Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मलायकासोबतच्या ब्रेकअपनंतर लव्ह ट्रँगलबद्दल अर्जुन कपूर स्पष्टच बोलला..

मलायका अरोरासोबतच्या ब्रेकअपनंतर अभिनेता अर्जुन कपूर नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत लव्ह ट्रँगलबद्दल मोकळेपणे व्यक्त झाला. यावेळी प्रेमाच्या त्रिकोणाबाबत त्याने स्पष्ट मत मांडलं. मलायका आणि अर्जुन यांचा काही महिन्यांपूर्वीच ब्रेकअप झाला.

मलायकासोबतच्या ब्रेकअपनंतर लव्ह ट्रँगलबद्दल अर्जुन कपूर स्पष्टच बोलला..
अर्जुन कपूर, मलायका अरोराImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Feb 19, 2025 | 2:20 PM

अभिनेता अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा यांचं काही महिन्यांपूर्वीच ब्रेकअप झालं. बॉलिवूडमधील ही लोकप्रिय जोड्यांपैकी एक होती. वयातील अंतरावरून या दोघांना खूप ट्रोल करण्यात आलं होतं. या ट्रोलिंगलाही न जुमानता दोघं एकमेकांवर खुलेपणाने प्रेमाचा वर्षाव करायचे. अर्जुन आणि मलायका यांचं ब्रेकअप कशामुळे झालं, यामागचं कारण स्पष्ट झालं नाही. दोघांनीही त्यावर प्रतिक्रिया दिली नाही. मात्र आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अर्जुन ‘लव्ह ट्रँगल’बद्दल मोकळेपणे व्यक्त झाला. आगामी ‘मेरे हसबंज की बिवी’ या चित्रपटाच्या प्रमोशननिमित्त अर्जुनने ही मुलाखत दिली होती. या चित्रपटात प्रेमातील त्रिकोणाबद्दलची (लव्ह ट्रँगल) कथा दाखवण्यात आली आहे.

या मुलाखतीत अर्जुन म्हणाला, “या परिस्थितीत त्या बिचाऱ्यासोबत जे घडलंय आणि त्याचा भूतकाळ परत येतो कारण तिचा स्मृतीभ्रंश होतो. खऱ्या आयुष्यात अशा परिस्थितीत अडकणं ही मजेशीर गोष्ट नाही. प्रामाणिकपणे बोलायचं झाल्यास, कोणीच अशा परिस्थितीमध्ये अडकू नये किंवा स्वत:ला अशा दुहेरी अडचणीत आणू नये. हे योग्य आहे असं मला वाटत नाही. मला खात्री आहे की काही लोकांच्या आयुष्यात अशी परिस्थिती येते, जिथे ते दोन लोकांमध्ये अडकतात. पण त्यात काही मजेशीर नसतं. एक ना एक जण दुखावला जातोच. नात्यात राहण्याचा हा काही चांगला मार्ग नाही.”

हे सुद्धा वाचा
View this post on Instagram

A post shared by Arjun Kapoor (@arjunkapoor)

कॉमेडियन हर्ष गुजरालसुद्धा या मुलाखतीत अर्जुन कपूरसोबत उपस्थित होता. चित्रपटातील भूमिकेविषयी बोलताना त्याने अर्जुन कपूर अजूनही सिंगल असल्याचा खुलासा केला. मलायकासोबत ब्रेकअप झाल्यानंतर अर्जुनच्या आयुष्यात दुसरी कोणती मुलगी आली नसल्याचं त्याने स्पष्ट केलंय. “माझ्याबाबतीत हे खरंय की माझ्या खऱ्या आयुष्यातही सिंगल आहे आणि अर्जुन भावाच्या खऱ्या आयुष्यातही तो सिंगल आहे. त्यामुळे आम्ही हे सर्व फक्त चित्रपटासाठी करतोय”, असं तो म्हणाला.

मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर यांनी जवळपास सहा वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर ब्रेकअप केला. अर्जुनने एका कार्यक्रमात सर्वांसमोर ‘मी आता सिंगल आहे’ असं म्हटलं होतं. त्यानंतर मलायकानेही अप्रत्यक्षपणे रिलेशनशिपमध्ये नसल्याचं स्पष्ट केलं होतं. ब्रेकअपनंतर जेव्हा मलायकाच्या वडिलांचं निधन झालं, तेव्हा अर्जुन तिचं सांत्वन करण्यासाठी पोहोचला होता. त्यानंतर नुकतीच त्याने मलायकाच्या शोमध्येही पाहुणा म्हणून हजेरी लावली होती.

वकील ओझा यांचे आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप, काय म्हणाले आदित्य ठाकरे?
वकील ओझा यांचे आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप, काय म्हणाले आदित्य ठाकरे?.
देवेंद्रजी, बात निकलेगी तो दूर तलक जायेगी; अंधारेंचं फडणवीसांना पत्र
देवेंद्रजी, बात निकलेगी तो दूर तलक जायेगी; अंधारेंचं फडणवीसांना पत्र.
मंत्री अदिती तटकरेंच्या जिल्ह्यात 15 हजार महिला अपात्र
मंत्री अदिती तटकरेंच्या जिल्ह्यात 15 हजार महिला अपात्र.
'हो, ते वक्तव्य बरोबर होतं, समजलं?', 'त्या' व्हिडिओवर अजितदादा संतापले
'हो, ते वक्तव्य बरोबर होतं, समजलं?', 'त्या' व्हिडिओवर अजितदादा संतापले.
कोरटकर प्रकरणावरून विरोधक सत्ताधारी भिडले
कोरटकर प्रकरणावरून विरोधक सत्ताधारी भिडले.
अजितदादांच्या 'त्या' व्हिडिओवर गुलाबराव पाटलांची मिश्किल टिपणी
अजितदादांच्या 'त्या' व्हिडिओवर गुलाबराव पाटलांची मिश्किल टिपणी.
'तसा एक नेपाळी महाराष्ट्रात फिरतोय', परबांची राणेंवर नाव न घेता टीका
'तसा एक नेपाळी महाराष्ट्रात फिरतोय', परबांची राणेंवर नाव न घेता टीका.
मराठी असल्याने डायमंड असोसिएशनने नाकारलं सभासदत्व
मराठी असल्याने डायमंड असोसिएशनने नाकारलं सभासदत्व.
माझ्या बाळाला फक्त..., शिंदेंनी मदतीचा हात पुढे करताच आईला अश्रू अनावर
माझ्या बाळाला फक्त..., शिंदेंनी मदतीचा हात पुढे करताच आईला अश्रू अनावर.
माझ्यावर कोणाचाही दबाव नाही; दिशाच्या वडिलांचं मोठं विधान
माझ्यावर कोणाचाही दबाव नाही; दिशाच्या वडिलांचं मोठं विधान.