AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ब्रेकिंग न्यूजने देश चालणार नाही, मोदींचा अलर्ट; एनडीएचाही सांगितला अर्थ

लोकसभा निवडणुकीनंतर पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवनिर्वाचित खासदारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विकासाचा रोड मॅप मांडतानाच विरोधकांच्या सहकार्याची अपेक्षाही केली. नव्या संसदेत विरोधक सहकार्य करतील, अशी अपेक्षा मोदींनी व्यक्त केली.

ब्रेकिंग न्यूजने देश चालणार नाही, मोदींचा अलर्ट; एनडीएचाही सांगितला अर्थ
PM Narendra ModiImage Credit source: Instagram
| Updated on: Jun 07, 2024 | 3:40 PM
Share

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवनिर्वाचित खासदारांना अलर्ट केलं आहे. तुम्ही विकासाची कामे करा. चांगली कामे करा. देशाची प्रगती करा. केवळ ब्रेकिंग न्यूजने देश चालणार नाही, असा सावधानतेचा इशाराच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला आहे. तर देशातील जनतेने एनडीएवर विश्वास दाखवला आहे. त्यामुळे विरोधक देश भावनेने सभागृहात येतील. चांगली डिबेट करतील. देशाच्या विकासात मदत करतील. विरोधक हे आमचे विरोधक असू शकतात. पण देशाचे नाही. तेही या देशाचा एक घटक आहेत. त्यामुळे त्यांच्याकडूनही सहकार्याची अपेक्षा आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

संसदेच्या कॉन्स्टिट्यूशन हॉलमध्ये एनडीएची बैठक पार पडली. यावेळी नरेंद्र मोदी यांची संसदीय दलाचे नेते म्हणून निवड करण्यात आली आहे. यावेळी मोदींनी खासदारांना संबोधित केलं. खासदारांना संबोधित करताना मोदींना निवडणूक निकालाचं विश्लेषण करतानाच देशाच्या विकासाचा रोड मॅपही मांडला. आपण 10 वर्षात जो विकास केला तो फक्त ट्रेलर आहे. ते माझं निवडणुकीचं भाषण नव्हतं. आपल्याला वेगाने विकास करायचा आहे. आपणच आपलं रेकॉर्ड तोडावं असं जनतेला वाटत आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

वन पॉइंट अजेंडा नाकारला

नरेंद्र मोदी यांनी यावेळी एनडीएचा अर्थही सांगितला. एनडीए म्हणजे न्यू इंडिया, डेव्हल्प इंडिया, ॲस्पिरेशनल इंडिया. हेच स्वप्न आणि संकल्प पूर्ण करणं ही आपली जबाबदारी आहे. आपल्याकडे रोड मॅप आहे. आपण नेहमी करप्शन फ्री सरकार दिलं आहे. संधी मिळताच आपण काम केलं आहे. काँग्रेस नेतृत्वातील यूपीएने नाव आता बदललं आहे. पण त्यांची ओळख घोटाळ्यांची आहे. नाव बदलल्यानंतरही देश त्यांच्या घोटाळ्याला विसरला नाही. त्यांना नाकारलं आहे. इंडिया आघाडीने एका व्यक्तीचा विरोध करण्यासाठी वन पॉइंट अजेंडा राबवला. त्यामुळे देशातील जनतेने त्यांना पुन्हा विरोधात बसवलं आहे. एनडीए विकसीत भारताची संकल्पना घेऊन निवडणुकीला सामोरे गेला होता, असं मोदी म्हणाले.

तो चांगला संकेत

देशातील जनतेचा एनडीएवर अतुट विश्वास आणि भरवसा आहे. त्यामुळे देशवासियांच्या अपेक्षा वाढणार हे स्वाभाविक आहे. मी ही गोष्ट चांगला संकेत मानतो. मी आधीच सांगितलं होतं की, मागच्या दहा वर्षातील काम हे फक्त एक ट्रेलर आहे. ही माझी कमिटमेंट आहे. आपल्याला अजून वेगाने आणि विश्वासाने पुढे जायचं आहे. देशाच्या आकांक्षापूर्ण करण्यासाठी एक क्षणही विलंब करणार नाही, असं मोदींनी स्पष्ट केलं.

10 वर्षात 100चा आकडा गाठला नाही

यावेळी मोदींनी काँग्रेसवरही जोरदार टीका केली. काँग्रेसने गेल्या दहा वर्षात 100 चा आकडा गाठला नाही. गेल्या तीन निवडणुकीतील काँग्रेसची आकडेवारी एकत्र केली तरी त्यापेक्षा जास्त सीट आपण जिंकल्या आहेत, असा चिमटाच त्यांनी काढला. आम्हाला विजय पचवता येतो. विजयाचा उन्माद करायचा नाही आणि पराभूतांचा उपहास करायचा नाही ही आपली संस्कृती आहे. आपण हरलो नव्हतो आणि हरलो नाही, असंही त्यांनी ठासून सांगितलं

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.