AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आई आणि मुलगी – दोघींचा एकच बॉयफ्रेंड ; लग्नाची वेळ आल्यावर मात्र…

आरोपीचे अल्पवयीन मुलगी आणि तिची आई या दोघांशीही प्रेमसंबंध होते. मात्र त्या मुलीला त्याच्याशी लग्न करायचे. याच मुद्यावरून दोघांमध्ये सारख वाद व्हायचे. एक दिवस या वादाचा शेवट अतिशय हिंसक आणि दु:खद झाला.

आई आणि मुलगी - दोघींचा एकच बॉयफ्रेंड ; लग्नाची वेळ आल्यावर मात्र...
| Updated on: Oct 04, 2023 | 4:25 PM
Share

लखनऊ | 4 ऑक्टोबर 2023 : एकीकडे आईला फिरवत होता, तर दुसरीकडे तिच्या अल्पवयीन मुलीला फूस लावून तिच्याशीही प्रेमाचं नाटक करत होता. मात्र लग्नाची वेळ आल्यावर मात्र तो घाबरला आणि त्याच नादात नको ते करून बसला. एका तरूणाच्या निर्घृण कृत्याची ही कहाणी सगळ्यांनाच हादरवून सोडेल. अतिशय दु:खद अशा या घटनेने सर्वच हादरले. असं काही होऊ शकेल, असा कोणीच स्वप्नातही विचार केला नव्हता.

उत्तर प्रदेशच्या गोरखपूरमध्ये ही दुर्दैवी घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीचे एक अल्पवयीन मुलीशी आणि तिची आई या दोघींशीही प्रेमसंबंध होते. हा प्रकार तरुणीला समजल्यानंतर तिने तरुणावर लग्नासाठी दबाव टाकण्यास सुरुवात केली. पण प्रियकराने लग्नास नकार दिला. मात्र मुलगी लग्नाच्या मागणीवर ठाम राहिल्याने तो चिडला आणि त्याने तिचा जीवच घेण्याचा कट रचला. त्यानंतर संधी मिळताच त्याने तिचा गळा आवळून खून केला. पोलिसांनी याबाबत खुलासा केला आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही हत्या आहे हे लपवण्यासाठी आरोपीने त्याच्या एका साथीदारासह मुलीची हत्या करून तिचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत लटकवला. जेणेकरून हे आत्महत्येचे प्रकरण आहे, अशी लोकांची समजूत पटेल. पण ती हत्याच असल्याचे अखेर समोर आले. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी प्रियकर आणि त्याच्या साथीदाराला अटक केली आहे.

गोरखपूरमध्ये गेल्या महिन्यात 26 सप्टेंबरला ही घटना घडली. कॅम्पियरगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत अल्पवयीन मुलीने आत्महत्या केल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवला. पण त्या रिपोर्टमध्ये जी माहिती समोर आली त्यामुळे सगळेच हादरले. त्या मुलीने आत्महत्या केली नसून तिचा गळा दाबून खून झाला, असे पोस्टमॉर्टम रिपोर्टमधून स्प्ट झाले.

पीडित मुलीचे वडील मुंबईत राहतात. आपल्या मुलीच्या मृत्यूची बातमी मिळताच, ते घरी परतले आणि त्यांनी एका व्यक्तीवर मुलीच्या हत्येचा आरोप करत त्याच्याविरुद्ध एफआयआर दाखल केला. त्यानंतर पुरावे आणि पोस्टमॉर्टम रिपोर्टच्या आधारे पोलिसांनी आरोपी सुनील गौरला ताब्यात घेतले. या खून प्रकरणात सुनील आधीच संशयाच्या भोवऱ्यात होता. अखेर चौकशीत त्याने गुन्हा कबूल करत घडलेला प्रकार सविस्तर सांगितला.

आई-मुलगी दोघींशी होते प्रेमसंबंध

आरोपी तरुणाचे त्याच्या मैत्रिणीसोबत आणि तिच्या आईसोबतही अनैतिक संबंध होते, असे पोलिसांनी उघड केले. कामानिमित्त तोलगावी जायचा तेव्हा त्याची महिलेशी ओळख वाढली. त्यानंतर त्याने आई आणि मुलगी दोघींशी प्रेमप्रकरण सुरू केलं. ज्या दिवशी हत्या झाली, त्या वेळी मुलीची आई बाहेर गेली होती. हीच संधी साधून आरोपी घरी आला. तेव्हा अल्पवयीन मुलीने त्याच्यासमोर लग्नाचा विषय काढला आणि दोघांमध्ये वाद सुरू झाला. या वादामुळे संतापलेल्या आरोपीने तिचा गळा दाबून खून केला. यानंतर त्याने त्याच्या एका मित्राची मदत घेतली. दोघांनी तिचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत लटकवला. लोकांची दिशाभूल करण्याचा त्याचा प्रयत्न होता. मात्र पोस्टमॉर्टम रिपोर्टमधून सगळा खुलासा झाल्याने त्यांचं पितळ उघडं पडलं आणि पोलिसांनी त्यांना अटक केली.

Follow Us
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने...
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने....
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी.
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू.
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार.
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन.
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत.
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड.
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत.
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू.