AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Exam Tips: केवळ नशिबावर नाही! ‘या’ 5 कारणांमुळे मुले परीक्षेत नापास होतात

मुलांचं अपयश हे फक्त त्यांच्या वागणुकीमुळे होतं असं नाही, तर त्या मागे ही कारणे असतात. म्हणूनच, ही कारणं लक्षात घेऊन वेळेत सुधारणा केल्यास पुढच्या परीक्षांमध्ये नक्कीच यश मिळू शकतं.

Exam Tips: केवळ नशिबावर नाही! ‘या’ 5 कारणांमुळे मुले परीक्षेत नापास होतात
| Edited By: | Updated on: Jul 08, 2025 | 1:35 PM
Share

वर्षभर मेहनत करणाऱ्या मुलांनी परीक्षेत यशस्वी व्हावं, अशी अपेक्षा पालकांची असते. पण बरेच वेळा मुलं प्रामाणिक अभ्यास करूनही अपेक्षित निकाल मिळवत नाहीत, कधी कधी थेट नापासदेखील होतात. अशा वेळी केवळ पालकांनाच नाही, तर स्वतः विद्यार्थ्यांनाही समजत नाही की चूक कुठे झाली. ही परिस्थिती मुलांसाठी मानसिकदृष्ट्या खूप घातक ठरू शकते. त्यामुळे फक्त निराश होण्याऐवजी, मागे काय चुकलं याचा विचार करणं आणि त्या चुका सुधारण्यावर काम करणं महत्त्वाचं आहे.

1. फक्त ट्यूशनवर अवलंबून राहणं

अनेक पालकांना वाटतं की मुलाचं ट्यूशन सुरू आहे म्हणजे सगळी जबाबदारी संपली. पण हे पूर्णपणे चुकीचं आहे. काही मुलांना फक्त ट्यूशनमध्येच अभ्यासाची सवय लागते आणि शाळा किंवा घरी त्यांचं लक्ष राहत नाही. ट्यूशन सुटली की अभ्यास सुटतो. परिणामी, ते अभ्यासाकडे गांभीर्यानं पाहत नाहीत आणि शेवटच्या क्षणी रिव्हिजनही होत नाही.

2. बेसिक संकल्पना स्पष्ट नसणं

नवीन वर्ग किंवा सत्र सुरू झाल्यावर सुरुवातीची काही धडे मुले हलक्यात घेतात. अशाने अभ्यास साचत जातो आणि पायाभूत संकल्पना स्पष्ट नसल्यामुळे पुढचे धडे समजेनासे होतात. एक गोष्ट लक्षात ठेवा परीक्षेच्या काही रात्री जागून यश मिळत नाही; रोजच्या अभ्यासाचा खरा परिणाम होतो.

3. शिक्षकांना प्रश्न न विचारणं

शिक्षक शिकवत असताना “हो हो” म्हणत मान हलवणं, पण खरं काहीच न समजणं ही अनेक मुलांची सवय असते. संकोच किंवा भीतीमुळे ते शिक्षकांना प्रश्न विचारत नाहीत. हा संकोचच त्यांच्या अपयशाला कारणीभूत ठरतो. जितके प्रश्न विचाराल, तितकी समज अधिक आणि यश जवळ.

4. फक्त मित्रांचे नोट्स वापरणं

स्वतःच्या नोट्स न बनवता मित्रांकडून नोट्स घेणं ही एक मोठी चूक असते. प्रत्येकाचं समजण्याचं आणि लिहिण्याचं पद्धत वेगळी असते. मित्राने लिहिलेलं तुम्हाला शेवटच्या क्षणी समजेलच याची काही खात्री नाही. त्यामुळे नेहमी स्वतःहून महत्त्वाच्या गोष्टी टिपून ठेवाव्यात.

5. कुटुंबाकडून मानसिक दबाव

फक्त मुलंच नाही, तर कधी कधी त्यांच्या अपयशामागे घरच्यांचाही हात असतो. पालकांची अपेक्षांचं ओझं, भावंडांशी तुलना किंवा शेजारच्या मुलांचं उदाहरण देणं हे सर्व मुलांच्या आत्मविश्वासावर वाईट परिणाम करतं. यामुळे ते अजूनच घाबरतात आणि त्यांच्या कामगिरीवर त्याचा थेट परिणाम होतो.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.