आराध्या बच्चन शाळेच्या डब्यात कोणते खास पदार्थ नेते? थेट या व्यक्तीने ठरवलाय मेन्यू..
ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांची मुलगी आराध्या बच्चन कायमच आई वडिलांसोबत स्पॉट होते. आराध्या बच्चन धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिक्षण घेते. अनेकदा तिच्या शाळेतील कार्यक्रमांचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात. आता आराध्या हिच्याबद्दल मोठी माहिती पुढे आलीये.

बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय कायमच चर्चेत असते. ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांनी 2007 मध्ये लग्न केले. विशेष म्हणजे हे लग्न त्यावेळीची सर्वाधिक चर्चेत असलेले लग्न होते. मात्र, काही दिवसांपूर्वी अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांच्या घटस्फोटाची जोरदार चर्चा रंगताना दिसली. मात्र, या घटस्फोटाच्या चर्चेत काहीच सत्य नसल्याचे स्वत: अभिषेक बच्चन याने सांगितले. ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांची लेक कायमच स्पॉट होताना दिसते. मात्र, ऐश्वर्या राय कधीच आपल्या लेकीचा हात अजिबात सोडत नाही. सोशल मीडियापासूनही ऐश्वर्या आणि अभिषेक यांची लेक दूर आहे. आराध्या बच्चन धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिक्षण घेते. फक्त आराध्याच नाही तर अनेक कलाकारांची मुले याच शाळेत शिक्षण घेतात. ही एक अत्यंत लग्झरी अशी मुंबईतील नाही तर देशातील शाळा आहे. इथे मुलांच्या प्रत्येक गोष्टीची काळजी घेतली जाते. मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचे नातूही याच शाळेत शिक्षण घेतात.
ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांची लेक सुरूवातीपासूनच बच्चन धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमध्ये आहे. मात्र, आराध्या बच्चन हिला शाळेत जाताना डबा घेऊन जाण्याची गरज नाही. या शाळेत मुलांच्या आरोग्यासोबतच त्यांच्या खाण्यापिण्याकडेही बारीक लक्ष दिले जाते. एखाद्या मोठ्या लग्झरी हॉटेलसारखे जेवण मुलांना दिले जाते.
ताजे, स्वच्छ आणि हेल्दी जेवण शाळेत येणाऱ्या प्रत्येक मुलाला दिले जाते. नाश्ता, जेवण सर्वकाही मुलांना शाळेतच मिळते. हेच नाही तर शाळेतील मेन्यू संजीव कपूर यांनी डिझाईन केला असून मुलांना अधिका अधिक पाैष्टीक जेवण कसे दिले जाईल, याकडे बारीक लक्ष दिले जाते. मुलांच्या खाण्यात अजिबातच जंक फूड दिले जाणार नाही, याची पूर्णपणे काळजी घेतली जाते.
मेन्यू ठरलेला असतो. ज्यामध्ये विविध प्रकारची फळेही दिली जातात. मुलांच्या दिवसाची सुरूवात चांगली व्हावी, याकरिता नाश्ता अधिक चांगला आणि हेल्दी कसा होईल, यावर भर दिला जातो. यासोबतच दुपारचे जेवणही अत्यंत खास असेत. पनीरची भाजी, हिरव्या भाज्या, सलाड, मल्टी पिठाच्या चपात्या आणि स्पेशल काही पदार्थही दुपारच्या जेवणात असतात.
