AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘तुम्ही तुलसी म्हणूनच..’; लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर लिहिलेल्या पोस्टमुळे स्मृती इराणी ट्रोल

2019 मध्ये भाजपच्या स्मृती इराणी यांचा 4,68,514 मतांनी विजय झाला होता. तर काँग्रेसच्या राहुल गांधी यांना 4,13,394 लोकांनी मत दिलं होतं. त्यानंतर आता काँग्रेसच्या केएल शर्मा यांनी स्मृती इराणींना दणका दिला आहे. या पराभवानंतर इराणींनी ट्विटरवर एक पोस्ट लिहिली आहे.

'तुम्ही तुलसी म्हणूनच..'; लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर लिहिलेल्या पोस्टमुळे स्मृती इराणी ट्रोल
Smriti IraniImage Credit source: Instagram
| Updated on: Jun 06, 2024 | 9:39 AM
Share

यंदाचा लोकसभा निवडणुकीचा निकाल अनेक दृष्ट्यांनी आश्चर्यकारक ठरला. या निवडणुकीत अनेक दिग्गजांना पराभवाचा धक्का सहन करावा लागला. केंद्रीय मंत्री स्मृती इराणी, अर्जुन मुंडा, राजीव चंद्रशेखर, रावसाहेब दानवे, कपिल पाटील, अजय मिश्रा टेनी या केंद्रीय मंत्र्यांना पराभवाचा धक्का बसला. अमेठी मतदारसंघात काँग्रेसच्या किशोरी लाल शर्मा यांनी स्मृती इराणींना तब्बल 1 लाख 67 हजार 196 मतांनी हरवलं. 2019 मध्ये याच मतदारसंघात स्मृती इराणींनी काँग्रेसच्या राहुल गांधींना 55 हजार मतांनी पराभूत केलं होतं. त्यामुळे इराणींचा आताचा पराभव म्हणजे भाजपला मोठा धक्का मानला जातोय. या पराभवानंतर त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट लिहिली आहे. या पोस्टवरून नेटकऱ्यांनी त्यांना ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.

स्मृती इराणी यांची पोस्ट-

‘जीवन हे असंच आहे.. माझ्या आयुष्यातील एक दशक हा एका गावातून दुसऱ्या गावात जाण्यात, जीवन घडवण्यात, आशा-आकांक्षा जोपासण्यात, पायाभूत सुविधांवर काम करण्यात, रस्ते-नाले, खडंजा, बायपास, वैद्यकीय महाविद्यालये आणि इतर बऱ्याच गोष्टींमध्ये गेला. माझ्या पराभव आणि विजयात जे लोक पाठिशी उभे राहिले त्यांची मी सदैव ऋणी आहे. जे आज यश साजरा करत आहेत, त्यांचंही अभिनंदन आणि जे असा प्रश्न विचारत आहेत की ‘हाऊ इज द जोश?’ त्यांना मी सांगू इच्छिते की इट्स स्टिल हाय, सर’, अशी पोस्ट स्मृती इराणींनी लिहिली आहे. त्यांच्या या पोस्टवर नेटकऱ्यांकडून विविध प्रतिक्रिया समोर येत आहेत.

‘तुम्ही तुमच्या अहंकारामुळे ही निवडणूक हरलात’, असं एकाने लिहिलं. तर ‘तुम्ही तुमच्या पराभवासाठी अमेठीतील जनतेला का कारणीभूत ठरवत आहात? तुमच्या अहंकाराची किंमत तुम्हाला अमेठीतच मोजावी लागली’, असं दुसऱ्या युजरने म्हटलं आहे. ‘आयुष्यातील धडा.. लोकांना कधीच कमी लेखू नका’, अशीही कमेंट नेटकऱ्यांनी केली आहे. तुम्ही तुलसीच्याच भूमिकेसाठी योग्य होता, असं काहींनी म्हटलं आहे.

अमेठी लोकसभा मतदारसंघातून 2019 च्या निवडणुकीत काँग्रेसचे राहुल गांधी आणि भाजपच्या स्मृती इराणी यांच्यात टक्कर झाली होती. स्मृती इराणींनी राहुल यांना हरवत 2014 मध्ये झालेल्या पराभवाचा सूड घेतला होता. आता काँग्रेसच्या किशोरी लाल शर्मा यांनी त्यांना हरवत पुन्हा एकदा अमेठीची जागा आपल्याकडे घेतली आहे. निवडणुकीच्या प्रचारादरम्यान स्मृती इराणींनी किशोरी लाल यांच्यावर जोरदार टीका केली होती. त्यांनी किशोरी लाल शर्मा यांना ‘चौकीदार’ म्हटलं होतं. यंदा काँग्रेस अमेठीसोबतच रायबरेली मतदारसंघातूनही हरणार, असा विश्वास इराणींनी व्यक्त केला होता.

Follow Us
आता परीक्षा केंद्रावारून उठायचं नाही... अभिजीत दीपकेंचं पुन्हा आंदोलन?
आता परीक्षा केंद्रावारून उठायचं नाही... अभिजीत दीपके पुन्हा आंदोलनाला बसले, हायकोर्ट टायपिंग परीक्षा प्रकरण तापलं
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांची मोठी कबुली; गोपीनाथ मुंडेंबाबत..
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांची मोठी कबुली; गोपीनाथ मुंडेंच्या काँग्रेसमध्ये प्रवेशाच्या दाव्यावर म्हणाले...
छत्रपती संभाजीनगरात हायकोर्ट टायपिंग परीक्षेत मोठा गोंधळ, काय घडलं?
छत्रपती संभाजीनगरात हायकोर्ट टायपिंग परीक्षेत मोठा गोंधळ, नेमकं काय घडलं?
मोठी बातमी! बावनकुळेंचे चार कॉल आले, म्हणाले... मनोज जरांगेंचा खुलासा
मोठी बातमी! बावनकुळेंचे चार कॉल आले, म्हणाले... मनोज जरांगेंचा कुणबी प्रमाणपत्राबाबत मोठा खुलासा
मला वाद वाढवायचा नाही, मी माफी मगतोय... भावेश कावरेचं मोठं विधान
मला वाद वाढवायचा नाही, मी माफी मगतोय... ब्रोकर भावेश कावरे ठाकरेंच्या भेटीनंतर नेमकं काय म्हणाला?
एकच खळबळ! सगळीकडे धावपळ... आंतरराष्ट्रीय विमानतळावर मिसफायर
एकच खळबळ! सगळीकडे धावपळ... आंतरराष्ट्रीय विमानतळावर मिसफायर, व्हिडीओच आला समोर
मुंबईत भयंकर घडलं! 112 वर कॉल केला अन्...
मुंबईत भयंकर घडलं! 112 वर कॉल केला अन्... पोलिसांनीच मारहाण केल्याच्या आरोपाने मोठी खळबळ
अमित शाहांनी भर मंचावरून काँग्रेसची लाज काढली; थेट म्हणाले, जराशी...
अमित शाहांनी भर मंचावरून काँग्रेसची लाज काढली; थेट म्हणाले, जराशी तरी लाज शिल्लक असेल तर...
लातूरमधील घटना: रुग्णालयात प्रसूतीदरम्यान महिलेचा मृत्यू
लातूरमधील खासगी रुग्णालयात प्रसूतीदरम्यान महिलेचा मृत्यू, नातेवाईकांकडून निष्काळजीपणाचा आरोप
रुग्णालयातून थेट अंतरवाली सराटीत; जरांगे पाटलांच्या बैठकीत काय घडलं?
Maratha Arakshan | रुग्णालयातून थेट अंतरवाली सराटीत; जरांगे पाटलांच्या बैठकीत नेमकं काय घडलं?