AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोदी सरकारमधील सर्वात तरुण कॅबिनेट मंत्री आहे ‘कंगनाचा हिरो…’, चर्चांना उधाण

Modi Government | नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा घेतली पंतप्रधानपदाची शपथ... मोदी सरकारमधील सर्वात तरुण कॅबिनेट मंत्री आहे 'कंगनाचा हिरो...', पण कोण? 'त्या' मंत्र्याचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर होत आहेत व्हायरल... सर्वत्र चर्चांना उधाण...

मोदी सरकारमधील सर्वात तरुण कॅबिनेट मंत्री आहे 'कंगनाचा हिरो...', चर्चांना उधाण
| Updated on: Jun 10, 2024 | 11:36 AM
Share

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी 9 जून 2024 रोजी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेत सरकार स्थापन केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शपथ घेतल्यानंतर मंत्रिमंडळात सामिल असलेल्या सर्व मंत्र्यांनी शपथ घेतली. नवं सरकार स्थापन होत असताना अनेक मंत्री कुर्ता-पायजमा अशा पारंपरिक पोशाखात शपथ घेण्यासाठी पोहोचले. पण एक मंत्री असे होते ज्यांनी काळ्या रंगाच्या कोट-पँटमध्ये आणि कपाळावर लांबलचक टिळक लावून शपथ घेण्यासाठी आले… ते शपथ घेण्यासाठी आले तेव्हा जमलेल्या सर्वांच्या नजरा त्यांच्याकडे येवून थांबल्या होत्या…

सध्या ज्या मंत्र्याची चर्चा रंगत आहे ते दुसरे तिसरे कोणी नाही तर, अभिनेत्री कंगना रनौत यांचे हिरो आहे. ते मोदी सरकारमधील सर्वात तरुण कॅबिनेट मंत्री आहेत. कॅबिनेट मंत्री चिराग पासवान आहेत. लोक जनशक्ती पक्षाचे प्रमुख आणि हाजीपूरचे लोकसभा खासदार चिराग पासवान हे मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील सर्वात तरुण कॅबिनेट मंत्री बनले आहेत.

दिसायला प्रचंड हँडसम चिराग पासवान जेव्हा शपथ घेण्यासाठी मंचावर पोहोचले, तेव्हा एखाद्या बॉलिवूड अभिनेत्या प्रमाणे दिसत होते. एक काळ असा होता जेव्हा चिराग पासवान यांनी अभिनय विश्वात देखील स्वतःचं नशीब आजमावलं होतं. ‘मिले ना मिले हम’ सिनेमात चिराग पासवान झळकले होते.

सिनेमात चिराग पासवान यांच्यासोबत अभिनेत्री कंगना रनौत यांनी भूमिका साकारली होती. 2011 मध्ये सिनेमा प्रदर्शित झाला होता. पण सिनेमा बॉक्स ऑफिसवर फेल ठरला. पण आता सिनेमातील अनेक सीन सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. सोशल मीडियावर सध्या फक्त आणि फक्त चिराग पासवान यांची चर्चा रंगली आहे.

सांगायचं झालं तर, सिनेमा फ्लॉप झाल्यानंतर देखील कंगना हिने मागे वळून पाहिलं नाही. पण चिराग पासवान यांनी मात्र राजकारणात प्रवेश केला आणि 3 वर्ष मेहनत केल्यानंतर 2014 मध्ये लोकसभा निवडणुकीत जमुई मतदार संघातून विजय मिळवला. त्यानंतर 2019 मध्ये चिराग पुन्हा एकदा जमुई जागेवरून खासदार म्हणून निवडून आले आणि आता 2024 मध्ये मोदी सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री बनले आहेत.

चिराग पासवान यांच्याबद्दल सांगायचं झालं तर, ते रामविलास पासवान यांचे पूत्र आहेत. यावेळी एलजेपीकडून 5 जणांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात आलं आणि चिराग यांनी पाचही जागा जिंकून पंतप्रधान मोदी यांना दिल्या. यामुळेच चिराग पासवान यांनी एनडीए सरकारमध्ये कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतली आहे.

मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र
मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र.
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?.
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला.
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी.
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्....
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्.....
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य.
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी.
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले...
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले....
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन.
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर..
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर...