AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सरकारी नोकरी करण्याची सुवर्णसंधी, लगेचच करा अर्ज आणि मिळवा नोकरी

ITBP Head Constable Recruitment 2024 : नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी सुवर्णसंधी आहे. विशेष म्हणजे भरती प्रक्रियेला सुरूवात झालीये. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी लगेचच भरतीसाठी अर्ज करावा. या भरती प्रक्रियेची अधिसूचना देखील प्रसिद्ध करण्यात आलीये. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी अर्ज करावीत.

सरकारी नोकरी करण्याची सुवर्णसंधी, लगेचच करा अर्ज आणि मिळवा नोकरी
Indo Tibetan Border Police Force
| Updated on: Jul 08, 2024 | 12:58 PM
Share

नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी एक मोठी सुवर्णसंधी आहे. विशेष म्हणजे भरती प्रक्रियेला सुरूवात झालीये. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी अर्ज करावीत. विशेष बाब म्हणजे काही दिवसांपूर्वीच या भरती प्रक्रियेची अधिसूचना ही प्रसिद्ध करण्यात आलीये. या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला फक्त आणि फक्त ऑनलाईन पद्धतीने अर्ज ही करावी लागणार आहेत. इंडो तिबेटीयन बॉर्डर पोलिस फोर्स (ITBP) कडून ही भरती प्रक्रिया राबवली जातंय. चला तर मग जाणून घ्या या भरती प्रक्रियेबद्दल अधिक आणि अर्ज करण्याची सोपी प्रक्रिया. 

ही भरती प्रक्रिया हेड कॉन्स्टेबल पदासाठी सुरू आहे. विशेष म्हणजे या भरती प्रक्रियेतून एकून 112 पदे भरली जाणार आहेत. हेड कॉन्स्टेबल (शिक्षण आणि तणाव समुपदेशक) ही पदे भरली जातील. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी अजिबातच वेळ वाया न घालता भरती प्रक्रियेसाठी फटाफट अर्ज करावीत, ही मोठी संधी नक्कीच आहे. 

या भरती प्रक्रियेसाठी वयाची आणि शिक्षणाची अट ही लागू करण्यात आलीये. मान्यताप्राप्त विद्यापीठातून मानसशास्त्राची पदवी किंवा समकक्ष पदवी किंवा बॅचलर ऑफ एज्युकेशन उमेदवाराचे झालेले असावे. या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांना फक्त लेखी परीक्षाच नाही तर शारीरिक कार्यक्षमता चाचणी आणि शारीरिक मानक चाचणी देखील द्यावी लागेल. 

यासर्व चाचण्यांनंतर उमेदवारांची निवड ही केली जाईल. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांना 100 रूपये फीस ही भरावी लागेल. यामध्ये प्रवर्गातील उमेदवार आणि महिला यांना फीसमध्ये सूट देण्यात आलीये. recruitment.itbpolice.nic.in या साईटवर आपल्याला भरती प्रक्रियेची सविस्तर माहिती मिळेल आणि तिथूनच आपल्याला भरतीसाठी अर्ज करावा लागेल. 

भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याच्या अगोदर उमेदवारांनी भरतीची अधिसूचना ही व्यवस्थित वाचून घ्यावी आणि मगच भरतीसाठी अर्ज करावा. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 5 ऑगस्ट 2024 आहे. त्यापूर्वीच आपल्याला भरती प्रक्रियेसाठी अर्ज करणे अत्यंत आवश्यक आहे. उशीरा आलेले अर्ज हे स्वीकारले जाणार नाहीत.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.