AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

18 वर्षांपासून अजय देवगण नाराज, धरला अबोला..; दिग्दर्शकाकडून मोठी खंत व्यक्त

बॉलिवूडच्या प्रसिद्ध दिग्दर्शकाने एका मुलाखतीत अजय देवगणबद्दलची ही मोठी खंत बोलून दाखवली. गेल्या 18 वर्षांत अजय माझ्याशी बोललाच नाही, असं ते म्हणाले. या दोघांमध्ये नेमका कशावरून वाद झाला, त्याबद्दल सविस्तर वाचा..

18 वर्षांपासून अजय देवगण नाराज, धरला अबोला..; दिग्दर्शकाकडून मोठी खंत व्यक्त
Ajay DevgnImage Credit source: Instagram
| Updated on: Mar 01, 2026 | 3:28 PM
Share

दिग्दर्शक अनुभव सिन्हा हे ‘थप्पड’, ‘रावन’, ‘मुल्क’, ‘आर्टिकल 15’ अशा चित्रपटांसाठी ओळखले जातात. परंतु त्यांनी करिअरमध्ये असेही काही चित्रपट बनवले आहेत, ज्यांची खंत त्यांना आजही आहे. अनुभव यांच्या मते त्यांनी त्यांच्या करिअरमधील सर्वांत वाईट चित्रपट अजय देवगणसोबत बनवला होता. 2017 मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाचं नाव ‘कॅश’ असं होतं. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर इतक्या दणक्यात आपटला की त्यानंतर अजय आणि अनुभव यांच्यात दुरावा निर्माण झाला. एका मुलाखतीत खुद्द अनुभव यांनी याविषयीचा खुलासा केला होता. गेल्या 18 वर्षांपासून अजय माझ्याशी बोललाच नाही, असं त्यांनी सांगितलं.

‘द लल्लनटॉप’ या वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत अनुभव म्हणाले, “अजय देवगण हा माणूस म्हणून खूप चांगला आहे. परंतु जेव्हा चित्रपट चालत नाहीत, तेव्हा टीम वेगळे होतात. मी माझ्या करिअरमधील सर्वांत वाईट चित्रपट अजयसोबत केला होता. आम्ही कधीच भांडलो नाही. पण तो माझ्याशी बोलत नाही आणि त्यामागील कारण मला माहीत नाही.” ‘कॅश’ या चित्रपटात अजय देवगणसोबतच सुनील शेट्टी, ईशा देओल, रितेश देशमुख, जाएद खान, शमिता शेट्टी, आयेशा टाकिया आणि दिया मिर्झा अशी मोठी स्टारकास्ट होती. केपटाऊन आणि दक्षिण आफ्रिकेत या चित्रपटाचा बहुतांश भाग शूट झाला होता. दिसायला हा चित्रपट जरी स्टायलिश वाटत असला तरी कमकुवत कथेमुळे तो प्रेक्षकांना फारसा आवडला नाही. याच कारणामुळे हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाला.

“कॅश या चित्रपटानंतर आम्ही भेटलोसुद्धा नाही. त्यामुळे तो मला जाणूनबुजून दुर्लक्ष करतोय, असंही मी तुम्हाला सांगू शकत नाही. कदाचित हे माझे अतिविचार असतील. पण मी त्याला मेसेज केले होते. त्याच्याकडून माझ्या मेसेजला रिप्लाय कधीच मिळाला नाही. त्यामुळे कदाचित त्याने मेसेज पाहिले नसावेत, अशी मी स्वत:ची समजून काढतोय. पण गेल्या 18 वर्षांपासून आमच्यात अजिबात संवाद झाला नाही,” असं अनुभव सिन्हा यांनी स्पष्ट केलं. सध्या अनुभव सिन्हा यांचा ‘अस्सी’ हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे. या निमित्ताने त्यांची ही जुनी मुलाखत पुन्हा चर्चेत आली आहे.

Follow Us
हातभट्टीच्या दारूला सरकारी परवानगी द्या, रामदास आठवलेंची मागणी
हातभट्टीच्या दारूला सरकारी परवानगी द्या, रामदास आठवलेंची मागणी.
विखे लवकरच भिकेला लागणार, संजय राऊतांचा विखे-पाटलांवर घणाघात
विखे लवकरच भिकेला लागणार, संजय राऊतांचा विखे-पाटलांवर घणाघात.
सर्वात मोठी घडामोड! 447.27 कोटींचा तो आदेश रद्द... रिलायन्सला सर्वोच्च
सर्वात मोठी घडामोड! 447.27 कोटींचा तो आदेश रद्द... रिलायन्सला सर्वोच्च.
NEET घोटाळ्याविरोधात रस्त्यावर उतरली युवा काँग्रेस; सरकारविरोधात....
NEET घोटाळ्याविरोधात रस्त्यावर उतरली युवा काँग्रेस; सरकारविरोधात.....
काँग्रेसची शाल घालून सुप्रिया सुळेंच स्वागत; म्हणाल्या, माझा काँग्रेस
काँग्रेसची शाल घालून सुप्रिया सुळेंच स्वागत; म्हणाल्या, माझा काँग्रेस.
लाडक्या बहिणींनी लगेच लक्ष द्या! मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय
लाडक्या बहिणींनी लगेच लक्ष द्या! मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय.
भर चौकात,रस्त्यावर नमाज पठणास बंदी घाला, भाजप नेत्याने थेट आयुक्तांना
भर चौकात,रस्त्यावर नमाज पठणास बंदी घाला, भाजप नेत्याने थेट आयुक्तांना.
गांजाच्या झाडाने तुळशीला पवित्रता शिकवू नये! महायुतीमधील अंतर्गत वाद..
गांजाच्या झाडाने तुळशीला पवित्रता शिकवू नये! महायुतीमधील अंतर्गत वाद...
जेजुरी देवस्थानाबाबत मोठा निर्णय, पोलिसांकडून थेट कारवाईचा इशारा...
जेजुरी देवस्थानाबाबत मोठा निर्णय, पोलिसांकडून थेट कारवाईचा इशारा....
माथेरानच्या घोड्यांसाठी देवदूत ठरले अंबानी; मोफत उपचारांनी दिला दिलासा
माथेरानच्या घोड्यांसाठी देवदूत ठरले अंबानी; मोफत उपचारांनी दिला दिलासा.