AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘भाबीजी’मधील कलाकाराच्या निधनानंतर पत्नीचे जगणे झाले मुश्कील, आज जगतेय असे आयुष्य

अभिनेता दीपेश भान यांच्या आठवणी आजही त्यांच्या चाहत्यांच्या मनात जिवंत आहेत. त्यांचे ‘मलखान’ हे पात्र नेहमीच स्मरणात राहील. दीपेश यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी नेहा यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. पण दीपेश यांच्या सहकलाकारांनी त्यांना मदत केली.

'भाबीजी’मधील कलाकाराच्या निधनानंतर पत्नीचे जगणे झाले मुश्कील, आज जगतेय असे आयुष्य
Bhabhiji Ghar Par haiImage Credit source: Tv9 Network
| Updated on: Jul 25, 2025 | 4:02 PM
Share

टीव्हीवरील सर्वात लोकप्रिय विनोदी मालिका ‘भाबीजी घर पर हैं’मध्ये ‘मलखान’ची भूमिका साकारून घरोघरी प्रसिद्ध झालेले अभिनेता दीपेश भान यांच्या निधनाला आता तीन वर्षे पूर्ण झाली आहेत. 2022 मध्ये त्यांच्या अकस्मात मृत्यूने संपूर्ण टीव्ही विश्वाला धक्का बसला होता. त्यांच्या तिसऱ्या पुण्यतिथीला, मालिकेतील त्यांच्या सहकलाकार सौम्या टंडन (अनीता भाभी) यांनी अत्यंत भावनिक पोस्ट शेअर करून त्यांना आठवण केली. ‘भाबीजी घर पर हैं’चे कलाकार दीपेश यांना विसरू शकले नसले, तरी ते त्यांच्या आयुष्यात पुढे गेले आहेत. पण दीपेश यांच्या पत्नी नेहा भान यांच्यासाठी त्यांच्या पतीच्या मृत्यूनंतरचा प्रवास सोपा नव्हता. नेहा यांनी दीपेश यांच्या जाण्यानंतर समाजाच्या टोमण्यांचा सामना केला. नेहा यांची कहाणी खरोखरच हृदयद्रावक आहे.

दीपेश भान यांचे अकस्मात निधन

दीपेश भान यांचे वय अवघे 41 वर्षे होते जेव्हा नियतीने त्यांच्याकडून सर्व काही हिरावून घेतले. 2022 मध्ये एका सकाळी, क्रिकेट खेळताना ते अचानक मैदानावर कोसळले. काही वेळातच कळले की त्यांना ब्रेन हॅमरेज झाला होता आणि वेळेपूर्वीच त्यांचा श्वास थांबला. त्यांच्या या अकस्मात मृत्यूमुळे केवळ टीव्ही इंडस्ट्रीलाच नव्हे, तर त्यांच्या पत्नी नेहा भान आणि त्यावेळी त्यांच्या एक वर्षाच्या निरागस मुलावर दु:खांचा डोंगर कोसळला होता. दीपेश यांच्या जाण्यानंतर, नेहा यांच्याकडे कोणताही आधार नव्हता आणि त्यांना त्यांच्या मुलाच्या भविष्याची चिंता सतावू लागली होती.

वाचा: फक्त ऑनलाईन पेमेंट करायचा, QR Code स्कॅन करायचा अन् दुकानदार… असं काय घडायचं? कसा बनला तो श्रीमंत?

दीपेश यांच्या पत्नीची दयनीय अवस्था

दीपेश यांच्या निधनानंतर, त्यांच्या पत्नी नेहा भान यांना ज्या कठीण काळातून जावे लागले, ते जाणून घेणे खरोखरच हृदय पिळवटून टाकणारे आहे. 2023 मध्ये एका मुलाखतीत नेहा यांनी सांगितले की, त्यांच्या पतीच्या मृत्यूनंतर लोकांनी त्यांचे जगणे कसे कठीण केले होते. नेहा यांनी खुलासा केला की, समाजाने त्यांना दु:खाचा व्यक्त करण्याचा अधिकारही दिला नाही. लोक त्यांच्या हसण्यावर, कपड्यांवर आणि अगदी घराबाहेर पडण्यावरही टोमणे मारत होते. “ही तर आता हसू लागली आहे. असे कपडे घालते. बाहेर निघायला लागली आहे,” असे टोमणे त्यांच्या मागे बोलले जायचे. सर्वात वेदनादायक गोष्ट म्हणजे काही लोक तर म्हणायचे, “हिला आता घरी बसून रडायला हवे, दु:ख व्यक्त करायला हवे, पण हिला दु:ख नाही कारण यांचे तर अरेंज मॅरेज होते.” हे शब्द नेहा यांच्या हृदयाला तडे देत होते आणि त्यांना गंभीर धक्का देत होते.

नेहा पूर्णपणे खचल्या

सुरुवातीला नेहा या टोमण्यांनी पूर्णपणे खचल्या होत्या. त्यांना समजत नव्हते की त्यांनी आपले दु:ख कसे व्यक्त करावे आणि लोकांच्या बोलण्याचा सामना कसा करावा. पण त्यांनी स्वतःला सावरले आणि आपल्या मुलासाठी मजबूत बनण्याचा निर्णय घेतला. नेहा यांनी सांगितले की, त्यांनी या नकारात्मकतेतून बाहेर पडण्यासाठी योग आणि ध्यानाचा आधार घेतला. याच दृढनिश्चयाने त्यांना त्यांच्या आतील शक्ती ओळखण्याची, पुढे जाण्याची हिम्मत मिळाली. त्यांनी ठरवले होते की, त्यांना त्यांच्या मुलाला उज्ज्वल भविष्य द्यायचे आहे, मग त्यासाठी कितीही अडचणी का येईनात.

नेहा यांचे सध्याचे जीवन

या कठीण काळात टीव्ही इंडस्ट्रीतील काही लोकांनी नेहा यांच्या पाठीशी उभे राहून त्यांना आधार दिला. सौम्या टंडन यांनी नेहा यांना केवळ भावनिक आधारच दिला नाही, तर त्यांची आर्थिक मदतही केली. प्रत्येक पावलावर त्यांचा साथ दिली. याशिवाय, दीपेश यांच्या सहकलाकार शुभांगी अत्रे आणि ‘भाबीजी घर पर हैं’च्या निर्मात्या बिनैफर कोहली यांनीही नेहा यांना आर्थिक मदत केली.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.