AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Jaipur-Mumbai Train Firing | मुलगा गोव्यात, पत्नी-मुलगी घरी…. ASI टीकाराम यांच्या मृत्यूबाबत कुटुंबिय अद्यापही अनभिज्ञ ?

जयपूर-मुंबई पॅसेंजर ट्रेनमधील गोळीबाराच्या घटनेने एकच खळबळ उडाली. या हल्ल्यात एएसआय टीकाराम यांच्यासह तिघांचा मृत्यू झाला.

Jaipur-Mumbai Train Firing | मुलगा गोव्यात, पत्नी-मुलगी घरी....  ASI टीकाराम यांच्या मृत्यूबाबत कुटुंबिय अद्यापही अनभिज्ञ ?
जयपूर-मुंबई एक्सप्रेस गोळीबारातील चौथ्या मृतदेहाची ओळख पटली
| Updated on: Jul 31, 2023 | 2:13 PM
Share

मुंबई | 31 जुलै 2023 : जयपूर-मुंबई पॅसेंजर ट्रेनमध्ये (train) सोमवारी सकाळी झालेल्या गोळीबाराच्या घटनेने सर्वच हादरले आहेत. या हल्ल्यात चौघांचा मृत्यू झाला आहे. आज पहाटे 5 वाजून 23 मिनिटांनी ही धक्कादायक घटना घडली. आरपीएफचा कॉन्स्टेबल चेतन याने हा गोळीबार केला. या गोळीबारात एएसआय टीकाराम मीणा यांच्यासह आणखी तिघाजणांचा मृत्यू झाला.

गोळीबारामुळे हे चौघेही जागीच मृत्यूमुखी पडले. जयपूर-मुंबई पॅसेंजमधील बी-5 कोचमध्ये ही घटना घडली. आरपीएफ कॉन्स्टेबल चेतन याने हा गोळीबार केला. तेव्हा तो एस्कॉर्ट ड्युटीवर होता. गोळीबारानंतर त्याने धावत्या ट्रेनमधून उडी मारली. या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेले एएसआय टीकाराम हे राजस्थानमधील सवाई माधोपूर जिल्ह्यातील श्यामपुरा गावचे रहिवासी होते.

या घटनेचे वृत्त कळताच संपूर्ण श्यामपुरा गावावर शोककळा पसरली आहे. सर्व गावकरी या घटनेमुळे निशब्द झाले आहेत. मात्र एएसआय यांच्या पत्नीला या घटनेबाबत अद्याप गावकरी व कुटुंबियांनी काहीही सांगितलेले नाही. आत्ताच त्यांना याबाबत सांगितल्यास त्या अतिशय भावुक होतील. एएसआय टीकाराम यांचा मृतदेह (गावात) येण्यास अद्याप बराच वेळ लागू शकतो. त्यामुळे त्यांच्या घरच्यांना या गोष्टीची कल्पना देण्यात आलेली नाही.

कुटुंबियांना अद्याप दिली नाही माहिती

या घटनेबाबत बोलण्यासाठी कोणीही त्यांच्या कुटुंबियांपर्यंत पोहोचू नये याची काळजी घेण्यात येत आहे. मृत एएसआय टीकाराम यांना एका मुलगा व मुलगी असून लेकीचे लग्न झाले आहे. तर मुलगाही विवाहीत असून झाले असून तो बेरोजगार असल्याचे समजते. तो सध्या गोव्याला गेला आहे. त्याला या घटनेबाबात समजले असून तो परत येण्यास निघाल्याचे समजते.

संपूर्ण गावावर पसरली शोककळा

टीकाराम यांच्या घराच्या आसपास शांतता आहे. संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. त्यांची पत्नी व आई यांना अद्याप याबाबत सांगण्यात आलेले नाही. मृत एएसआय टीकाराम शेतकरी परिवारातून असून त्यांच्या नावे काही जमीन आहे. त्यांचा मृतदेह येण्याची गावकरी वाट बघत आहेत.

अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय,प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय,प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा.
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी.
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण.