AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

डोळ्यात अश्रू, हात जोडलेले… आशा भोसलेंच्या निधनावर मुलाची प्रतिक्रिया

आपल्या आवाजाने प्रत्येक मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या ज्येष्ठ गायिका, सुरांची मलिका आशा भोसले यांचे निधन झाले आहे. आज 12 एप्रिल रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे.

डोळ्यात अश्रू, हात जोडलेले... आशा भोसलेंच्या निधनावर मुलाची प्रतिक्रिया
आशा भोसलेImage Credit source: Tv9 Network
| Updated on: Apr 12, 2026 | 1:34 PM
Share

भारतीय संगीत जगतातील एक अजरामर आवाज आज शांत झाला. लता मंगेशकर यांची बहिण आणि देशातील सर्वात जास्त गाणी गाणाऱ्या दिग्गज गायिका आशा भोसले यांचे आज निधन झाले. वयाच्या 93व्या वर्षी आशा भोसले यांनी अखेरचा श्वास घेतला. ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांचे निधन झाले आहे. आशा भोसले यांच्या निधनानंतर संगीत क्षेत्रात एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे. आता, आशाताईंच्या निधनावर मुलगा आनंद भोसले यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

आशा भोसले यांना काल संध्याकाळी हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर उपचारासाठी तातडीने मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले. आशा भोसले यांची प्रकृती नाजूक असल्यामुळे अनेकजण त्या बऱ्या व्हाव्यात म्हणून प्रार्थना करत होते. मात्र, आज 12 एप्रिल रोजी त्यांचे निधन झाले आहे. त्यांच्या निधनाची माहिती मुलगा अनंत यांनी रुग्णालयाबाहेर येऊन दिली आहे. ‘मी आनंद भोसले माझी आई श्रीमती आशा भोसले यांचे आज निधन झाले आहे. उद्या सकाळी 11 ते 2, त्या जिथे राहात होत्या, लोअर परेल येथे त्यांना लोकांनी येऊन भेटावं, त्यांचं दर्शन घ्यावं यासाठी पार्थिव ठेवले जाणार आहे. दुपारी 4 वाजता शिवाजी पार्क येथे अंतिम संस्कार होणार आहेत’ असे आनंद भोसले यांनी सांगितले आहे.

निधनाचे काय आहे कारण?

ब्रीच कँडी रुग्णालयाच्या डॉक्टरांनी आशा भोसले यांच्या निधनाचं कारण सांगितलं. सर्व अवयव निकामी झाल्याने (मल्टी ऑर्गन फेल्युअरमुळे) त्यांचं निधन झाल्याचं डॉक्टरांनी स्पष्ट केलं. त्यांना मेडिकल प्रॉब्लेम होता, असंदेखील डॉक्टर म्हणाले. आशा भोसले यांना प्रचंड थकवा जाणवत असून छातीत संसर्ग झाला आहे. त्यांच्यावर उपचार सुरू असून त्या लवकर बऱ्या होतील असे आशा भोसले यांची नात झनाई भोसलेनं सांगितलं होतं. मात्र, उपचारादरम्यान आशा भोसले यांचे निधन झाले आहे.

आशिष शेलार यांनी व्यक्त दु:ख

आशिष शेलार यांनी आशा ताई यांना श्रद्धांजली वाहिली आहे. ते म्हणाले, आज संपूर्ण देश आणि महाराष्ट्र दु:खात बुडाला. एका युगाचा अंत झाला. आशाताई आपल्यातून निघून गेल्या. त्या असणं समाधानाची अनुभूती देत होतं. त्यांचं आयुष्य आणि प्रवास दु:खाला कवटाळून दुसऱ्याला सुख देण्याचा मार्ग होता. त्यांचं कर्तृत्व जगाला वेड लावणारं होतं. संगीत क्षेत्रातील कर्तृत्व जगाला देण आहे. आशाताई आपल्यात राहिल्या नाही. कुटुंबाने सांगितल्याप्रमाणे आज सर्व मेडिकल गोष्टी पूर्ण होईल. उद्या सकाळी ११ वाजता वाजल्यापासून लोअर परळला त्यांचं निवासस्थान आहे. ११ ते ३ पर्यंत पार्थिव दर्शनासाठी ठेवलं जाईल. ४ वाजता शिवाजी पार्कात अंतिम संस्कार होईल. सीएमशी बोलणं झालं. शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होईल.

Follow Us
आयटी कंपनीनंतर आता मुंबईच्या नामांकित बँकेत धर्मपरिवर्तन? पतीचा...
आयटी कंपनीनंतर आता मुंबईच्या नामांकित बँकेत धर्मपरिवर्तन? पतीचा....
शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी खूश खबर... अखेर कांदा प्रश्नावर तोडगा निघणार
शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी खूश खबर... अखेर कांदा प्रश्नावर तोडगा निघणार.
कोणाला सुगावा लागू नये म्हणून चक्क... कसून चौकशी केल्यानंतर तेजस शाह..
कोणाला सुगावा लागू नये म्हणून चक्क... कसून चौकशी केल्यानंतर तेजस शाह...
पंतप्रधान मोदींवर सपकाळांची जहरी टीका; पनोती वक्तव्याने महाराष्ट्रात..
पंतप्रधान मोदींवर सपकाळांची जहरी टीका; पनोती वक्तव्याने महाराष्ट्रात...
EDच्या कारवाईनंतर CPI(M) कार्यकर्ते आक्रमक; अधिकाऱ्यांच्या गाड्यांवर..
EDच्या कारवाईनंतर CPI(M) कार्यकर्ते आक्रमक; अधिकाऱ्यांच्या गाड्यांवर...
नीट पेपरफुटी प्रकरणी मोठी कारवाई, प्राध्यापक तेजस शाहच्या कॅबिनमध्ये..
नीट पेपरफुटी प्रकरणी मोठी कारवाई, प्राध्यापक तेजस शाहच्या कॅबिनमध्ये...
रवींद्र चव्हाणांची दिल्लीवारी; 48 नावांची यादी दिल्ली दरबारात!
रवींद्र चव्हाणांची दिल्लीवारी; 48 नावांची यादी दिल्ली दरबारात!.
मुंबईकरांचं रक्त विकण्याचा डाव; ठाकरे गटाच्या विरोधानंतर फेरविचार,
मुंबईकरांचं रक्त विकण्याचा डाव; ठाकरे गटाच्या विरोधानंतर फेरविचार,.
मोटेगावकरने ज्याच्यासाठी पेपर फोडला त्याच लेकाचा खळबळजनक गौप्यस्फोट;
मोटेगावकरने ज्याच्यासाठी पेपर फोडला त्याच लेकाचा खळबळजनक गौप्यस्फोट;.
मीरा रोडनंतर घाटकोपर पेटलं? किरीट सोमय्यांचा थेट इशारा, म्हणाले....
मीरा रोडनंतर घाटकोपर पेटलं? किरीट सोमय्यांचा थेट इशारा, म्हणाले.....