AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आधी नाकाला चटका दिला, मग चपलांचा हार घातला; त्यानंतर जे केले त्याने क्रूरतेच्या सर्व सीमा ओलांडल्या

22 ऑगस्ट 2022 रोजी ही घटना घडली होती. यानंतर पीडित जोडप्याने पोलीस ठाणे तक्रार दाखल केली. मात्र पोलिसांनी आरोपींवर कारवाई करण्याऐवजी प्रकरणावर पडदा टाकण्याचे काम केले.

आधी नाकाला चटका दिला, मग चपलांचा हार घातला; त्यानंतर जे केले त्याने क्रूरतेच्या सर्व सीमा ओलांडल्या
खेळायला गेलेली चिमुकली घरी परतलीच नाहीImage Credit source: TV9 Marathi
| Updated on: Nov 19, 2022 | 8:29 PM
Share

जयपूर : राजस्थानमधील जयपूर अतिशय संतापजनक घटना उघडकीस आली आहे. अनैतिक संबंध ठेवल्याच्या कारणातून एका जोडप्याला भयंकर शिक्षा दिल्याची घटना राजस्थानमधील जयपूरमध्ये घडली आहे. जोडप्याला चपलांचा हार घातला, त्यांच्या नाकाला गरम चिमट्याचे चटके दिले. नराधम एवढ्यावरच थांबले नाहीत यानंतर त्यांनी जोडप्याला लघवीही पाजली. या शिक्षेसोबतच 45 हजार रुपयांचा दंड ठोठावला. धक्कादायक म्हणजे तीन महिन्यांपूर्वी ही घटना घडली होती. मात्र पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नव्हती. आता व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर ही घटना उघडकीस आली.

व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर प्रकरण उघडकीस

22 ऑगस्ट 2022 रोजी ही घटना घडली होती. यानंतर पीडित जोडप्याने पोलीस ठाणे तक्रार दाखल केली. मात्र पोलिसांनी आरोपींवर कारवाई करण्याऐवजी प्रकरणावर पडदा टाकण्याचे काम केले.

व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे. पोलीस आता या प्रकरणाचा नव्याने तपास करत आहेत.

काय आहे प्रकरण?

पीडित तरुणाचा 2006 मध्ये विवाह झाला होता. मात्र विवाहानंतर पत्नीचा हुंड्यासाठी छळ होऊ लागल्याने 2015 पासून त्याच्याविरोधात खटला सुरु आहे. यादरम्यान त्याने दुसरा विवाहही केला.

मात्र विवाहानंतर काही दिवसांनी त्याचे पहिल्या पत्नीच्या वहिनाशी अनैतिक संबंध असल्याची चर्चा सुरु झाली. यामुळे त्याचे आधीचे सासरवाडीतले लोक नाराज होते. याचप्रकरणी त्यांनी तरुणाला 22 ऑगस्ट 2022 रोजी आपल्या घरी बोलावले.

सासरवाडीत पोहचल्यानंतर तरुणासह पत्नीच्या वहिनीला बेदम मारहाण केली. यानंतर पोलीस कारवाईची कुणकुण लागताच प्रेमी जोडप्याला माधोराजपुरा येथे नेले. तेथे समाजातील पंचांसोबत पंचायत झाली.

यानंतर पंचायतीच्या समोरच दोघांना लघवी पाजून गळ्यात चपलांचा हार घालण्यात आला. तसेच दोघांच्या नाकाल गरम चिमट्याचे चटकेही देण्यात आले.

Follow Us
खरात प्रकरणावरून राजकीय वर्तुळात गदारोळ; मंत्री शिरसाट म्हणाले....
खरात प्रकरणावरून राजकीय वर्तुळात गदारोळ; मंत्री शिरसाट म्हणाले.....
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात.
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत.
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास.
150 व्हिडिओ, मोठा तपास; तरीही नीलम गोऱ्हे का गप्प? खरात प्रकरणावर....
150 व्हिडिओ, मोठा तपास; तरीही नीलम गोऱ्हे का गप्प? खरात प्रकरणावर.....
नीलम गोऱ्हे आणि अशोक खरात भेटीवर प्रश्नचिन्ह
नीलम गोऱ्हे आणि अशोक खरात भेटीवर प्रश्नचिन्ह.
आदित्य ठाकरे थेट भाजपच्या बड्या नेत्याच्या घरी, राजकीय चर्चांना उधाण
आदित्य ठाकरे थेट भाजपच्या बड्या नेत्याच्या घरी, राजकीय चर्चांना उधाण.
39 आमदार भेटले होते, मग फक्त मलाच का टार्गेट केलं जातंय?
39 आमदार भेटले होते, मग फक्त मलाच का टार्गेट केलं जातंय?.
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.