AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी ! चंद्रकांत खैरे यांची थेट अंबादास दानवे यांच्यावर टीका, पराभवाचं खापर फोडलं; उद्धव ठाकरेंकडे करणार तक्रार

संभाजीनगर लोकसभा मतदार संघातून शिंदे गटाचे महायुतीचे मंत्री संदीपान भूमरे निवडून आले आहेत. ठाकरे गटाचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी आपल्या पराभवाचे खापर अंबादास दानवे यांच्यावर देखील फोडले आहे. आपली ही शेवटची निवडणूक अशी घोषणा देखील त्यांनी केली होती. त्यामुळे पराभव त्यांच्या जिव्हारी लागला आहे.

मोठी बातमी ! चंद्रकांत खैरे यांची थेट अंबादास दानवे यांच्यावर टीका, पराभवाचं खापर फोडलं; उद्धव ठाकरेंकडे करणार तक्रार
chandrakant khaire and ambadas danveImage Credit source: TV9MARATHI
| Updated on: Jun 05, 2024 | 1:37 PM
Share

छत्रपती संभाजीनगरातून शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांचा मोठा पराभव झाला आहे. या ठिकाणी मंत्री संदीपान भुमरे यांचा मोठा विजय झाला आहे. या ठिकाणी आपल्या पराभवाला पक्षातील काही लोक जबाबदार असल्याचा आरोप चंद्रकांत खैरे यांनी केला आहे. या ठिकाणी शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे अंबादार दानवे यांना तिकीट मिळेल अशी आशा होती. परंतू त्यांना तिकीट न देता पक्षाने माजी खासदार चंद्रकांत खैरे यांना तिकीट दिले. त्यामुळे दोन्ही नेत्यातील वाद मातोश्रीपर्यंत पोहचला होता. आता पुन्हा पराभवानंतर चंद्रकांत खैरे यांनी अंबादास दानवे यांच्यावर नाव न घेता टीका करीत मातोश्रीला तक्रार करणार असल्याचे म्हटले आहे.

चंद्रकांत खैरे यांनी आपला पराभव मनाला लागणारा असल्याचे म्हटले आहे. आपण कधी भ्रष्टाचार केला नाही. निर्व्यसनी माणसाला नागरिकांनी मत दिली नसल्याने आपण दुखी झालोय, मला रस्त्याने जाताना नागरिक सांगायचे मी निवडून येणार असे सांगायचे असे ते म्हणाले. येथे मुख्यमंत्री चार दिवस मुक्कामाला होते. संदीपान भूमरे यांनी 80 कोटी रुपये वाटल्याचा आरोपच खैरे यांनी केला आहे. तरीही आपण शिवसेना पक्ष सोडणार नाही. माझे कार्यकर्ते पारेषण झाले आहे. काही लोकांनी बदमाशी केली आहे. मतदार संघामध्ये काही घोटाळा झाला आहे. मुख्यमंत्री चार दिवस शहरात होते. Evm मध्ये काही तरी झाले असेल असेही खैरे यांनी म्हटले आहे.

हा पैशाचा विजय आहे

हा पैशाचा विजय आहे, हा धन शक्तीचा विजय असल्याचे चंद्रकांत खैरे यांनी आरोप केला आहे. माझ्या पक्षातील काहींनी काम केले नाही असा संशय आहे. मी पक्ष प्रमुखाकडे तक्रार करणार आहे. विधानसभेत पुढे धोका होऊ नये या साठी आपण पक्ष प्रमुखांना भेटून तक्रार करणार आहे. मी एकटा पडलो, ते फक्त यायचे बसायचे. तो मोठा माणूस झाला, तो जिल्हा प्रमुख आहे. त्याने काम केलं पाहिजे होते. या वेळेस तरी अंबादास दानवे यांनी काम केले पाहिजे होते. त्यानी आपली जबाबदारी पार पाडली पाहिजे होती असेही चंद्रकांत खैरे म्हणाले.

खैरे दुपारनंतर मतमोजणी केंद्रातून निघून गेले

काल मतमोजणीचा कल लक्षात आल्यानंतर महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांनी दुपारी 1.40 नंतर मतमोजणी केंद्रच सोडले. मी थोड्या वेळाने परत येतो, असे म्हणत खैरेंनी माघार घेतली ते पुन्हा आलेच नाही. त्यांना कौल लक्षात आला असावा त्यामुळे त्यांनी काढता पाय घेतला. पहिल्या फेरीत इम्तियाज जलील यांना 3,338 मतांची आघाडी घेतली होती. दुसऱ्या फेरीत जलील यांना 2,277 मतांची आघाडी होती. त्यानंतर मात्र भुमरे यांनी आघाडी घ्यायला सुरूवात केली आणि नंतरच्या फेरीत ते पुढेच राहीले. .

Follow Us
पुण्यात गॅस सिलेंडर तुटवड्यामुळे लग्नसराई हॉल व्यवसायिकांना फटका
पुण्यात गॅस सिलेंडर तुटवड्यामुळे लग्नसराई हॉल व्यवसायिकांना फटका.
गॅस सिलेंडरसाठी रांगा फक्त घबराटीमुळे – मंत्री शिरसाट यांची माहिती
गॅस सिलेंडरसाठी रांगा फक्त घबराटीमुळे – मंत्री शिरसाट यांची माहिती.
शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण कुणाचा? उद्या कोर्टात सुनावणी
शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण कुणाचा? उद्या कोर्टात सुनावणी.
इराण-इस्त्रायल-अमेरिका संघर्षाचा भारतावर परिणाम; सर्वपक्षीय बैठकीची...
इराण-इस्त्रायल-अमेरिका संघर्षाचा भारतावर परिणाम; सर्वपक्षीय बैठकीची....
उल्हास खोऱ्यातून 78 टीएमसी पाणी मराठवाड्याकडे वळवणार
उल्हास खोऱ्यातून 78 टीएमसी पाणी मराठवाड्याकडे वळवणार.
GDP, FDI आणि स्टार्टअपमध्ये महाराष्ट्र आघाडीवर
GDP, FDI आणि स्टार्टअपमध्ये महाराष्ट्र आघाडीवर.
लोकसभेत राहुल गांधींच्या भाषणादरम्यान गोंधळ; अध्यक्षाने दिले आदेश
लोकसभेत राहुल गांधींच्या भाषणादरम्यान गोंधळ; अध्यक्षाने दिले आदेश.
वडापावची किंमत वाढणार? युद्धाच्या कचाट्यात अस्सल मराठमोळा पदार्थ....
वडापावची किंमत वाढणार? युद्धाच्या कचाट्यात अस्सल मराठमोळा पदार्थ.....
राज ठाकरे अ‍ॅक्शन मोडमध्ये, पदाधिकाऱ्यांची बोलावली तातडीने बैठक
राज ठाकरे अ‍ॅक्शन मोडमध्ये, पदाधिकाऱ्यांची बोलावली तातडीने बैठक.
पिस्ता, काजू, खजूर खाणं आवाक्या बाहेर... युद्धामुळे महागाई वाढली
पिस्ता, काजू, खजूर खाणं आवाक्या बाहेर... युद्धामुळे महागाई वाढली.