AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबई-वाराणसी रेल्वेतून मृतदेह गायब, बारा तासांनी 200 किमी दूर मध्य प्रदेशात सापडला

गार्डच्या कम्पार्टमेंटमध्ये शवपेटीत ठेवलेला मृतदेह गायब झाल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात होतं. तब्बल 12 तासांच्या कालावधीनंतर 200 किमी दूर मध्य प्रदेशातील स्टेशनजवळ मृतदेह सापडला.

मुंबई-वाराणसी रेल्वेतून मृतदेह गायब, बारा तासांनी 200 किमी दूर मध्य प्रदेशात सापडला
रेल्वेतून मृतदेह गायब झाल्याची घटना घडली होती
| Updated on: Sep 15, 2021 | 12:15 PM
Share

मुंबई : मुंबई-वाराणसी विशेष रेल्वेमधील मृतदेह गायब झाल्याने एकच खळबळ उडाली होती. मात्र बारा तासांनी हा मृतदेह मध्य प्रदेशातील स्टेशनजवळ सापडल्याची माहिती आहे. गार्डच्या कम्पार्टमेंटमधून मृतदेह गायब झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली होती. मृतदेह मुंबईहून प्रयागराजला नेला जात असताना हा प्रकार घडला.

गार्डच्या कम्पार्टमेंटमध्ये शवपेटीत ठेवलेला मृतदेह गायब झाल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात होतं. तब्बल 12 तासांच्या कालावधीनंतर 200 किमी दूर मध्य प्रदेशातील स्टेशनजवळ मृतदेह सापडला.

काय आहे प्रकरण?

लोकमान्य टिळक टर्मिनसवरुन गाडी नंबर 2117 लोकमान्य टिळक टर्मिनस-वाराणसीतून मृतदेह नेण्यासाठी बुकिंग करण्यात आले होते. मात्र गार्डच्या कम्पार्टमेंटमधून अचानक डेड बॉडी गायब झाल्याचं त्यांच्या कुटुंबीयांच्या लक्षात आलं. त्यानंतर जीआरपी आणि आरपीएफ यांना सांगण्यात आलं.

शोधाशोध केल्यानंतर संबंधित मृतदेह मध्य प्रदेशातील मेहर रेल्वे स्टेशनवर असल्याचं बारा तासांनी जीआरपीला माहित झालं. त्याच्यानंतर त्याच्या कुटुंबाला हा मृतदेह सुपूर्द करण्यात आला. नेमकं काय झालं, याविषयी पुढचा तपास रेल्वे करत आहे.

सुटकेसमध्ये मृतदेह

याआधी, वसईच्या भुईगाव समुद्रकिनारी एका सुटकेसमध्ये अनोळखी महिलेचा मृतदेह आढळला होता. या महिलेची हत्या करुन, मुंडकं धडापासून वेगळं करून तो मृतदेह सुटकेसमध्ये भरुन समुद्रात फेकलेला असावा, असा अंदाज वर्तवण्यात येत होता. वसईच्या भुईगाव समुद्र किनारी 26 जुलै रोजी दुपारी हा मृतदेह मिळाला होता. सुटकेसमध्ये मृतदेह कुजलेल्या स्थितीत असून मृतदेहाच्या अंगात ड्रेस घातलेला होता.

वसईतील बीचवर नवविवाहितेचा मृतदेह

दरम्यान, मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडलेल्या 30 वर्षांच्या महिलेचा मृतदेह आढळल्याची धक्कादायक घटना 11 जुलैला उघडकीस आली होती. वसईच्या किल्ला बंदर समुद्र किनाऱ्यावर ममता पटेल हिचा मृतदेह सापडला होता. ती चार दिवसांपासून बेपत्ता होती. ममता पटेल वसईच्या एव्हरशाईन परिसरात राहत होती. ती मूळ गुजरातमधील नवसारी येथील रहिवासी होती. अवघ्या दोन महिन्यांपूर्वी तिचा विवाह झाला होता.

संबंधित बातम्या :

वसई किनाऱ्यावर सुटकेसमधून दुर्गंध, उघडून पाहिलं तर धडापासून वेगळा असलेला महिलेचा मृतदेह

आधी विवाहितेचा मृतदेह, आता वसईतील त्याच बीचवर पुरुषही मृतावस्थेत, हातावर नाव गोंदवलेलं

मॉर्निंग वॉकहून परतलीच नाही, वसईतील बीचवर नवविवाहितेचा मृतदेह आढळला

महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन.
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?.
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा.
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर.
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?.
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा.
नगरपालिका निवडणुकीनंतर राड्यानंतर आता EVM लाा CCTV, पोलिसांचा पहारा
नगरपालिका निवडणुकीनंतर राड्यानंतर आता EVM लाा CCTV, पोलिसांचा पहारा.
ईदला बकरीला मिठ्या... तपोवनचं साधूग्राम अन् राणेंनी आणलं हिंद-मुसलमान!
ईदला बकरीला मिठ्या... तपोवनचं साधूग्राम अन् राणेंनी आणलं हिंद-मुसलमान!.
दादांच्या मुलाच डेस्टिनेशन वेडिंग,असं असणार जय पवारांचं बहरीनमधलं लग्न
दादांच्या मुलाच डेस्टिनेशन वेडिंग,असं असणार जय पवारांचं बहरीनमधलं लग्न.