AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बारामतीत पराभव होताच मोठ्या भावाच्या अजितदादांना कानपिचक्या; श्रीनिवास पवार नेमकं काय म्हणाले?

बारामतीच्या या लढाईमध्ये सुप्रिया सुळे यांचा दणदणीत विजय झाला आणि अजित पवार यांची पत्नी सुनेत्रा पवार यांना दारूण पराभव पत्करावा लागला. या संपूर्ण निवडणुकीत पवार कुटुंबाच्या बाजूने बोलणारे, अजित पवार यांचे सख्खे बंधू श्रीनिवास पवार यांनी या निकालानंतर पुन्हा एकदा अजित पवारांवर हल्ला चढवला आहे.

बारामतीत पराभव होताच मोठ्या भावाच्या अजितदादांना कानपिचक्या; श्रीनिवास पवार नेमकं काय म्हणाले?
| Updated on: Jun 05, 2024 | 2:29 PM
Share

लोकसभा निवडणुकीचे काही धक्कादायक निकाल लागल आहेत. या निवडणुकीमध्ये संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं होतं ते बारामतीकडे. या मतदारसंघात पवार वि. पवार असा सामना रंगला. सुप्रिया सुळे वि. सुनेत्रा पवार अशी लढाई असली तर खरी लढाई ही अजित पवार वि. शरद पवार अशीच असल्याचे चित्र दिसत होते. प्रतिष्ठेच्या या लढाईपायी अनेक आरोप-प्रत्यारोप झाले, संपूर्ण पवार कुटुंबाचा पाठिंबा हा सुप्रिया सुळे यांना होता. तर सहानुभूती मिळवत आपल्याला एकटं पाडण्यात आल्याचा दावा अजित पवार यांनी केला. अखेर या लढाईमध्ये सुप्रिया सुळे यांचा दणदणीत विजय झाला आणि अजित पवार यांची पत्नी सुनेत्रा पवार यांना दारूण पराभव पत्करावा लागला. या संपूर्ण निवडणुकीत पवार कुटुंबाच्या बाजूने बोलणारे, अजित पवार यांचे सख्खे बंधू श्रीनिवास पवार यांनी या निकालानंतर पुन्हा एकदा अजित पवारांवर हल्ला चढवला आहे. बारामती ही शरद पवार यांचीच हे सिद्ध झालंय, असंही श्रीनिवास पवार म्हणाले.

काय म्हणाले श्रीनिवास पवार ?

बारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळे यांचा विक्रमी मतांनी विजयी झाला आहे. बारामतीत पवार विरुद्ध पवार अशी लढाई झाली, पण बारामती ही शरद पवारांची आहे हे सिद्ध झालंय. राजकारण वेगळं आणि कुटुंब वेगळं असतं, त्यामुळे कौटुंबिक पातळीवर आम्ही एक आहोत आणि आमचे कुटुंब प्रमुख शरद पवारचं आहेत, अशी भूमिका श्रीनिवास पवार यांनी मांडली. अजित पवार यांचे नाव न घेता त्यांनी अप्रत्यक्षरित्या टोला लगावला.

बारामतीचा गड सुप्रिया सुळेंनीच राखला

संपूर्ण देशाचे लक्ष लागून असलेल्या बारामती लोकसभा मतदार संघात दुरंगी लढत झाली. पवार कुटुंबातील ही लढत चुरशीची झाली नाही. शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे एक लाखांहून अधिक मतांनी विजयी झाल्या. मात्र सुनेत्रा पवार यांच्या पराभवामुळे अजित पवार यांना मोठा धक्का बसला. महायुतीमध्ये अजित पवार यांच्या पक्षाला केवळ एका जागेवरच विजय मिळाला. रायगडमधून राष्ट्रवादीचे सुनील तटकरे विजयी झाले.

पवार कुटुंबामध्ये झालेल्या या लढतीकडे देशाचे लक्ष लागले होते. महाविकास आघाडीकडून सुप्रिया सुळे तर महायुतीकडून सुनेत्रा पवार  निवडणूक रिंगणात होत्या. नणंद-भावजय यांच्या या लढतीत प्रचार दरम्यान अनेक आरोप-प्रत्यारोप झाले होते. संपूर्ण कुटुंबाने शरद पवार यांनाच साथ दिली होती.

Follow Us
कर्जमाफीचा दुसरा हप्ता जारी ६.३६ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात पैस जमा
शेतकरी कर्जमाफीचा दुसरा हप्ता जारी: ६.३ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात ५,०८६ कोटी रुपये जमा
वडेट्टीवारांचं विधान: फडणवीसांना २०२९ पर्यंतच पंतप्रधान होण्याची संधी
वडेट्टीवारांचे मोठे विधान: फडणवीसांना २०२९ पर्यंतच पंतप्रधान होण्याची संधी
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार...
आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब
Chandrashekhar Bawankule : आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब, बावनकुळेंनी दिली महायुती बैठकीची माहिती
विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
'विद्यार्थी भीक नाही हक्क मागतायत', पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
Dharashiv | धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
निधीवरुन मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा काढला जाणार
महायुतीच्या समन्वय समितीची बैठक: निधीवरून मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा, फडणवीस-शिंदेंकडे अंतिम निर्णय
पुण्यात राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीने मांडले आदिवासींचे प्रश्न
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोर विद्यार्थीनीनं आदिवासींच्या समस्यांचा पाढा वाचला