AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तानसा नदीत बुडालेल्या तृतीयपंथीयांपैकी एकाचा मृतदेह 25 तासांनंतर सापडला, दोघे बेपत्ताच

मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील खानिवडे जवळील तानसा नदीत आंघोळीच्या वेळी ही दुर्घटना घडली. गुरुवारी घटस्थापना असल्याने दुर्गा पूजे निमित्त सहा तृतीयपंथी आंघोळीसाठी तानसा नदीवर आले होते.

तानसा नदीत बुडालेल्या तृतीयपंथीयांपैकी एकाचा मृतदेह 25 तासांनंतर सापडला, दोघे बेपत्ताच
प्रातिनिधिक फोटो
| Edited By: | Updated on: Oct 08, 2021 | 3:11 PM
Share

विरार : विरारच्या तानसा नदीत बुडालेल्या तिघा तृतीयपंथीयांपैकी एकाचा मृतदेह 25 तासांनंतर सापडला. हारिका अंदुकोरी असे मृतदेह मिळालेल्या तृतीयपंथीयाचे नाव आहे. तर आणखी दोघे तृतीयपंथी अद्यापही बेपत्ताच आहेत. गुरुवारी सकाळी 10 वाजता तानसा नदीत आंघोळ करण्यासाठी गेलेले तिघे पाण्यात बुडाले होते. वसई विरार महापालिका अग्निशमन दल, स्थानिक मच्छिमार आणि पोलिसांकडून शोधकार्य सुरुच आहे.

नेमकं काय घडलं?

मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील खानिवडे जवळील तानसा नदीत आंघोळीच्या वेळी ही दुर्घटना घडली. गुरुवारी घटस्थापना असल्याने दुर्गा पूजे निमित्त सहा तृतीयपंथी आंघोळीसाठी तानसा नदीवर आले होते. यावेळी पाण्याचा अंदाज न आल्याने त्यातील तिघे जण नदीत बुडाले. तर तिघे बाहेर आले. गुरुवारी सकाळी दहा-साडेदहा वाजताच्या सुमारास हा प्रकार घडला होता.

हारिका अंदुकोरी (वय 39 वर्ष) असं मयत तृतीयपंथीयाचं नाव आहे. तर सुनिता गोणामुडी उर्फ पुरी (वय 27 वर्ष), प्राची आकुला (वय 23 वर्ष) हे दोघे बेपत्ता आहेत. वसई विरार महानगरपालिकेची अग्निशमन दलाचे जवान, विरार पोलीस आणि स्थानिक नागरिक त्यांचा शोध घेत आहेत.

नाशिकमध्ये रामकुंड परिसरात चार दिवसांत चौघे बुडाले

दुसरीकडे, नाशिक जिल्ह्यात गेल्या काही दिवसात जोरदार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे गोदावरी नदीला चारदा पूर आला. जिल्ह्यातील सर्व धरणे भरली आहेत. त्यामुळे धरणांवर पोलिस बंदोबस्त तैनात करून या परिसरात नागरिकांना फिरकण्यास जिल्हाधिकाऱ्यांनी मनाई केली आहे. मात्र, नाशिक शहरातील रामकुंड परिसरात अनेक भाविक दर्शनासाठी येतात. त्यात गेल्या चार दिवसांत पाण्याचा अंदाज न आल्याने आणि पाय घसरून पडल्याने चौघा जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

पहिली घटना रामकुंडाजवळच्या गांधी तलावात घडली होती. उत्तम नगरमधल्या गणेश कॉलनीतले महाजन कुटुंब देवदर्शनासाठी आले होते. या कुटुंबातील रावसाहेब महाजन (वय 36) यांचा पाय घसरला आणि ते गोदापात्रात कोसळले. त्यांना शोधण्यासाठी जीवरक्षक जवानांनी खूप प्रयत्न केले. मात्र, पाण्याची पातळी जास्त असल्याने त्यांना अपयश आले. खूप उशिराने त्यांचा मृतदेह हाती लागला. रावसाहेब यांच्या मागे पत्नी, मुलगी, आई, वडील, भाऊ आणि दोन बहिणी असा परिवार आहे.

हेही वाचा :

बलात्कारात अपयशी ठरल्यानंतर बापाने मुलीच्या प्रायव्हेट पार्टमध्ये काठी घातली, सहा वर्षाची चिमुकली वेदनांनी विव्हळत राहिली

जिच्यासोबत सात जन्मांच्या सोबतीची शपथ घेतली तिनेच घात केला, प्रसिद्ध उद्योगपतीच्या हत्येचं गूढ अखेर उकललं

Follow Us
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध.
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्...
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्....
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात..
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात...
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,.
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल.
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी.
मालेगाव बॉम्बस्फोट 2006 प्रकरणात सर्व 4 आरोपींना मोठा दिलासा
मालेगाव बॉम्बस्फोट 2006 प्रकरणात सर्व 4 आरोपींना मोठा दिलासा.
रितेश- जेनेलियाच्या हाती लालपरीचे स्टेरिंग, देशमुख कपल करणार एसटी....
रितेश- जेनेलियाच्या हाती लालपरीचे स्टेरिंग, देशमुख कपल करणार एसटी.....
अमरावतीच्या लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अयानची पोलिसांनी काढली धिंड
अमरावतीच्या लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अयानची पोलिसांनी काढली धिंड.
व्हायरल व्हिडिओनंतर गिरीश महाजनांचं स्पष्टीकरण काय?
व्हायरल व्हिडिओनंतर गिरीश महाजनांचं स्पष्टीकरण काय?.