AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पत्नीसह गृहप्रवेश केला, पण मेहुणीमुळे तो थेट गजाआड गेला… असं काय झालं ?

मध्य प्रदेशात एका वराला त्याच्या लग्नानंतरच अटक करण्यात आली. त्याच्या मेहुणीचे बोलणं ऐकताच तो थेट तुरूंगात गेला. असं काय सांगितलं तिने ?

पत्नीसह गृहप्रवेश केला, पण मेहुणीमुळे तो थेट गजाआड गेला... असं काय झालं ?
लग्नानंत वर थेट तुरूंगात पोहोचला
| Updated on: Nov 25, 2024 | 12:28 PM
Share

मध्य प्रदेशमध्ये एक अजब मामला समोर आला आहे. तेथे एका तरूणाचे लग्न होतं, पण लग्न लागून तो घरात येतो न येतो तोच त्याची थेट तुरूंगात रवानगी झाली. त्याच्या मेहुणीमुळेच त्याला जेलची हवा खावी लागली. नवविवाहीत वधूसोबत तो गृहप्रवेश करत असातानाच पोलिस तेथे पोहोचले. लग्नघरात पोलिसांना पाहून सर्वच अवाक् झाले. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, वराच्या मेहुणीनेच त्याच्यावर फसवणुकीचे आरोप लावले एवढेच नव्हे तर पाच वर्षांपासून नातं असल्याचं सांगत, धोका दिल्याचा आरोप तिने केला. त्या वराच्या मेहुणीने त्याच्यावर गंभीर आरोप करत तक्रार दाखल केली आहे, त्यामुळे तरुणाला अटक करण्यात आली.

पाच वर्ष शरीरसंबंध

शिवकांत रावत असे आरोपीचे नाव असून तो आरोग्य विभागात कार्यरत असल्याचे पोलिसांनी सांगितले. तक्रारीत पीडितेने नमूद केल्यानुसार, आरोपी हा तिच्या बहिणीचा दीर असून त्याने पीडितेला लग्नाचे खोटे वचन दिले आणि 5 वर्ष तिच्याशी शारीरिक संबंधही ठेवले. मात्र त्यानंतर त्या युवकाने पीडितेशी लग्न करण्यास नकार दिला आणि दुसऱ्या मुलीशीच विवाह केला. हे प्रकरण तिघरा गावातील आहे. आरोपी तरूणाचं मऊगंज जिल्ह्यातील लौर गावातील तरूणीशी लग्न झालं होतं.

तक्रार दाखल होताच पोलिसांची कारवाई

पीडितेच्या तक्रारीवरून तात्काळ कारवाई करत पोलिसांनी आरोपीला अटक केली. तेव्हा तो लग्नानंतर वधूसोबत त्याच्या घरी पोहोचला. गृहप्रवेश करण्यापूर्वीच पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या. कलम ३७६ आणि ३७६ (२) एन अंतर्गत आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रेमिकेला धोका

नुकतेच फतेहपूरमध्येही असाच प्रकार उघडकीस आला होता. जिल्ह्यात एका तरुणाने लग्नाच्या बहाण्याने प्रेयसीसोबत शारीरिक संबंध ठेवले. 5 वर्ष शारीरिक संबंध राखले आणि ती मुलगी गरोदर झाल्यावर औषध देऊन तिचा गर्भपात करून दुसऱ्या ठिकाणी लग्न करण्याचा निर्णय घेतला.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.