AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

इंडिया आघाडीने असा पलटला खेळ; 2019 च्या तुलनेत काँग्रेसला लक्षणीय फायदा

लोकसभा निवडणुकीच्या सातव्या आणि अखेरच्या टप्प्यातील मतदान शनिवारी संध्याकाळी पार पडल्यानंतर उघड झालेल्या सर्व संस्थांच्या मतदानोत्तर चाचण्यांनी रालोआला सरासरी 350 हून अधिक जागा मिळण्याचा अंदाज व्यक्त केला होता.

इंडिया आघाडीने असा पलटला खेळ; 2019 च्या तुलनेत काँग्रेसला लक्षणीय फायदा
INDIA blocImage Credit source: Instagram
| Updated on: Jun 04, 2024 | 12:34 PM
Share

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी साडेतीनशेहून अधिक जागांवर विजय मिळवून तिसऱ्यांदा सत्ता स्थापन करेल, असा अंदाज सर्वच मतदानोत्तर चाचण्यांमधून व्यक्त करण्यात आला होता. सलग दहा वर्षे सत्तेत राहूनही भाजपविरोधी वातावरण नसल्याचा आणि विरोधी पक्षांच्या ‘इंडिया’ आघाडीचा फारसा प्रभाव निकालांवर पडणार नसल्याचा अंदाज या चाचण्यांमधून व्यक्त झाला होता. मात्र निवडणूक निकालाचे सुरुवातीचे आकडे पाहता 2019 च्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत ‘इंडिया’ आघाडी आणि विशेषत: काँग्रेससाठी लक्षणीय फायदा होणार असल्याचं दिसतंय. सकाळी 11 वाजेपर्यंत एनडीए 291 जागांवर आणि इंडिया आघाडी 226 जागांवर पुढे होती. 2019 मध्ये केवळ 52 जागा जिंकणारी काँग्रेस आता 98 लोकसभा मतदारसंघात आघाडीवर आहे.

मागच्या निवडणुकीत भाजपने 303 जागा जिंकून 272 चा टप्पा आरामात ओलांडून जबरदस्त विजय मिळवला होता. या पक्षाला एकूण मतांपैकी 37.36 टक्के मतं मिळाली होती. तर दुसरीकडे काँग्रेसला एकूण मतांपैकी 19.5 टक्के मतं मिळाली होती. आता सकाळी 11 वाजेपर्यंत समोर आलेल्या सुरुवातीच्या कलांनुसार, एनडीएला एकूण मतदानापैकी 44 टक्के आणि इंडिया आघाडीला 41 टक्के मतं मिळाली आहेत. भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएचा स्ट्राइक रेट 54 टक्के होता, तर इंडिया आघाडीचा स्ट्राइक रेट 42 टक्के होता.

Lok Sabha Election Results 2024 Leading & Trailing LIVE : स्मृती इराणी किती हजार मतांनी पिछाडीवर?

उत्तर प्रदेशात विरोधी पक्षांच्या आघाडीची स्थिती सकारात्मक दिसून येत आहे. सुरुवातीच्या ट्रेंडनुसार काँग्रेस-समाजवादी पक्ष 42 जागांवर आघाडीवर आहे, तर भाजप 37 जागांवर आघाडीवर आहे. 2019 मध्ये भाजपने उत्तर प्रदेशमध्ये मोठा विजय मिळवला होता. भाजपने त्यावेळी 80 पैकी 62 जागा जिंकल्या होत्या. तर अपना दलने दोन जागा जिंकल्या होत्या. समाजवादी पक्षाला केवळ पाच जागा मिळाल्या होत्या. तर काँग्रेसने फक्त एकाच जागेवर विजय मिळवला होता.

Follow Us
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार...
आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब
Chandrashekhar Bawankule : आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब, बावनकुळेंनी दिली महायुती बैठकीची माहिती
विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
'विद्यार्थी भीक नाही हक्क मागतायत', पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
Dharashiv | धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
निधीवरुन मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा काढला जाणार
महायुतीच्या समन्वय समितीची बैठक: निधीवरून मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा, फडणवीस-शिंदेंकडे अंतिम निर्णय
पुण्यात राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीने मांडले आदिवासींचे प्रश्न
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोर विद्यार्थीनीनं आदिवासींच्या समस्यांचा पाढा वाचला
नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
खान्देशात कानबाई विसर्जन २०२४; उत्साही सोहळा
खान्देशात कानबाई मातेचं विसर्जन: लोकसंस्कृतीचा उत्साही सोहळा