AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हनीमूनच्या रात्री बेडवर पत्नी वाट पाहत बसली, पतीनं केलं असं काही अख्ख गाव हादरलं

नीरज आणि लक्ष्मीचं 11 मे रोजी लग्न झालं होतं. हनीमूनच्या रात्रीच ही दुर्दैवी घटना घडली आहे. विशेष म्हणजे दोघांचा प्रेमविवाह झाला होता.

हनीमूनच्या रात्री बेडवर पत्नी वाट पाहत बसली, पतीनं केलं असं काही अख्ख गाव हादरलं
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: May 14, 2025 | 9:54 PM
Share

प्रत्येक लग्न झालेल्या स्त्रीचं स्वप्न असतं की, तीचं वैवाहिक आयुष्य हे आनंदी आणि सुखी असावं. लग्न झाल्यानंतर आपन आपल्या पतीचं घर आनंदानं भरून टाकू असा तिला विश्वास असतो. मात्र काही घटना अशा घडतात की क्षणात या स्वप्नाचा चुराडा होतो. अशीच एक घटना उत्तर प्रदेशच्या हरदोई जिल्ह्यातून समोर आली आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. नुकतंच लग्न झालेली वधू हनीमूनच्या रात्री आपल्या पतीची वाट पाहात होती, मात्र अचानक असं काही घडलं ज्यामुळे क्षणात या तरुणीचं आयुष्य उद्ध्वस्त झालं. जेव्हा घडलेला प्रकार वधुने आपल्या घरी सांगितला तेव्हा तिच्या कुटुंबाला देखील मोठा धक्का बसला.

नीरज असं या घटनेतील पतीचं नाव आहे, तर लक्ष्मी असं पत्नीचं नाव आहे. नीरज आणि लक्ष्मी यांचा प्रेमविवाह झाला होता. मधुचंद्राची रात्र होती. त्या दिवशी दोघेही बेडरूममध्ये गेले. त्यानंतर नीरजने लक्ष्मीला मी थोड्या वेळात येतो असं सांगितलं आणि तो रूममधून बाहेर पडला, लक्ष्मी आपल्या पतीची वाट पाहात बसली तर दुसरीकडे नीरजने मात्र गळफास घेऊन आपलं आयुष्य संपवलं, या घटनेनं त्याच्या पत्नीला मोठा धक्का बसला आहे, अख्ख गावं हादरलं आहे. गावातून हळहळ व्यक्त होत आहे.

नीरज आणि लक्ष्मीचं 11 मे रोजी लग्न झालं होतं. हनीमूनच्या रात्रीच ही दुर्दैवी घटना घडली आहे. विशेष म्हणजे दोघांचा प्रेमविवाह होता. मी थोड्यावेळात येतो असं सांगून निरज घराबाहेर पडला, मात्र तो खूप वेळ झाला तरी देखील घरी परतलाच नाही. म्हणून त्याच्या घरच्यांनी गावकऱ्यांच्या मदतीनं त्याचा शोध घेतला, तो आपल्याच शेतात एका झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेमध्ये आढळून आला. दरम्यान त्याने टोकाचं पाऊल का उचललं याच कोणतंही कारण अद्याप समोर आलेलं नाहीये.

घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले, त्यांनी मृतदेह ताब्यात घेतला, ही आत्महत्या आहे की घातपात हे अद्याप स्पष्ट झालेलं नाहीये, शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. पोलिसांना घटनास्थळी कोणतीही सुसाईड नोट आढळून आलेली नाहीये.

कुलाब्यातून नार्वेकरांचे 3 नातेवाईक बीएमसी निवडणुकीच्या रिंगणात
कुलाब्यातून नार्वेकरांचे 3 नातेवाईक बीएमसी निवडणुकीच्या रिंगणात.
नाशकात शिंदेंची सेना अन दादांची NCP एकत्र, भाजप स्वबळावर निवडणूक लढणार
नाशकात शिंदेंची सेना अन दादांची NCP एकत्र, भाजप स्वबळावर निवडणूक लढणार.
मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र
मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र.
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?.
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला.
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी.
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्....
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्.....
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य.
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी.
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले...
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले....