AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ranbir Alia: “आलियाने बाळासाठी तिच्या स्वप्नांचा त्याग करावा असं मला वाटत नाही”, रणबीरच्या उत्तराने जिंकली चाहत्यांची मनं

कपूर घराण्याबद्दल एक गोष्ट नेहमीच बोलली जाते की, मुलगी असो किंवा नायिका त्या कुटुंबाची सून बनली तर ती लग्नानंतर चित्रपटात काम करत नाही. लग्नानंतर करिश्मा आणि करीनाची आई बबिता यांनीही चित्रपटसृष्टी सोडली. तसंच रणबीरची आई नीतू कपूर (Neetu Kapoor) यांनीसुद्धा लग्नानंतर इंडस्ट्रीला रामराम केला.

Ranbir Alia: आलियाने बाळासाठी तिच्या स्वप्नांचा त्याग करावा असं मला वाटत नाही, रणबीरच्या उत्तराने जिंकली चाहत्यांची मनं
रणबीरच्या उत्तराने जिंकली चाहत्यांची मनं Image Credit source: Instagram
| Edited By: | Updated on: Jul 11, 2022 | 5:48 PM
Share

कपूर घराण्याबद्दल एक गोष्ट नेहमीच बोलली जाते की, मुलगी असो किंवा नायिका त्या कुटुंबाची सून बनली तर ती लग्नानंतर चित्रपटात काम करत नाही. लग्नानंतर करिश्मा आणि करीनाची आई बबिता यांनीही चित्रपटसृष्टी सोडली. तसंच रणबीरची आई नीतू कपूर (Neetu Kapoor) यांनीसुद्धा लग्नानंतर इंडस्ट्रीला रामराम केला. जेव्हा आलियाने रणबीर कपूरशी (Ranbir Kapoor) लग्न केलं आणि कपूर कुटुंबाची सून झाली, तेव्हा तिच्या करिअरबद्दलही अशाच प्रकारच्या चर्चा होत्या. आता आलिया (Alia Bhatt) लवकरच आई होणार आहे. कपूर कुटुंबात चिमुकला पाहुणा येणार याबद्दल रणबीरसुद्धा खूप खूश आहे. परंतु आलियाने आई झाल्यानंतर तिच्या स्वप्नांचा त्याग करावा अशी त्याची अजिबात इच्छा नाही. रणबीरने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत पालकत्वाविषयी सांगितलं. आयुष्याच्या या नव्या टप्प्यासाठी तो आणि आलिया भट्ट कशी तयारी करत आहेत हे त्याने सांगितलं.

‘मुलासाठी आलियाने स्वप्नांचा त्याग करावा असं मला वाटत नाही’

‘इंडियन एक्स्प्रेस’शी संवाद साधताना रणबीर म्हणाला, “आलिया ही फिल्म इंडस्ट्रीमध्ये खूप मोठी स्टार आहे आणि मूल झाल्यानंतर तिने तिच्या स्वप्नांचा त्याग करावा असं मला वाटत नाही. त्यामुळे आमच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यात समतोल साधता यावा यासाठी आम्हाला योग्य ती योजना करावी लागेल. हे सर्व टप्प्याटप्प्याने करावं लागेल. पण त्यासाठी मी खूप सकारात्मक आहे.”

‘माझे वडील व्यस्त असायचे, त्यांच्याकडे वेळ नसायचा, पण मी असं करणार नाही’

“आई-बाबा म्हणून जबाबदाऱ्या कशा सांभाळायच्या, कामाची वाटणी कशी करायची याबद्दल मी आणि आलिया बोलत असतो. माझा जन्म झाला तेव्हा माझे वडील कामात खूप व्यस्त असायचे. त्यांना माझ्यासाठी फार वेळ नव्हता. त्यामुळे मी नेहमी आईसोबतच असायचो. पण माझ्या मुलाशी माझं खूप वेगळं नातं असेल”, असं रणबीरने सांगितलं.

इन्स्टा फोटो-

रणबीर कपूरने एका ग्रुप इंटरव्ह्यूमध्ये सांगितलं की, ‘शमशेरा’च्या प्रमोशनदरम्यान त्याला वडील बनण्याबाबत प्रश्न विचारले जातील याची पूर्ण कल्पना होती. त्यामुळे त्याने आणि आलियाने आधीच मॉक इंटरव्ह्यूच्या माध्यमातून तयारी केली होती. रणबीर म्हणाला, “मी यासाठी आलियासोबत खूप रिहर्सल केली होती. आलिया मला प्रश्न विचारायची आणि मी त्याची उत्तरं द्यायचो. सर तुम्ही लवकरच बाबा होणार आहात, तुम्हाला कसं वाटतंय, यांसारखे प्रश्न ती विचारायची. पण हे फक्त शब्द आहेत. खरं तर कसं वाटतं हे शब्दांत मांडता येत नाही. मी खूप आनंदी आहे. मी उत्साही आणि त्यासोबत थोडाफार चिंतेतही आहे. त्याच वेळी मला भीतीदेखील वाटते. काय होत आहे, काय होणार आहे, हे खूप वेगाने होत आहे का, यासाठी आपण तयार आहोत का, मी माझ्या बाळाला नीट काळजी घेऊ शकेन का, असे असंख्य प्रश्न आहेत. मी यासाठी करण मल्होत्राकडून टिप्स घेत आहे. कारण तोसुद्धा नुकताच पिता बनला आहे.”

14 एप्रिल 2022 रोजी आलिया आणि रणबीर कपूरचं लग्न झालं. लग्नाच्या अडीच महिन्यांनंतर आलियाने गरोदरपणाची गोड बातमी दिली. आलिया आणि रणबीर गेल्या अनेक वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते. दोघंही आता ‘ब्रह्मास्त्र-पार्ट 1’ या चित्रपटात एकत्र दिसणार आहेत.

अजित पवार यांच्या विमानात बॉम्ब होता का?
अजित पवार यांच्या विमानात बॉम्ब होता का?.
एक स्वीकृत नगरसेवकपद मिळण्यासाठी मनसे आग्रही
एक स्वीकृत नगरसेवकपद मिळण्यासाठी मनसे आग्रही.
सुनेत्रा पवारांचा शपथविधी इतक्या लवकर का? शिवसेना नेत्यांचा सवाल
सुनेत्रा पवारांचा शपथविधी इतक्या लवकर का? शिवसेना नेत्यांचा सवाल.
महापौरपदाच्या निवडणुकीत भाजपला MIM चा पाठिंबा?
महापौरपदाच्या निवडणुकीत भाजपला MIM चा पाठिंबा?.
कोल्हापूरच्या महापौरपदी रुपाराणी निकम यांची निवड
कोल्हापूरच्या महापौरपदी रुपाराणी निकम यांची निवड.
भाजपचंच वर्चस्व... आठ महापालिकेत कोण बनलं महापौर? घ्या जाणून
भाजपचंच वर्चस्व... आठ महापालिकेत कोण बनलं महापौर? घ्या जाणून.
मोदींचा विद्यार्थ्यांना कानमंत्र, कोणत्या विषयाला किती वेळ द्यायचा?
मोदींचा विद्यार्थ्यांना कानमंत्र, कोणत्या विषयाला किती वेळ द्यायचा?.
मुंबईच्या राजकारणात उलथापालथ; शरद पवार गटाचा आवाज सत्ताधाऱ्यांमध्ये
मुंबईच्या राजकारणात उलथापालथ; शरद पवार गटाचा आवाज सत्ताधाऱ्यांमध्ये.
महत्वाच्या महामार्गावर 32 तास वाहतूक ठप्प; प्रशासन यंत्रणेवर सवाल
महत्वाच्या महामार्गावर 32 तास वाहतूक ठप्प; प्रशासन यंत्रणेवर सवाल.
सत्ता हातात आली की शिंगं फुटतात; राऊतांचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल
सत्ता हातात आली की शिंगं फुटतात; राऊतांचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल.