AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs AUS | “विराट-केएल या दोघांना…”, रोहित शर्मा याची प्रतिक्रिया व्हायरल

Rohit Sharma On Virat kohli And K L Rahul | ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मा अपयशी ठरला. त्याला भोपळही फोडता आला नाही. मात्र तो विराट कोहली आणि केएल राहुल यांच्याबाबत काय म्हणाला जाणून घ्या.

IND vs AUS | विराट-केएल या दोघांना..., रोहित शर्मा याची प्रतिक्रिया व्हायरल
| Updated on: Oct 08, 2023 | 11:20 PM
Share

चेन्नई | भारतीय क्रिकेट संघाने आयसीसी वनडे वर्ल्ड कपमध्ये शानदार आणि जोरदार अशी सुरुवात केली आहे. टीम इंडियाने आपल्या पहिल्या सामन्यात 5 वेळा वर्ल्ड चॅम्पियन राहिलेल्या ऑस्ट्रेलियाचा 6 विकेट्सने धुव्वा उडवला आहे. आधी टीम इंडियाने चेन्नईतील एम ए चिदंबरम स्टेडियममध्ये ऑस्ट्रेलियाला 49.3 ओव्हरमध्ये 199 धावांवर ऑलआऊट केलं. त्यानंतर टीम इंडियाने हे आव्हान 41.2 ओव्हरमध्ये पूर्ण केलं. टीम इंडियाची 200 धावांचा पाठलाग करताना अत्यंत वाईट सुरुवात झाली. ईशान किशन, रोहित शर्मा आणि श्रेयस अय्यर हे तिघे झिरोवर आऊट झाले. मात्र त्यानंतर विराट कोहली आणि केएल राहुल या दोघांनी झुंज देत विजयश्री खेचून आली.

विराट कोहली आणि केएल राहुल या दोघांनी 165 रन्सची पार्टनरशीप केली. या निर्णायक भागीदारीमुळे टीम इंडिया विदयी झाली. टीम इंडियाकडून केएल राहुल याने सर्वाधिक नाबाद 97 धावा केल्या. तर विराट कोहली याने 85 धावांचं योगदान दिलं. टीम इंडियाच्या या विजयानंतर कॅप्टन रोहित शर्मा याने प्रतिक्रिया दिली. रोहित नक्की काय म्हणाला हे आपण जाणून घेऊयात.

रोहित काय म्हणाला?

“सर्व काही रोमहर्षक होतं. जिंकून चांगलं वाटतंय. अशा स्पर्धेची सुरुवात करणं चांगलं आहे. आम्ही उत्तम फिल्डिंग केली. सर्वच खेळाडूंनी प्रयत्न केले. गोलंदाजांनी परिस्थितीचा चांगला फायदा घेतला. आम्हाला माहिती होतंच की खेळपट्टी मदतशीर ठरेल. स्पिनर्सेनेही चांहली बॉलिंग केली. एकूणच हा चांगला प्रयत्न होता. आम्ही 3 विकेट्स गमावल्या तेव्हा नाराज होतो. कुणीही आपल्या डावाची सुरुवात अशी करुन इच्छिणार नाही. याचं संपूर्ण श्रेय हे ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांचं आहे. मात्र त्यानंतर विराट कोहली आणि केएल राहुल या दोघांनी शानदार खेळ दाखवला. दोघांनी मॅचविनिंग पार्टनरशीप केली. आम्हाला येत्या काही दिवसात वेगवगेळ्या परिस्थितीशी तोंड द्याव लागेल” असं रोहित शर्मा टीम इंडियाच्या विजयानंतर म्हणाला.

ऑस्ट्रेलिया प्लेईंग इलेव्हन | पॅट कमिन्स (कॅप्टन), डेव्हिड वॉर्नर, मिचेल मार्श, स्टीव्हन स्मिथ, अॅलेक्स कॅरी (विकेटकीपर), मार्नस लॅबुशेन, ग्लेन मॅक्सवेल, कॅमेरॉन ग्रीन, मिचेल स्टार्क, एडम झाम्पा आणि जोश हेझलवूड.

टीम इंडिया प्लेईंग इलेव्हन | रोहित शर्मा (कर्णधार), ईशान किशन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज.

Follow Us
मी आज ठाकरे सेनेत उद्या.. हिंट देऊन नेता नॉट रिचेबल; बैठकी आधीच 'उबाठा
मी आज ठाकरे सेनेत उद्या.. हिंट देऊन नेता नॉट रिचेबल; बैठकी आधीच 'उबाठा'त मोठा भुकंप?
ठाकरेंच्या बैठकीआधी मोठं घडतंय! कोणी नॉट रिचेबल कोणी व्हर्च्युअली
ठाकरेंच्या बैठकीआधी मोठं घडतंय! कोणी नॉट रिचेबल कोणी व्हर्च्युअली उपस्थिती; नेमकी भानगड काय?
मोठी बातमी! ठाकरेंच्या आणखी एका बड्या नेत्याचं तळ्यात-मळ्यात; 'मातोश्र
मोठी बातमी! ठाकरेंच्या आणखी एका बड्या नेत्याचं तळ्यात-मळ्यात; 'मातोश्री'वरील बैठकीआधीच नॉट रिचेबल
40 वर्षानंतर 'कोयना'चं पाणी आटलं; 1952 साली पाण्याखाली गेलेल्या गावाचे
Video | 40 वर्षानंतर 'कोयना'चं पाणी आटलं; 1952 साली पाण्याखाली गेलेलं गाव अवशेषांसह आलं वर; पहा व्हिडीओ
'गरिबांची धारावी का गिळताय? राऊतांचा सत्ताधारी पक्षाला थेट सवाल
Sanjay Raut On Dharavi | 'गरिबांची धारावी का गिळताय? राऊतांचा सत्ताधारी पक्षाला थेट सवाल
मोठी अपडेट! मनसे नेते संदीप देशपांडेंचं जैन मुनींना थेट आव्हान; आता
मोठी अपडेट! मनसे नेते संदीप देशपांडेंचं जैन मुनींना थेट आव्हान; आता मुंब्य्रात...
इकडे फडणवीसांचं आमदारांना प्रपोजल, तिकडे ठाकरेंच्या नगराध्यक्षा थेट...
इकडे फडणवीसांचं आमदारांना प्रपोजल, तिकडे ठाकरेंच्या नगराध्यक्षा थेट महाजनांच्या भेटीला; उद्धव ठाकरेंचं टेन्शन वाढलं?
आम्ही चिमटे नाही काढत थेट हल्ला करतो... भर मंचावर संजय राऊतांची सत्ताध
आम्ही चिमटे नाही काढत थेट हल्ला करतो... भर मंचावर संजय राऊतांची सत्ताधाऱ्यांवर बोरची टीका
ये डर अच्छा है! ऑपरेशन टायगरच्या चर्चेत वाघमारेंचा ठाकरे गटाला इशारा
ये डर अच्छा है! ऑपरेशन टायगरच्या चर्चेत ज्योती वाघमारेंचा ठाकरे गटाला थेट इशारा, संजय राऊतांवरही निशाणा
पाणी डोक्यावरून गेलंय... ठाकरे गटाची तातडीने बैठक अन् अंबादास दानवेंचं
पाणी डोक्यावरून गेलंय... ठाकरे गटाची तातडीने बैठक अन् अंबादास दानवेंचं विधान; राजकारणात मोठा भूकंप येणार?