AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

त्याच्यापेक्षाही उत्तम अभिनेता भेटला..; ‘दृश्यम 3’मध्ये अक्षय खन्नाच्या जागी ‘या’ कलाकाराची वर्णी

अजय देवगनच्या 'दृश्यम 3' या चित्रपटातून अक्षय खन्ना बाहेर पडल्यानंतर एका महत्त्वपूर्ण अभिनेत्याची एन्ट्री झाली आहे. खुद्द निर्माते कुमार मंगत यांनी याविषयीची माहिती दिली आहे. 'धुरंदर' या चित्रपटानंतर अक्षय खन्नाने 'दृश्यम 3'साठी अधिक मानधन मागितलं होतं. त्यामुळे निर्मात्यांसोबत त्याचे खटके उडाले.

त्याच्यापेक्षाही उत्तम अभिनेता भेटला..; 'दृश्यम 3'मध्ये अक्षय खन्नाच्या जागी 'या' कलाकाराची वर्णी
अक्षय खन्नाImage Credit source: Instagram
| Updated on: Dec 27, 2025 | 6:35 PM
Share

‘दृश्यम 1’ आणि ‘दृश्यम 2’ या दोन्ही चित्रपटांच्या यशानंतर आता ‘दृश्यम’च्या तिसऱ्या भागाची घोषणा नुकतीच झाली. हा चित्रपट 2 ऑक्टोबर 2026 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाची घोषणा होताच चाहत्यांनी प्रचंड उत्सुकता व्यक्त केली. परंतु त्याआधीच या चित्रपटातून अक्षय खन्नाच्या एक्झिटच्या बातम्यांमुळे चाहत्यांना धक्काही बसला. अक्षय खन्नाने ‘दृश्यम 3’साठी अधिक मानधन मागितल्यामुळे ऐनवेळी या चित्रपटातून त्याची एक्झिट झाल्याची चर्चा होती. आता त्याच्या जागी ‘दृश्यम 3’मध्ये ‘पाताल लोक’ फेम अभिनेता जयदीप अहलावत याची वर्णी लागली आहे. निर्माते कुमार मंगत यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

अजय देवगन, श्रिया सरन, तब्बू आणि इशिता दत्ता यांच्या भूमिका असलेल्या ‘दृश्यम 3’ची कथा आधीपेक्षा अधिक रंजक असल्याचं टीझरमध्ये सांगितलं गेलं. परंतु ठीक त्याच्या दुसऱ्याच दिवशी अशी चर्चा समोर आली की मानधनाच्या कारणास्तव अक्षय खन्नाने यातून माघार घेतली आहे. ‘दृश्यम 2’मध्ये अक्षय खन्नाने पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारली होती. आता ‘बॉलिवूड हंगामा’ या वेबसाइटशी बोलताना निर्माते कुमार मंगत यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे की जयदीप अहहलावतने ‘दृश्यम 3’मध्ये अक्षय खन्नाची जागा घेतली आहे.

“दृश्यम हा एक खूप मोठा ब्रँड आहे. या चित्रपटात अक्षय आहे किंवा नाही याने काही फरक पडत नाही. आता जयदीप अहलावतने त्याला रिप्लेस केलं आहे. देवाच्या कृपेने आम्हाला अक्षयपेक्षा अधिक चांगला अभिनेता भेटला आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे अक्षयपेक्षा उत्तम व्यक्ती आम्हाला भेटली आहे,” असं निर्मात्यांनी म्हटलं आहे. एका अर्थी या प्रतिक्रियेतून त्यांनी अक्षय खन्नाला टोमणाच मारला आहे.

शूटिंग सुरू होण्याच्या फक्त दहा दिवस आधी अक्षयने या चित्रपटातून काढता पाय घेतल्याने निर्माते, दिग्दर्शक त्याच्यावर प्रचंड नाराज झाल्याचा पाहायला मिळतंय. याविषयी निर्माते कुमार मंगत पुढे म्हणाले, “मी जयदीपच्या करिअरच्या सुरुवातीच्या चित्रपटांपैकी एक ‘आक्रोश’ची निर्मिती केली होती. मला अक्षय खन्नाच्या वागणुकीच्या कारणास्तव नुकसान झेलाव लागलं. मी त्याच्यावर कायदेशीर कारवाई करणार आहे. यासाठी मी त्याला कायदेशीर नोटीससुद्धा बजावली आहे. या नोटिशीला त्याने अद्याप कोणतंही उत्तर दिलेलं नाही.

मिळालेल्या माहितीनुसार जयदीप अहलावत जानेवारी 2026 पासून ‘दृश्यम 3’ या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात करणार आहे. या चित्रपटातील एका महत्त्वपूर्ण भूमिकेसाठी त्याची निवड करण्यात आली आहे. जयदीपच्या भूमिकेमुळे ‘दृश्यम 3’च्या कथेत अत्यंत रंजक वळण येणार असल्याचं कळतंय.

'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला.
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी.
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.