AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दाम्पत्यासोबत युवती फिरायला गेली ती परतलीच नाही, तिच्याबाबत नेमकं काय घडलं?

नागपुरातील मुलीला राजस्थानमध्ये नेण्यात आलं. तिला एका दाम्पत्याने पैसे घेऊन लग्न लावून दिलं. असा धक्कादायक प्रकार पोलिसांच्या तपासात पुढे आला.

दाम्पत्यासोबत युवती फिरायला गेली ती परतलीच नाही, तिच्याबाबत नेमकं काय घडलं?
| Edited By: | Updated on: Jul 21, 2023 | 4:29 PM
Share

नागपूर : राजस्थानात मुलींची संख्या कमी आहे. त्यामुळे गरजू मुली पाहिल्या जातात. त्यांना रोजगाराचं आमिष दाखवून राजस्थानात नेले जाते. तिथं त्यांचं लग्न लावून दिलं जाते. यात कमिशनवर काम करणारे काही दलाल सक्रिय आहेत. असाच एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला. ही घटना आहे नागपूरच्या बेलतरोडी पोलीस स्टेशन हद्दीतील. एक मुलगी ओळखीच्या दाम्पत्यासह फिरायला राजस्थानमध्ये गेली. मात्र ती परत आलीच नाही. त्यामुळे परिवारातील लोकांनी मिसिंगची तक्रार दाखल केली. या तक्रारीचा तपास पोलिसांनी केला. मुलीला राजस्थानमध्ये नेल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांच्या टीमने राजस्थान गाठत मुलीचा शोध घेतला. आधी त्या दाम्पत्याला ताब्यात घेऊन विचारपूस करण्यात आली. त्यांनी मुलीचं लग्न झाल्याचं सांगितलं.

ज्या युवकाशी मुलीचं लग्न लावण्यात आलं होतं त्याचा शोध पोलिसांनी घेतला. तो सापडल्यानंतर सगळा प्रकार पोलिसांच्या समोर आला. पोलिसांनी मुलीची चौकशी केली. मुलीने आपली फसवणूक झाल्याचं सांगितलं.

मुलासह दाम्पत्याला अटक

पैसे घेऊन लग्न लावून दिल्याचं सांगितलं. त्यावरून पोलिसांनी राजस्थानातील त्या मुलांसह नागपुरातील दाम्पत्याला अटक केली. अशी माहिती बेलतरोडीचे पोलीस निरीक्षक वैजनती मंडवधारे यांनी दिली.

पोलिसांनी या मुलीची सुटका करून तिला परिवाराच्याया स्वाधीन केलं. मात्र आणखी काही मुलींना अशाचप्रकारे फसवण्यात आलं का, याचा शोध पोलीस घेत आहेत.

पोलीस तपासात धक्कादायक प्रकार समोर

फिरायला जाण्याचं सांगत नागपुरातील मुलीला राजस्थानमध्ये नेण्यात आलं. तिला एका दाम्पत्याने पैसे घेऊन लग्न लावून दिलं. असा धक्कादायक प्रकार पोलिसांच्या तपासात पुढे आला. नागपूरच्या बेलतरोडी पोलिसांनी मुलीची राजस्थानमधून सुटका केली. तसचे तीन आरोपींना अटक केली.

अशाप्रकारच्या आणखी काही घटना या दाम्पत्याकडून केली जाण्याची शक्यता आहे. त्या दिशेने पोलीस तपास करत आहेत. आणखी किती मुलींना या दाम्पत्याने फसवले हे तपासात उघड होईल.

गडचिरोलीत शेतकरी खुश, लाल मिरचीला चांगला दर; एक क्विंटलचा भाव तब्बल..
गडचिरोलीत शेतकरी खुश, लाल मिरचीला चांगला दर; एक क्विंटलचा भाव तब्बल...
विलिनीकरणावर सुनेत्रा पवारच योग्य निर्णय घेतील; भरणेंचा ठाम विश्वास
विलिनीकरणावर सुनेत्रा पवारच योग्य निर्णय घेतील; भरणेंचा ठाम विश्वास.
अजितदादांना ते कॉन्ट्रक्ट नको होते, रोहित पवार यांच्या दाव्याने खळबळ
अजितदादांना ते कॉन्ट्रक्ट नको होते, रोहित पवार यांच्या दाव्याने खळबळ.
कोश्यारींना खूप चोपला असता... नाव बदलावे; मनसेचं आक्रमक प्रत्युत्तर
कोश्यारींना खूप चोपला असता... नाव बदलावे; मनसेचं आक्रमक प्रत्युत्तर.
तुम करो तो रासलीला, हम करे तो... मनसेचा ठाकरे सेनेवर हल्लाबोल
तुम करो तो रासलीला, हम करे तो... मनसेचा ठाकरे सेनेवर हल्लाबोल.
नाशिकमध्ये घाटांचे सुशोभीकरणाचे काम सुरु करताच पर्यावरणप्रेमी संतापले
नाशिकमध्ये घाटांचे सुशोभीकरणाचे काम सुरु करताच पर्यावरणप्रेमी संतापले.
एका डोळ्यात आनंद, एका डोळ्यात अश्रू; सुळे दादांच्या आठवणींनी भावूक
एका डोळ्यात आनंद, एका डोळ्यात अश्रू; सुळे दादांच्या आठवणींनी भावूक.
पैशाचा महापूर येऊन सुद्धा निष्ठेची भिंत तोडता आली नाही
पैशाचा महापूर येऊन सुद्धा निष्ठेची भिंत तोडता आली नाही.
मुंबई महापालिकेत 40 वर्षांनंतर भाजपचा महापौर; शपथविधी सोहळ्यात...
मुंबई महापालिकेत 40 वर्षांनंतर भाजपचा महापौर; शपथविधी सोहळ्यात....
तपास यंत्रणांवरून संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल
तपास यंत्रणांवरून संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल.