AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sanjay Raut : देशात येणार इंडिया आघाडीचे सरकार, संजय राऊत यांनी सत्ता स्थापनेचा दिला असा आकडा

Sanjay Raut on INDIA Alliance : लोकसभा निवडणुकीचा निकाल 4 जून रोजी येईल. त्यापूर्वी एक्झिट पोलचा पोळ फुटला. सर्वांनी भाजपच्या पारड्यात मत टाकले आहे. पण संजय राऊत यांनी देशात इंडिया आघाडीचे सरकार येण्याचा दावा केला आहे. किती आहे त्यांचा बहुमताचा आकडा?

Sanjay Raut : देशात येणार इंडिया आघाडीचे सरकार, संजय राऊत यांनी सत्ता स्थापनेचा दिला असा आकडा
राऊतांचा सरकारवर गंभीर आरोप
| Updated on: Jun 02, 2024 | 11:24 AM
Share

लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी 1 जून रोजी संपली. त्यानंतर लागलीच एक्झिट पोलचा पोळा फुटला. देशातील झाडून सर्वच एक्झिट पोलने भाजपला कौल दिला आहे. पण संजय राऊत यांना इंडिया आघाडीच देशात सत्ता स्थापन करणार असल्याचा विश्वास आहे. त्यांनी आकडेवारी सादर करत हा बहुमताचा आकडा सुद्धा सांगितला. हा एक्झिट पोल नाही तर जनतेच्या मनातील कौल असल्याचा दावा त्यांनी केला. त्यांच्या मते इंडिया आघाडीला देशात इतक्या जागा मिळतील. त्याआधारे सत्तेचा सोपान गाठता येईल.

काय केला दावा

संजय राऊत यांनी राज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह आणि महायुती सरकारविरोधात मोर्चा सांभाळला आहे. लोकसभेच्या प्रचारात तर त्यांच्या शब्दांना चांगलीच धार आली होती. पूर्वीपासूनच ते लोकसभेत यावेळी मोठा फेरबदल होईल, असा दावा करत आलेले आहेत. देशातील हवा बदलल्याची त्यांनी यापूर्वीच चर्चा केली होती. मोदींवर त्यांनी तिखट टीकास्त्र सोडले होते. या लोकसभेच्या रणधुमाळीत मोदी अनेक टप्प्यात राज्यात डेरेदाखल झालेले दिसले. यावेळी महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडी भाजपच्या सत्तेच्या राजकारणाल सुरुंग लावेल, असा दावा राऊतांनी केला होता.

बहुमताचा आकडा काय

एक्झिट पोलचे दावे त्यांनी सरसकट फेटाळून लावले आहे. त्यांच्या मते देशात एनडीएचे नाही तर इंडिया आघाडीचे सरकार येईल. इंडिया आघाडी या देशात सरकार बनवणार असल्याचा दावा त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना केला. 295 ते 310 जागा इंडिया आघाडीला मिळतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. हा आमचा लोकांमधून घेतलेला कौल आहे, एक्झिट पोल नाही, असा टोला त्यांनी सत्ताधाऱ्यांना लगावला. त्यांनी एक्झिट पोलवर चांगलेच तोंडसूख घेतले.

राज्यात जागा किती?

महाराष्ट्रात महाविकास आघाडी लोकसभेच्या रणसंग्रामात 35 हून अधिक जागांवर विजय होईल, असा दावा त्यांनी केला. या जनतेचा महाराष्ट्रातला काय कल आहे त्यांच्या मनात काय आहे हे सॅम्पल सर्वे दूर करत नाही, असे ते म्हणाले. गेले काही दिवस मी ऐकत होतो बारामती मध्ये सुप्रियाताई यांचा पराभव होणार आणि आम्ही खात्रीने सांगत होतो सुप्रियाताई सुळे किमान दीड लाख मताने जिंकतील. शिवसेनेचा 18 चा आकडा कायम राहील. काँग्रेसचा बेस्ट परफॉर्मन्स राहील आणि देशामध्ये उत्तर प्रदेश, बिहार, दिल्ली आणि हरियाणा, महाराष्ट्र, कर्नाटक हे राज्य देशांमध्ये परिवर्तन घडवतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.