AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

छत्रपती संभाजी महाराजांनी औरंगजेबासाठी केलेली ‘ती’ भविष्यवाणी खरी ठरली तेव्हा…

छत्रपती संभाजी महाराजांनी औरंगजेबासाठी अशी कोणती भविष्यवाणी केलेली जी खरी ठरली? 'छावा' सिनेमामुळे छत्रपती संभाजी महाराज यांचं शौर्य जगासमोर आलं आहे. सध्या सर्वत्र 'छावा' सिनेमाची चर्चा रंगली आहे.

छत्रपती संभाजी महाराजांनी औरंगजेबासाठी केलेली 'ती' भविष्यवाणी खरी ठरली तेव्हा...
| Updated on: Mar 01, 2025 | 1:11 PM
Share

‘छावा’ सिनेमामुळे छत्रपती संभाजी महाराज यांचं शौर्य जगासमोर आलं आहे. सिनेमात औरंगजेबाची भूमिका अभिनेका अक्षय खन्नाने साकारली आहे. पण इतिहासात छत्रपती संभाजी महाराजांनी औरंगजेबासाठी भविष्यवाणी केली होती, जी अखेर खरी ठरली. आज जाणून घेवू ती भविष्यवाणी कोणती होती…छत्रपती संभाजी महाराजांनी सांगितलं होतं की, दख्खनवर राज्य करण्याची औरंगजेबाची जिद्द त्याच्या अपयशाचं कारण ठरेल. दख्खनचा ताबा मिळवण्यासाठी जेव्हा औरंगजेब औरंगाबाद येथे आला होता, तेव्हा महाराजांनी त्याच्या मुलीला पत्र लिहिलं होतं.

औरंगजेबाला परत बोलावून घ्या… असं छत्रपती संभाजी महाराज यांनी पत्रात लिहिलं होतं. ‘औरंगजेब जर त्याच्या जिद्दीवर अडून बसला तर, दिल्लीत पुन्हा परतू शकत नाही. त्याच्या हट्टीपणामुळे त्याची दख्खनमध्येच कबर खोदली जाऊ शकते.’ असं महाराजांनी पत्रात लिहिलं होतं.

महाराजांनी औरंगजेबासाठी केलेली भविष्यवाणी खरी ठरली. मुघल आणि मराठ्यांच्या युद्धात औरंगजेबचा पराभव झाला. त्यानंतर दिल्लीत परतत असताना त्याचा मृत्यू झाला. लेखक विश्वास पाटील यांच्या म्हणण्यानुसार, औरंगजेबाने दख्खनवर 4 लाख प्राणी आणि 5 लाख सौनिकांसोबत आक्रमण केलं होतं. पण छत्रपती संभाजी महाराजांनी एकही किल्ला त्याला जिंकू दिला नाही.

औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांवर 1689 मध्ये संगमेश्वर येते फितुरी करत त्यांना ताब्यात घेतलं. महाराजांसमोर औरंगजेबाने एक प्रस्ताव ठेवला होता. सर्व किल्ला औरंगजेबाला द्यायचे आणि इस्लाम धर्माचा स्वीकार करावा… पण महाराजांनी स्पष्ट नकार दिल्यानंतर शत्रूने महाराजांचे प्राण घेतले.

3 मार्च 1707 रोजी दख्खनहून दिल्लीला परतत असताना औरंगजेबाचा मृत्यू झाला. औरंगजेबाचा मृतदेह दिल्लीत नेण्यात आला नाही तर तो महाराष्ट्रातील औरंगाबाद जिल्ह्यात नेण्यात आला. औरंगजेबाला औरंगाबादच्या खुलदाबाद येथे शेख जैनुद्दीन साहिब, ज्यांना औरंगजेबाने गुरू मानलं, यांच्या दर्ग्याजवळ दफन करण्यात आलं.

सांगायचं झालं तर, ‘छावा’ सिनेमा प्रदर्शित झाल्यांमुळे इतिहासाबद्दल सर्वत्र चर्चा होत आहे. ‘छावा’ सिनेमात अभिनेता विकी कौशल यांने छत्रपती संभाजी महाराज यांची भूमिका साकारली आहे. तर अभिनेता अक्षय खन्ना यांने खलनायकाच्या भूमिकेला न्याय दिला आहे. अभिनेत्याने औरंगजेबाची भूमिका साकारली आहे. दोघांनी साकारलेल्या भूमिकेचं सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.

वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.