AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

The Kerala Story | “हा चित्रपट द्वेष पसरवतो पण..”; ‘द केरळ स्टोरी’ फेम अदा शर्माच्या वक्तव्याची चर्चा

काही राज्यांमध्ये या चित्रपटावर बंदी घालण्यात आली आहे. तर काहींनी हा चित्रपट प्रचारकी असल्याचं म्हटलंय. अशा नकारात्मक प्रतिक्रियांबद्दल अदा पुढे म्हणाली, "मी हे मान्य करते की आमचा चित्रपट द्वेष पसरवतो, पण.."

The Kerala Story | हा चित्रपट द्वेष पसरवतो पण..; 'द केरळ स्टोरी' फेम अदा शर्माच्या वक्तव्याची चर्चा
| Updated on: May 17, 2023 | 3:07 PM
Share

मुंबई : ‘द केरळ स्टोरी’ हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरल्याने यात मुख्य भूमिका साकारणारी अभिनेत्री अदा शर्मा सध्या यशाच्या शिखरावर आहे. हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर अवघ्या दहा दिवसांत अदा शर्मा ही बॉलिवूडमध्ये अभिनेत्रींवर केंद्रीत चित्रपटांमध्ये सर्वाधिक कमाई करणारी सेलिब्रिटी ठरली आहे. सुदिप्तो सेन यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं असून त्यात अदासोबतच सोनिया बलानी, योगिता बहानी आणि सिद्धी इदनानी यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. अदा शर्माने 2008 मध्ये बॉलिवूडमधील करिअरला सुरुवात केली. मात्र ‘द केरळ स्टोरी’मुळे ती आता प्रकाशझोतात आली आहे.

चित्रपटाला मिळणाऱ्या सकारात्मक प्रतिसादाबद्दल ती ‘डीएनए’ला दिलेल्या मुलाखतीत म्हणाली, “या चित्रपटाला इतका चांगला प्रतिसाद मिळेल, याची मी कधी कल्पनाच केली नव्हती. मी या इंडस्ट्रीतून नाही. त्यामुळे जेव्हाकधी मी एखादी ऑफर स्वीकारायचे, तेव्हा तो माझा शेवटचा चित्रपट असेल असा विचार करायचे. मला स्वत:वरच शंका असायची. कोणी माझ्या कामावर विश्वास ठेवणार का, असा प्रश्न मला पडायचा. पण आता खूप चांगलं वाटतंय. इंडस्ट्रीबाहेरून आलेली एक मुलगी असं काही करू शकेल, याचा कोणी विचार केला असेल. मला अशा अनेक कलाकारांचे मेसेज आले की, तुझ्यामुळे आम्हालासुद्धा सकारात्मकता मिळाली आहे.”

काही राज्यांमध्ये या चित्रपटावर बंदी घालण्यात आली आहे. तर काहींनी हा चित्रपट प्रचारकी असल्याचं म्हटलंय. अशा नकारात्मक प्रतिक्रियांबद्दल अदा पुढे म्हणाली, “मी हे मान्य करते की आमचा चित्रपट द्वेष पसरवतो, पण तो दहशतवादाविरोधात द्वेष पसरवतो. प्रेमाच्या नावाखाली एखाद्याची फसवणूक करणे आणि अत्याचार करणे हे लज्जास्पद आहे. मला त्या गोष्टीचा खूप राग आहे. हा चित्रपट दहशतवाद विरुद्ध माणुसकीचा आहे. जर या चित्रपटामुळे कोणाला समस्या असेल तर ते ISIS ला असायला पाहिजे. त्यामुळे इतर लोकांची विविध मतं असली तरी मला फरक पडत नाही. पण चित्रपट पाहिल्याशिवाय त्याबद्दल आधीच मत बनवू नका.”

“एक अभिनेता किंवा अभिनेत्री म्हणून आपलं काम प्रेक्षकांपर्यंत पोहोचावं अशी प्रत्येकाची इच्छा असते. मला ती संधी मिळाली, यासाठी मी कृतज्ञ आहे. अशा संधीसाठी मला ‘ओम शांती ओम’मधल्या शाहरुख खानसारखा पुनर्जन्म घ्यावा लागेल की काय, असा विचार मी करायचे. पण या चित्रपटाच्या माध्यमातून मला जी संधी मिळाली, त्यासाठी मी खूप खुश आहे”, असंही ही याआधीच्या एका मुलाखतीत म्हणाली होती.

Follow Us
खरात प्रकरणावरून राजकीय वर्तुळात गदारोळ; मंत्री शिरसाट म्हणाले....
खरात प्रकरणावरून राजकीय वर्तुळात गदारोळ; मंत्री शिरसाट म्हणाले.....
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात.
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत.
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास.
150 व्हिडिओ, मोठा तपास; तरीही नीलम गोऱ्हे का गप्प? खरात प्रकरणावर....
150 व्हिडिओ, मोठा तपास; तरीही नीलम गोऱ्हे का गप्प? खरात प्रकरणावर.....
नीलम गोऱ्हे आणि अशोक खरात भेटीवर प्रश्नचिन्ह
नीलम गोऱ्हे आणि अशोक खरात भेटीवर प्रश्नचिन्ह.
आदित्य ठाकरे थेट भाजपच्या बड्या नेत्याच्या घरी, राजकीय चर्चांना उधाण
आदित्य ठाकरे थेट भाजपच्या बड्या नेत्याच्या घरी, राजकीय चर्चांना उधाण.
39 आमदार भेटले होते, मग फक्त मलाच का टार्गेट केलं जातंय?
39 आमदार भेटले होते, मग फक्त मलाच का टार्गेट केलं जातंय?.
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.