AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

14 वर्षांचा वनवास संपला.. वाद मिटवून गोविंदाच्या पत्नीची भाचा-सुनेला मिठी, कृष्णा अभिषेक- काश्मिरासोबत व्हिडीओ व्हायरल..

बॉलिवूडमध्ये अशी अनेक नाती आणि कुटुंबे आहेत, ज्यांच्यात वर्षानुवर्षे मतभेद आहेत. यापैकी सर्वाधिक चर्चित प्रकरण म्हणजे गोविंदा, त्याची पत्नी सुनीता आहुजा आणि त्यांचा भाचा कृष्णा अभिषेक यांच होतं. या कुटुंबात जवळपास 14 वर्षांपासून मतभेद होते आणि त्याबद्दल वारंवार बातम्या समोर यायच्या. पण अखेर या कुटुंबात सलोखा झाल्याचं दिसून येतंय.

14 वर्षांचा वनवास संपला..  वाद मिटवून गोविंदाच्या पत्नीची भाचा-सुनेला मिठी, कृष्णा अभिषेक- काश्मिरासोबत व्हिडीओ व्हायरल..
सुनिता अहुजा- कृष्णा अभिषेकImage Credit source: social media
| Updated on: Apr 16, 2026 | 11:57 AM
Share

बॉलिवूडमधील ‘हिरो नं.1’ नावाने ओळखला जाणारा अभिनेता गोविंदा, त्याची पत्नी सुनीता अहुजा आणि भाचा, अभिनेता कृष्णा अभिषेक यांच्यातील मतभेदांमुळे जवळपास 14 वर्ष कटुता दिसत होती. यादरम्यान बरीच नोकझोक झाली, कृष्णा अभिषेकची मामी, सुनिता अहुजा हिने बऱ्या तिखट प्रतिक्रिया दिल्या, काही झोंबणारी विधानंही केली. ज्यावरून कॉमेडियन कृष्णाने काही रिॲक्शन्सही दिल्या. मात्र त्यांच्यातील अनेक वर्षांचा हाँ वाद आता संपताना दिसत आहे. याच कारण म्हणजे सोशल मीडियावर नुकताच एक व्हिडीो व्हायरल झालेला दिसला, ज्यात इमोशनल फॅमिली री-युनिअन पाहायला मिळालं. या व्हिडीओत सुनिता अहुजा, कृष्णा अभिषेक आणि त्याची पत्नी काश्मिरा शाह ही देखील होती.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओची खूप चर्चा झाली. कृष्णा अभिषेक आणि सुनीता आहुजा समोरासमोर येताच भावूक होतात आणि एकमेकांना मिठी मारतात. हा क्षण तिथे उपस्थित असलेल्या लोकांसाठीही खूप खास ठरला. या भेटीनंतर गोविंदा आणि कृष्णा यांचे नाते पुन्हा पूर्वीसारखे होईल, अशी आशा चाहते व्यक्त करत आहेत.

14 वर्षांचा वनवास संपला

या व्हिडीोत सुनिताने म्हणलेलं वाक्यही खूपच चर्चेत आहे. गोविंदाची पत्नी, सुनीताने कृष्णाला पुन्हा मिठी मारली आणि म्हणाली, “14 वर्षांचा वनवास संपला.” आपल्या मामीचे हे शब्द ऐकून कृष्णासुद्धा भावूक झाला आणि म्हणाला, “हे आमच्यासाठी मोठं आश्चर्य होतं. त्या आज शोमध्ये सामील होतील याची आम्हाला दोघांना कल्पनाही नव्हती. होकार दिल्याबद्दल धन्यवाद. त्यामुळे, यासोबतच गेल्या 12 वर्षांपासून चर्चेत असलेल्या सर्व अफवांना आम्ही पूर्णविराम दिलाय.” असंही त्याने स्पष्ट केलं.

का सुरू झाला वाद, काय होतं कारण ?

अभिनेता गोविंदा आणि कृष्णा अभिषेक यांच्यात अनेक वर्षांपासून संवाद बंद होता, ते एकमेकांशी बोलत नव्हते. रिपोर्टनुसार, 2016 साली ‘द कपिल शर्मा शो’मध्ये कृष्णाने केलेल्या एका विनोदामुळे गोविंदा आणि सुनीता संतापले आणि तेव्हापासून त्यांच्यातील वाद सुरू झाला. त्यामुळे, यानंतर, जेव्हा जेव्हा गोविंदा आणि त्याची पत्नी सुनीता यांना कपिल शर्माच्या कॉमेडी शोमध्ये आमंत्रित केले जायचे, तेव्हा कॉमेडियन कृष्णा अभिषेक शोपासून दूर राहायचा. मात्र, अनेक प्रसंगी कृष्णा अभिषेकने, मामा-मामीसोबत आपलं नातं, संबंध सुधारण्याची इच्छा जाहीरपणे व्यक्त केली होती. सुनीता आहुजा यांनीही या वादावर अनेकदा उघडपणे भाष्य केलं होते. पण आता त्यांनी पुढे जाण्याचा निर्णय घेतल्याचं दिसत आहे.

बीते शिकवे खतम करो

नवीन वर्षाच्या सुरुवातीला, गोविंदाची पत्नी सुनीताने सांगितलं होतं की,गोविंदा आणि कृष्णा यांच्यात सर्व काही ठीक आहे. ती म्हणाली, “मी माझ्या मुलांवर किती काळ रागावू शकतं? जेव्हा प्रत्येकजण आपापल्या जागी आनंदी आहे, मग मी मनात कटुता का बाळगू? मला फक्त सर्व मुलांना आशीर्वाद द्यायचा आहे; ते माझ्या मुलांसारखेच आहेत.” असं ही त्या म्हणाल्या होत्या. एवढंच नव्हे दुसऱ्या एका मुलाखतीत त्या म्हणाल्या होत्य की, “कृष्णा माझ्यासोबत, विनय, डम्पी आणि माझ्या मेहुण्याच्या मुलासोबत वाढला. माझ्यासाठी ते सर्व माझीच मुलं आहेत. मी भूतकाळातील सगळं काही विसरले आहे. सर्व मुलांनी हसावं, खेळावं आणि आनंदी राहावं, आता मला एवढंच हवंय” असं म्हणत तिने त्यांना आशीर्वाद दिला होता.

Follow Us
महिला आरक्षण विधेयकाला पाठिंबा न देऊन विरोधकांनी... पंतप्रधान नेरेंद्र
महिला आरक्षण विधेयकाला पाठिंबा न देऊन विरोधकांनी... पंतप्रधान नेरेंद्र.
मोठी बातमी! नाशिकच्या धर्मांतरण प्रकरणात मोठी अपडेट, निदा खानच्या त्या
मोठी बातमी! नाशिकच्या धर्मांतरण प्रकरणात मोठी अपडेट, निदा खानच्या त्या.
खरातचा मृत्यू अपघातात किंवा आजरपणामुळे होऊ शकतो; रोहित पवारांचे मोठे व
खरातचा मृत्यू अपघातात किंवा आजरपणामुळे होऊ शकतो; रोहित पवारांचे मोठे व.
मुलींना कॅफेत घेऊन बासायचा अन् तिथेच... अमरावती लैंगिक शोषण प्रकरणातील
मुलींना कॅफेत घेऊन बासायचा अन् तिथेच... अमरावती लैंगिक शोषण प्रकरणातील.
TCS महिला लैंगिक शोषणातील महिला सूत्रधाराने गर्भवती असल्याचं दिलं खोटं
TCS महिला लैंगिक शोषणातील महिला सूत्रधाराने गर्भवती असल्याचं दिलं खोटं.
भाजपनं महिला आरक्षणाच्या नावाखाली एक भोंदू विधेयक आणलं; संजय राऊतांचे
भाजपनं महिला आरक्षणाच्या नावाखाली एक भोंदू विधेयक आणलं; संजय राऊतांचे.
खरात प्रकरणी दीपक लोंढेंची कसून चौकशी, 10 तासांच्या चौकशीत नेमकं काय घ
खरात प्रकरणी दीपक लोंढेंची कसून चौकशी, 10 तासांच्या चौकशीत नेमकं काय घ.
भाजपला धक्का, महिला आरक्षण आणि डिलिमिटेशन विधेयक संसदेत नामंजूर
भाजपला धक्का, महिला आरक्षण आणि डिलिमिटेशन विधेयक संसदेत नामंजूर.
मी ॲक्सिस बँकेत... नाशिकमधील धर्मांतरण प्रकरणावर अमृता फडणवीस स्पष्ट म
मी ॲक्सिस बँकेत... नाशिकमधील धर्मांतरण प्रकरणावर अमृता फडणवीस स्पष्ट म.
खरातच्या ट्रस्टचे उपाध्यक्ष जितेंद्र शेळकेंचा अपघाती मृत्यू, फॉरेन्सिक
खरातच्या ट्रस्टचे उपाध्यक्ष जितेंद्र शेळकेंचा अपघाती मृत्यू, फॉरेन्सिक.