी, बारावी पास उमेदवार...
Air Force
| Updated on: Jul 09, 2024 | 2:40 PM
Share

नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी खरोखरच एक मोठी संधी आहे. विशेष म्हणजे भरती प्रक्रियेला सुरूवात झालीये. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी अजिबातच वेळ वाया न घालता भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावा. विशेष म्हणजे या भरती प्रक्रियेची अधिसूचना देखील प्रसिद्ध करण्यात आलीये. या भरती प्रक्रियेसाठी आपण कोणत्याही कानाकोपऱ्यात बसूनही आरामात अर्ज करू शकतात. भरतीसाठी फक्त आणि फक्त ऑनलाईन पद्धतीनेच अर्ज करावा लागणार आहे. चला तर मग जाणून घ्या या भरती प्रक्रियेबद्दल अधिक आणि अर्ज करण्याची अगदी सोपी प्रक्रिया.

ही भरती प्रक्रिया भारतीय हवाई दलात (IAF) अग्निवीर वायूसाठी सुरू आहे. अग्निवीर म्हणून हवाई दलात नोकरी करू इच्छिणाऱ्यांनी लगेचच भरतीसाठी अर्ज करावीत. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 28 जुलै 2024 आहे. इच्छुक उमेदवारांना त्यापूर्वीच या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करणे आवश्यक आहे. उशीरा आलेले अर्ज हे स्वीकारले जाणार नाहीत.

agnipathvayu.cdac.in या साईटवर जाऊन तुम्हाला भरतीसाठी अर्ज करावी लागणार आहेत. याच साईटवर आपल्याला भरती प्रक्रियेची सविस्तर माहिती ही आरामात मिळेल. विशेष म्हणजे या भरती प्रक्रियेसाठी पुरूष आणि महिला अर्ज करू शकतात. या भरती प्रक्रियेसाठी मोठा नियम लागू करण्यात आला असून फक्त आणि फक्त अविवाहितच महिला आणि पुरूष अर्ज करू शकतात.

या भरती प्रक्रियेसाठी वयाची अट ही लागू करण्यात आली असून 21 वयोगटापर्यंतचे उमेदवार हे भरतीसाठी अर्ज करू शकतात. भरतीसाठी अर्ज करणारा उमेदवार हा भौतिकशास्त्र, गणित आणि इंग्रजी विषयातून बारावी उत्तीर्ण असावा. यासोबतच अभियांत्रिकीमध्ये तीन वर्षांचा डिप्लोमा उमेदवाराना केलेला असावा.

या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याच्या अगोदर उमेदवाराने अधिसूचना ही व्यवस्थित वाचून घ्यावी आणि मगच अर्ज हा करावा. https://agnipathvayu.cdac.in/AV/img/upcoming/AGNIVEER_VAYU_02-2025.pdf या लिंकवर आपल्याला भरती प्रक्रियेची अधिसूचना ही वाचायला मिळेल. या भरती प्रक्रियेसाठी उमेदवाराला लेखी परीक्षा देखील द्यावी लागणार आहे.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.