AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

World Cup 2023 | ऑस्ट्रेलियावर विजय मिळवताच अनुष्काची खास पोस्ट; विराटसोबत शेअर केला ‘या’ क्रिकेटरचा फोटो

टीम इंडियाने या विजयासह चेन्नईतील ऑस्ट्रेलियाचा 36 वर्षांचा हिशोब चुकता केला. याआधी 1987 च्या वर्ल्ड कपमध्ये टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया चेन्नईत आमनेसामने होते. तेव्हा ऑस्ट्रेलियाने टीम इंडियावर 1 धावाने रोमहर्षक विजय मिळवला होता. आता 36 वर्षांनी टीम इंडियाने हिशोब पूर्ण केला.

World Cup 2023 | ऑस्ट्रेलियावर विजय मिळवताच अनुष्काची खास पोस्ट; विराटसोबत शेअर केला 'या' क्रिकेटरचा फोटो
Anushka and ViratImage Credit source: Instagram
| Updated on: Oct 09, 2023 | 11:20 AM
Share

मुंबई | 9 ऑक्टोबर 2023 : रविवारी संपूर्ण देशभरात जल्लोषाचा माहौल पाहायला मिळाला. केएल राहुल आणि विराट कोहली यांची झुंजार बॅटिंग आणि त्यापूर्वी रवींद्र जडेजाने केलेली बॉलिंग याच्या जोरावर भारताने ऑस्ट्रेलियाला सहा गडी आणि 52 चेंडू राखून नमवलं. भारताच्या या विजयात विराट कोहलीने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. म्हणूनच देशभरातील चाहत्यांकडून त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. या विजयाबद्दल विराटची पत्नी आणि अभिनेत्री अनुष्का शर्मानेही सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर केली आहे.

अनुष्का शर्माची पोस्ट

अनुष्का शर्माने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर आयसीसीची एक पोस्ट शेअर केली आहे. आयसीसीच्या या पोस्टमध्ये विराट कोहलीसोबत केएल राहुल पाहायला मिळतोय. या दोघांचा फोटो शेअर करत अनुष्काने निळ्या रंगाचा हृदयाचा इमोजी त्यावर पोस्ट केला आहे. अनुष्कासोबतच सोशल मीडियावर असंख्य क्रिकेटप्रेमी विराट कोहली आणि टीम इंडियाला शुभेच्छा देत आहेत.

भारताने सुरुवातीच्या दोन ओव्हर्समध्ये इशान किशन, कॅप्टन रोहित शर्मा आणि श्रेयस अय्यर असे आघाडीचे तीन फलंदाज गमावले. हे तिघंही खातं न उघडता बाद झाले. त्यावेळी आव्हानात्मक स्थितीत विराट कोहली आणि केएल राहुल यांनी आपलं वेगळेपण सिद्ध केलं. दोघांनी 164 धावांची अप्रतिम भागीदारी रचली. त्यामुळे भारताने 200 धावांचं आव्हान 41.2 ओव्हर्समध्ये पूर्ण केलं. विराट आणि राहुलने एक-दोन धावांवर भर दिला. तर दोघांनी मिळून 14 चौकार आणि दोन षटकार मारले.

ऑस्ट्रेलियाची बॅटिंग

त्याआधी ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला. मात्र टीम इंडियाच्या गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियाचं 199 धावांवर पॅकअप केलं. ऑस्ट्रेलियाकडून स्टीव्हन स्मिथ याने 46 आणि डेव्हिड वॉर्नर याने 41 धावा केल्या. तर मार्नस लाबुशेन याने 27 आणि अखेरच्या क्षणी मिचेल स्टार्क याने 28 धावांचं योगदान दिलं. तर इतरांना टीम इंडियाच्या गोलंदाजांना हात खोलण्यापासून रोखलं. टीम इंडियाकडून रवींद्र जडेजा याने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. कुलदीप यादव आणि जसप्रीत बुमराह या दोघांनी 2-2 विकेट्स घेतल्या. तर मोहम्मद सिराज, हार्दिक पंड्या आणि आर अश्विन या तिघांच्या खात्यात प्रत्येकी 1 विकेट गेली.

Follow Us
मोठी बातमी! ठाकरेंच्या आणखी एका बड्या नेत्याचं तळ्यात-मळ्यात; 'मातोश्र
मोठी बातमी! ठाकरेंच्या आणखी एका बड्या नेत्याचं तळ्यात-मळ्यात; 'मातोश्री'वरील बैठकीआधीच नॉट रिचेबल
40 वर्षानंतर 'कोयना'चं पाणी आटलं; 1952 साली पाण्याखाली गेलेल्या गावाचे
Video | 40 वर्षानंतर 'कोयना'चं पाणी आटलं; 1952 साली पाण्याखाली गेलेलं गाव अवशेषांसह आलं वर; पहा व्हिडीओ
'गरिबांची धारावी का गिळताय? राऊतांचा सत्ताधारी पक्षाला थेट सवाल
Sanjay Raut On Dharavi | 'गरिबांची धारावी का गिळताय? राऊतांचा सत्ताधारी पक्षाला थेट सवाल
मोठी अपडेट! मनसे नेते संदीप देशपांडेंचं जैन मुनींना थेट आव्हान; आता
मोठी अपडेट! मनसे नेते संदीप देशपांडेंचं जैन मुनींना थेट आव्हान; आता मुंब्य्रात...
इकडे फडणवीसांचं आमदारांना प्रपोजल, तिकडे ठाकरेंच्या नगराध्यक्षा थेट...
इकडे फडणवीसांचं आमदारांना प्रपोजल, तिकडे ठाकरेंच्या नगराध्यक्षा थेट महाजनांच्या भेटीला; उद्धव ठाकरेंचं टेन्शन वाढलं?
आम्ही चिमटे नाही काढत थेट हल्ला करतो... भर मंचावर संजय राऊतांची सत्ताध
आम्ही चिमटे नाही काढत थेट हल्ला करतो... भर मंचावर संजय राऊतांची सत्ताधाऱ्यांवर बोरची टीका
ये डर अच्छा है! ऑपरेशन टायगरच्या चर्चेत वाघमारेंचा ठाकरे गटाला इशारा
ये डर अच्छा है! ऑपरेशन टायगरच्या चर्चेत ज्योती वाघमारेंचा ठाकरे गटाला थेट इशारा, संजय राऊतांवरही निशाणा
पाणी डोक्यावरून गेलंय... ठाकरे गटाची तातडीने बैठक अन् अंबादास दानवेंचं
पाणी डोक्यावरून गेलंय... ठाकरे गटाची तातडीने बैठक अन् अंबादास दानवेंचं विधान; राजकारणात मोठा भूकंप येणार?
प्रणित मोरे प्रकरण थेट संसदेत? शिंदेंच्या महिला खासदाराचा प्रचंड संताप
आता प्रणित मोरे प्रकरण थेट संसदेत? शिंदेंच्या महिला खासदाराचा प्रचंड संताप; लवकरच...
कर्जमाफीवरून सरकारने अखेर बैठक बोलवली, नेमकं काय घडतंय?
Dattatray Bharne | कर्जमाफीवरून सरकारने अखेर बैठक बोलवली, रोहित पवारांच्या उपोषणामुळे हालचाली वाढल्या, नेमकं काय घडतंय?