AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबईत घडलेली ‘ती’ घटना कंगना रनौत यांच्या राजकारणात येण्याला ठरली कारणीभूत?

MP Kangana Ranaut : बीएमसीने कंगना रनौत यांच्या पाली हिल कार्यालयातील बेकायदेशीर बांधकामावर केलेली कारवाई... खासदार झाल्यानंतर कंगना यांनी सोडलं 'त्या' घटनेवर मौन... अभिनेत्रीने का केला आहे राजकारणात प्रवेश? चर्चांना सर्वत्र उधाण...

मुंबईत घडलेली 'ती' घटना कंगना रनौत यांच्या राजकारणात येण्याला ठरली कारणीभूत?
| Updated on: Jun 14, 2024 | 10:32 AM
Share

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत गेल्या काही दिवसांपासून प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत आहे. हिमाचल प्रदेशच्या मंडी मतदार संघातून निवडून आलेल्या कंगना यांच्याबद्दल अनेक चर्चा आता रंगत आहेत. राजकारणात प्रवेश करण्यापूर्वी कधीच राजकारणात प्रवेश करणार नाही… असं वक्तव्य खुद्द कंगना यांनी केलं होतं. आता नुकताच एका पॉडकास्टमध्ये कंगना यांनी राजकारणातील प्रवासाबद्दल सांगितलं. यावेळी मुंबईत त्यांच्यासोबत घडलेल्या घटनेचा देखील त्यांनी उल्लेख केला. शिवाय राजकारणात येण्याचं कारण देखील कंगना यांनी सांगितलं.

नुकताच झालेल्या एका मुलाखतीत कंगना यांनी 2020 मध्ये घडलेल्या घटनेचा देखील उल्लेख केला. 2020 मध्ये अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या निधनांनंतर सर्वत्र खळबळ माजली होती. 2020 मध्ये मुंबईत सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूची चौकशी सुरू असताना कंगना रनौत आणि शिवसेना यांच्यात तणाव निर्माण झाला होता.

त्याचवेळी कंगना यांच्या घराचा काही भाग बीएमसीने पाडला होता. घराचा तो भाग बेकायदेशीरपणे बांधण्यात आल्याचे बीएमसीने सांगितलं होतं. यावर कंगना म्हणाल्या, ‘आयुष्यात काहीही नवीन करण्याची माझी कल्पना कोणाबद्दलच्या कटुतेतून आलेली नाही.’

कंगना पुढे म्हणाल्या, ‘मी माझ्या वक्तव्यावर आजही ठाम आहे….’ कंगना म्हणाल्या होत्या, ‘अमिताभ बच्चन यांच्यानंतर कोणाला सर्वात जास्त सन्मान मिळत असेल तर, तो सन्मान मला मिळत आहे.’ सध्या सर्वत्र कंगना यांची चर्चा रंगली आहे.

‘2020 मध्ये घडलेली ती घटना मला अपमानित करणारी होती. मला असं वाटलं माझ्यासोबत हिंसा होत आहे. हिंसक पद्धतीने माझं घर तोडलं. त्यावेळी मला तो वैयक्तिक हल्ला वाटला. तेव्हा मला अनेक लोकांचा पाठिंबा मिळाल्याचे त्यांनी सांगितले. लोक म्हणाले मी साहसी आहे. देशाने मला साथ दिली…’ असं देखील कंगना म्हणाल्या…

कंगना यांच्याबद्दल सांगायचं झालं तर, बॉलिवूडमध्ये स्वतःची भक्कम ओळख निर्माण केल्यानंतर अभिनेत्रीने मोर्चा राजकारणाकडे वळवळा. कंगना यांनी पहिल्यांदा निवडणूक लढवली आहे विजयी झाल्या. मंडीच्या खासदार कंगना रनौत यांच्या नवीन प्रवासाची सुरुवात झाली आहे.

कंगना कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. वादाचा मुकूट कायम आपल्या डोक्यावर मिरवणाऱ्या कंगना आता राजकारणात उतरल्या आहेत. सोशल मीडियावर देखील त्यांचे अनेक व्हिडीओ आणि फोटो व्हायरल होत आहेत. सोशल मीडियावर कंगना यांच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.

शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.