AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी ! चंद्रकांत खैरे यांची थेट अंबादास दानवे यांच्यावर टीका, पराभवाचं खापर फोडलं; उद्धव ठाकरेंकडे करणार तक्रार

संभाजीनगर लोकसभा मतदार संघातून शिंदे गटाचे महायुतीचे मंत्री संदीपान भूमरे निवडून आले आहेत. ठाकरे गटाचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी आपल्या पराभवाचे खापर अंबादास दानवे यांच्यावर देखील फोडले आहे. आपली ही शेवटची निवडणूक अशी घोषणा देखील त्यांनी केली होती. त्यामुळे पराभव त्यांच्या जिव्हारी लागला आहे.

मोठी बातमी ! चंद्रकांत खैरे यांची थेट अंबादास दानवे यांच्यावर टीका, पराभवाचं खापर फोडलं; उद्धव ठाकरेंकडे करणार तक्रार
chandrakant khaire and ambadas danveImage Credit source: TV9MARATHI
| Updated on: Jun 05, 2024 | 1:37 PM
Share

छत्रपती संभाजीनगरातून शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांचा मोठा पराभव झाला आहे. या ठिकाणी मंत्री संदीपान भुमरे यांचा मोठा विजय झाला आहे. या ठिकाणी आपल्या पराभवाला पक्षातील काही लोक जबाबदार असल्याचा आरोप चंद्रकांत खैरे यांनी केला आहे. या ठिकाणी शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे अंबादार दानवे यांना तिकीट मिळेल अशी आशा होती. परंतू त्यांना तिकीट न देता पक्षाने माजी खासदार चंद्रकांत खैरे यांना तिकीट दिले. त्यामुळे दोन्ही नेत्यातील वाद मातोश्रीपर्यंत पोहचला होता. आता पुन्हा पराभवानंतर चंद्रकांत खैरे यांनी अंबादास दानवे यांच्यावर नाव न घेता टीका करीत मातोश्रीला तक्रार करणार असल्याचे म्हटले आहे.

चंद्रकांत खैरे यांनी आपला पराभव मनाला लागणारा असल्याचे म्हटले आहे. आपण कधी भ्रष्टाचार केला नाही. निर्व्यसनी माणसाला नागरिकांनी मत दिली नसल्याने आपण दुखी झालोय, मला रस्त्याने जाताना नागरिक सांगायचे मी निवडून येणार असे सांगायचे असे ते म्हणाले. येथे मुख्यमंत्री चार दिवस मुक्कामाला होते. संदीपान भूमरे यांनी 80 कोटी रुपये वाटल्याचा आरोपच खैरे यांनी केला आहे. तरीही आपण शिवसेना पक्ष सोडणार नाही. माझे कार्यकर्ते पारेषण झाले आहे. काही लोकांनी बदमाशी केली आहे. मतदार संघामध्ये काही घोटाळा झाला आहे. मुख्यमंत्री चार दिवस शहरात होते. Evm मध्ये काही तरी झाले असेल असेही खैरे यांनी म्हटले आहे.

हा पैशाचा विजय आहे

हा पैशाचा विजय आहे, हा धन शक्तीचा विजय असल्याचे चंद्रकांत खैरे यांनी आरोप केला आहे. माझ्या पक्षातील काहींनी काम केले नाही असा संशय आहे. मी पक्ष प्रमुखाकडे तक्रार करणार आहे. विधानसभेत पुढे धोका होऊ नये या साठी आपण पक्ष प्रमुखांना भेटून तक्रार करणार आहे. मी एकटा पडलो, ते फक्त यायचे बसायचे. तो मोठा माणूस झाला, तो जिल्हा प्रमुख आहे. त्याने काम केलं पाहिजे होते. या वेळेस तरी अंबादास दानवे यांनी काम केले पाहिजे होते. त्यानी आपली जबाबदारी पार पाडली पाहिजे होती असेही चंद्रकांत खैरे म्हणाले.

खैरे दुपारनंतर मतमोजणी केंद्रातून निघून गेले

काल मतमोजणीचा कल लक्षात आल्यानंतर महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांनी दुपारी 1.40 नंतर मतमोजणी केंद्रच सोडले. मी थोड्या वेळाने परत येतो, असे म्हणत खैरेंनी माघार घेतली ते पुन्हा आलेच नाही. त्यांना कौल लक्षात आला असावा त्यामुळे त्यांनी काढता पाय घेतला. पहिल्या फेरीत इम्तियाज जलील यांना 3,338 मतांची आघाडी घेतली होती. दुसऱ्या फेरीत जलील यांना 2,277 मतांची आघाडी होती. त्यानंतर मात्र भुमरे यांनी आघाडी घ्यायला सुरूवात केली आणि नंतरच्या फेरीत ते पुढेच राहीले. .

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.