AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पळून लग्न करायला जाताना बाईक अपघात, प्रेयसीचा जागीच मृत्यू, प्रियकर गंभीर

22 वर्षीय विद्यार्थिनीचे शेजारी राहणाऱ्या तरुणासोबत प्रेमसंबंध होते. मुलीच्या कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार दोघांनाही लग्न करायचे होते. मात्र मुलाच्या कुटुंबीयांचा या नात्याला विरोध होता.

पळून लग्न करायला जाताना बाईक अपघात, प्रेयसीचा जागीच मृत्यू, प्रियकर गंभीर
फरार आरोपी नगरसेवक संजय तेलनाडे अडीच वर्षांनी गजाआड
| Edited By: Anish Bendre | Updated on: Dec 12, 2021 | 1:43 PM
Share

लखनौ : उत्तर प्रदेशातील पिलीभीत जिल्ह्यात प्रियकरासोबत बाईकने जात असलेल्या प्रेयसीचा अपघातात मृत्यू झाला. या अपघातात प्रियकरही जबर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दोघंही जण पळून जाऊन लग्न करणार असल्याची माहिती आहे. मात्र प्रेयसीच्या नातेवाईकांनी प्रियकरावर तरुणीची बलात्कार करुन हत्या केल्याचा आरोप केला आहे. या तक्रारीवरून पोलिसांनी प्रियकरावर गुन्हा दाखल केला आहे.

काय आहे प्रकरण?

उत्तर प्रदेशातील पिलीभीत जिल्ह्यातील जेहानाबाद शहरातील एका 22 वर्षीय विद्यार्थिनीचे शेजारी राहणाऱ्या तरुणासोबत प्रेमसंबंध होते. मुलीच्या कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार दोघांनाही लग्न करायचे होते. मात्र मुलाच्या कुटुंबीयांचा या नात्याला विरोध होता. शुक्रवारी सकाळी प्रियकराने तिला भेटण्यासाठी बोलावले. त्यानंतर कुटुंबीयांना सांगून तरुणी प्रियकरासह निघून गेली.

प्रेयसीचा जागीच अंत

पिलीभीत जिल्ह्यातील गजरौला पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जंगलात बाईक झाडावर आदळून झालेल्या अपघातात तरुणीचा जागीच मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेत मोटारसायकल चालवणारा प्रियकरही गंभीर जखमी झाला. त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेची माहिती मिळताच तरुणीच्या नातेवाईकांनी शनिवारी जिल्हा रुग्णालयात जाऊन गोंधळ घातला.

बलात्कारानंतर हत्येचा आरोप

एवढेच नाही तर प्रेयसीच्या नातेवाईकांनी पोलिसांवर आरोप केला की, त्यांच्या मुलीवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली आहे. मात्र पोलिसांना हा अपघात असल्याचे दाखवून संपूर्ण प्रकरण दडपायचे असल्याचाही दावा केला जात आहे. या संपूर्ण प्रकरणाची माहिती देताना अतिरिक्त पोलीस अधीक्षक पवित्र मोहन त्रिपाठी यांनी सांगितले की, अपघातात विद्यार्थिनीचा मृत्यू झाला आहे. तर तिच्या प्रियकरालाही गंभीर दुखापत झाली आहे. त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

या प्रकरणी मुलीच्या कुटुंबीयांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे गुन्हा दाखल करण्यात आला असून मुलीच्या मृतदेहाचे व्हिडीओग्राफी करून शवविच्छेदन करण्यात येणार आहे. त्याचवेळी गावातील लोकांचे म्हणणे आहे की मुलगा आणि मुलगी सकाळपासून घरातून बेपत्ता होते, दोघेही लग्न करणार होते, त्याच वेळी ही भीषण घटना घडली.

संबंधित बातम्या :

‘संसार रिक्षेची चाके थांबली, आत्महत्येशिवाय पर्याय नाही’, एकाच कुटुंबातील चौघांचे विषप्राशन

गुप्तधनाचे अमिष,10 लाख उकळले, पैसे परत मागितले तर म्हणे कोंबडा बनवतो, भोंदूला अटक!

बसची सिमेंट बल्करला धडक, मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर चार गाड्यांचा विचित्र अपघात, तिघांचा मृत्यू

Follow Us
सरकारचा मोठा निर्णय! मराठा आंदोलनातील 34 कुटुंबांना 3.40 कोटींची मदत
Maratha Reservation | मनोज जरांगेंच्या उपोषणानंतर सरकारचा मोठा निर्णय! मराठा आंदोलनातील 34 कुटुंबांना 3.40 कोटींची मदत मंजूर
बंडखोरी मिटवण्यासाठी महायुतीचे प्रयत्न; गोकुळ गीते पाठिंबा देतील?
Uday Samant | बंडखोरी मिटवण्यासाठी महायुतीचे प्रयत्न; गोकुळ गीते पाठिंबा देतील, उदय सामंतांचा विश्वास
तलवारींचा धाक, कारची तोडफोड; राजगड परिसरात दहशत निर्माण करण्याचा प्रयत
Pune | तलवारींचा धाक, कारची तोडफोड; राजगड परिसरात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न
दुर्बीण घेऊन स्वतःचं अस्तित्व शोधा! तटकरेंचा विनायक राऊतांवर घणाघात
Sunil Tatkare | दुर्बीण घेऊन स्वतःचं अस्तित्व शोधा! तटकरेंचा विनायक राऊतांवर घणाघात
महायुतीकडून पैशांचं वाटप केल्याच्या आरोपांना देसाईंचं प्रत्युत्तर
Shambhuraj Desai | विधान परिषद निवडणूक: महायुतीकडून पैशांचं वाटप केल्याच्या आरोपांना शंभूराज देसाईंचं प्रत्युत्तर, हवेतल्या गप्पा नको....
रावेरमध्ये गारपिटीचा कहर! वादळी वाऱ्याने केळीबागा जमीनदोस्त
Jalgaon Banana Loss | रावेरमध्ये गारपिटीचा कहर! वादळी वाऱ्याने केळीबागा जमीनदोस्त
महागाईच्या काळात रिक्षाचालकांना मोठा दिलासा! ऑटो LPG तब्बल एवढ्या.....
Chhatrapati Sambhajinagar | महागाईच्या काळात रिक्षाचालकांना मोठा दिलासा! ऑटो LPG तब्बल एवढ्या रुपयांनी स्वस्त, आकडा जाणून घेण्यासाठी संपूर्ण व्हिडिओ पहा
कोकण ते पुणे... माघारीसाठी कोट्यवधींचे व्यवहार? राऊतांनी उघड केले.....
Sanjay Raut UNCUT | कोकण ते पुणे... माघारीसाठी कोट्यवधींचे व्यवहार? राऊतांनी उघड केले धक्कादायक दावे
तर मी राजकारणातून संन्यास घेईन; मानेंच्या वक्तव्याने ठाकरे गटात खळबळ
Bal Mane | तर मी राजकारणातून संन्यास घेईन; बाळ मानेंच्या वक्तव्याने ठाकरे गटात खळबळ
हिंदुत्ववादी म्हणवणारे काही लोक गद्दारीसाठी एकत्र आले.....
Sanjay Raut On Bal Mane | हिंदुत्ववादी म्हणवणारे काही लोक गद्दारीसाठी एकत्र आले; बाळ माने यांच्या माघारीनंतर संजय राऊतांचा घणाघात