AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

चोरट्यांचे धाडस वाढले, एक-दोन नव्हे तर 13 पोलीस अधिकाऱ्यांच्या घरात चोरी

Mumbai Police: चोरांनी पोलीस कर्मचाऱ्यांची घरे लक्ष केल्यामुळे हा चर्चेचा विषय ठरला आहे. पोलीस वसाहत सुरक्षित नसेल तर सर्वसामान्य व्यक्तींची घरे कशी सुरक्षित राहणार? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला आहे. 

चोरट्यांचे धाडस वाढले, एक-दोन नव्हे तर 13 पोलीस अधिकाऱ्यांच्या घरात चोरी
crime news Image Credit source: TV9 NEWS NETWORK
| Updated on: Aug 20, 2024 | 12:51 PM
Share

चोर आणि पोलीस यांच्यात नेहमी द्वंद सुरु असते. परंतु चोरटे कधी पोलिसांच्या घरात चोरी करण्याची हिंमत करत नाही. मुंबईतील या चोरट्यांनी मुंबई पोलिसांच्या घरातच डल्ला मारला. मुंबई पोलीस अधिकाऱ्यांच्या माहीम येथे असणाऱ्या पोलीस कॉलनीतील तेरा पोलिसांच्या घरात चोरी केली. या चोरट्यांनी पोलीस अधिकाऱ्यांच्या घरातून रोकड आणि मौल्यवान वस्तू सोबत देवाच्या चांदीच्या मूर्तीची चोरी केली. यामुळे पोलीस अधिकाऱ्यांनावरच मोहीम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचा प्रसंग आला.

पोलिसांच्या बंद घरांना लक्ष

राज्यात गुन्हे वाढत चालले आहे. गुंडांच्या टोळ्याही वाढल्या आहेत. भुरटे चोरटे ठिकाठिकाणी चोऱ्या करत असतात. परंतु एखाद्या पोलीस कॉलनीत जाऊन हातसफाई करणारे चोरटे हिंदी चित्रपटातच दिसले. मात्र, आता मुंबई पोलिसांना या चोरट्यांनी नाकीनऊ आणले आहे. चोरट्यांनी रात्रपाळीवर असलेले पोलीस कर्मचारी, सुट्टीनिमित्त गावी गेलेल्या पोलिसांची घर तसेच निवृत्त पोलिसांच्या बंद घरांना लक्ष केले. या घरांमधील वस्तू चोरऱ्या. तसेच पोलीस कॉलनीच्या शेजारील वसाहतीतील प्ले ग्रुप, नर्सरी आणि वसाहतीच्या कार्यालयांमध्ये देखील चोरांनी चोरी केली. आता माहीम पोलीस त्या चोरांचा शोध घेत आहे.

सीसीटीव्ही फुटेजची तपासणी

माहीम पोलीस ठाण्यातील एका अधिकाऱ्याने सांगितले की, 16 ते 17 ऑगस्ट दरम्यान चोरट्यांनी 13 पोलीस अधिकाऱ्यांकडे चोरी केली. ज्या घरांमध्ये चोरी झाली, त्या घरातील अधिकारी घरात नव्हते. घर बंद असल्याची संधी साधून ही चोरी केली गेली. पोलीस परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करत आहेत. त्यातून चोरांचा शोध घेतला जाणार आहे.

चोरांनी पोलीस कर्मचाऱ्यांची घरे लक्ष केल्यामुळे हा चर्चेचा विषय ठरला आहे. पोलीस वसाहत सुरक्षित नसेल तर सर्वसामान्य व्यक्तींची घरे कशी सुरक्षित राहणार? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला आहे.

Follow Us
कर्ज काढून फटाके वाजवणारा अर्थसंकल्प; ठाकरेंची सरकारवर जोरदार टीका
कर्ज काढून फटाके वाजवणारा अर्थसंकल्प; ठाकरेंची सरकारवर जोरदार टीका.
कर्जमाफीची फडणवीसांकडून घोषणा, कृषीमंत्र्यांनी मानले सरकारचे आभार
कर्जमाफीची फडणवीसांकडून घोषणा, कृषीमंत्र्यांनी मानले सरकारचे आभार.
अर्थसंकल्पात खेळाडूंना जागतिक दर्जाच्या सुविधा; 12 खेळांसाठी....
अर्थसंकल्पात खेळाडूंना जागतिक दर्जाच्या सुविधा; 12 खेळांसाठी.....
अर्थसंकल्पात लाडकी बहीण योजनाबाबत मोठी घोषणा, फडणवीस नेमकं काय म्हणाले
अर्थसंकल्पात लाडकी बहीण योजनाबाबत मोठी घोषणा, फडणवीस नेमकं काय म्हणाले.
नियमित कर्जाची फेड करणाऱ्या शेतकऱ्यांना काय मिळणार?
नियमित कर्जाची फेड करणाऱ्या शेतकऱ्यांना काय मिळणार?.
वडाळा ते गेट-वे ऑफ इंडिया भूमिगत मेट्रो होणार! मुख्यमंत्र्यांची घोषणा
वडाळा ते गेट-वे ऑफ इंडिया भूमिगत मेट्रो होणार! मुख्यमंत्र्यांची घोषणा.
प्रतीक्षा संपली! अखेर शेतकरी कर्जमाफीची घोषणा; काय म्हणाले फडणवीस?
प्रतीक्षा संपली! अखेर शेतकरी कर्जमाफीची घोषणा; काय म्हणाले फडणवीस?.
राज्याच्या बजेटमध्ये 10 महत्वाच्या घोषणा कोणत्या? पाहा व्हिडीओ
राज्याच्या बजेटमध्ये 10 महत्वाच्या घोषणा कोणत्या? पाहा व्हिडीओ.
जब इरादा बना लिया है...; बजेट मांडत असताना फडणवीसांकडून शेरो शायरी
जब इरादा बना लिया है...; बजेट मांडत असताना फडणवीसांकडून शेरो शायरी.
परवडणाऱ्या 10 लाख घरांचा विकास आराखडा तयार करणार
परवडणाऱ्या 10 लाख घरांचा विकास आराखडा तयार करणार.