AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“मुस्लिमांचं लक्ष सानिया मिर्झाचा स्कर्ट, हिजाबवर..”; नसीरुद्दीन शाह यांचं परखड मत

अभिनेते नसीरुद्दीन शाह हे विविध मुद्द्यांवर बेधडकपणे त्यांची मतं मांडतात. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत ते मुस्लिमांबद्दल आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल व्यक्त झाले. मुस्लिमांचं लक्ष नेहमीच चुकीच्या गोष्टींवर असल्याचं ते म्हणाले.

मुस्लिमांचं लक्ष सानिया मिर्झाचा स्कर्ट, हिजाबवर..; नसीरुद्दीन शाह यांचं परखड मत
नसीरुद्दीन शाहImage Credit source: Instagram
| Updated on: Jun 13, 2024 | 8:39 AM
Share

ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शाह हे त्यांच्या बेधडक वक्तव्यांसाठी ओळखले जातात. सामाजिक आणि राजकीय मुद्द्यांवर ते मोकळेपणे व्यक्त होतात. मात्र यामुळे अनेकदा त्यांना ट्रोलिंगलाही सामोरं जावं लागतं. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत ते नरेंद्र मोदी यांच्या तिसऱ्यांदा पंतप्रधान होण्यावर व्यक्त झाले. नसीरुद्दीन म्हणाले की नरेंद्र मोदी असे पहिले नेते नाहीत जे मुस्लिमांविरोधात बोलत असतील. हे आधीपासूनच चालत आलं आहे. तर दुसरीकडे त्यांनी मुस्लिमांच्याही काही चुका बोलून दाखवल्या. “मुस्लिमांचं लक्ष नेहमी चुकीच्या गोष्टींवर असतं. ते शिक्षणाऐवजी सानिया मिर्झाच्या स्कर्टच्या लांबीकडे अधिक लक्ष देतात. चूक मुस्लिमांची आहे आणि त्यांनी आता डोळे उघडले पाहिजेत”, असं परखड मत त्यांनी मांडलं. या मुलाखतीत ते लोकसभा निवडणुकांचा निकाल आणि हिंदू-मुस्लिम राजकारणावरही बोलले.

मोदींबद्दल काय म्हणाले?

‘द वायर’ला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले, “आपण सर्वांनी हा विचार करायला हवा की गोष्टी कशा ठीक होऊ शकतात. आपल्या सर्वांसाठी मोदींना विरोध करणं खूप सोपं आहे. देशात जे काही चुकीचं घडतंय, त्यासाठी मोदींना दोष देणं सोपं आहे. पण सत्य हे आहे की मोदी सत्तेत येण्याच्या आधीपासूनच देशात बरंच काही वाईट घडतंय. मोदींनी फक्त त्या चुकीच्या गोष्टींना स्पर्श केला, ज्या खूप आधीपासूनच दडलेल्या होत्या. मला आठवतंय की लहानपणी मला मुस्लीम असल्याने टोमणा मारला जायचा. त्यावेळी मीसुद्धा दुसऱ्या धर्मावर टिप्पणी करायचो. माझ्या मते या गोष्टी खूप आधीपासूनच आहेत. मोदी खूप चलाख आहेत की त्यांनी या गोष्टींना पुन्हा छेडलं.”

मुस्लिमांबद्दल काय म्हणाले नसीरुद्दीन?

या मुलाखतीत त्यांनी मुस्लिमांच्या चुका सांगितल्या. “सत्य हेच आहे की मुस्लीमसुद्धा पवित्र-स्वच्छ नाहीत. मुस्लिमांनी नेहमीच चुकीच्या गोष्टींकडे लक्ष दिलं. त्यांनी हिजाब, सानिया मिर्झाच्या स्कर्टची लांबी या गोष्टींवर लक्ष केंद्रीत केलं. खरंतर त्यांनी शिक्षण आणि आपल्या समुदायाचं ज्ञान कसं वाढवता येईल, याकडे लक्ष द्यायला हवं होतं. जेव्हा मॉडर्न गोष्टी शिकवायच्या होत्या, तेव्हा मदरसांमध्ये ढकलण्याचं काम केलं. आता पुरे झालं, मुस्लिमांनी आता तरी डोळे उघडायला हवेत”, अशी भूमिका त्यांनी मांडली.

मुस्लिमविरोधी टिप्पण्यांवर नसीरुद्दीन पुढे म्हणाले, “असं करणारे ते काही पहिले नेते नाहीत. ते फक्त मोक्याच्या क्षणी आले. मुस्लीम लीगच्या उत्तरात हिंदू महासभा 1915 साली बनली होती. दोन बंगाली लोकांनी, मला त्यांची नावं आठवत नाहीत, पण त्यांनी 2 नेशन थिअरीबद्दल बोलण्यास सुरुवात केली होती. मोदी हे एका परंपरेवर चालत आहेत, जी बऱ्याच नेत्यांनी याआधी सुरू केली होती. योगी आदित्यनाथ आजसुद्धा म्हणतात की हिंदू-मुस्लीम एकत्र राहू शकत नाही.”

Follow Us
अगामी सुनावणी मंगळवारी, पण... कोर्टाबाहेर येताच संजय राऊत नेमकं काय...
अगामी सुनावणी मंगळवारी, पण... कोर्टाबाहेर येताच संजय राऊत नेमकं काय म्हणाले?
शिवसेनेच्या सुनावणीत मोठा ट्विस्ट! हायकोर्टही पक्षाची नोंदणी रद्दचे...
शिवसेनेच्या सुनावणीत मोठा ट्विस्ट! हायकोर्टही पक्षाची नोंदणी रद्दचे आदेश आयोगाला देऊ शकत नाही, मग...
अपात्र होणाऱ्या... एकनाथ शिंदेंच्या अडचणी वाढल्या? कपिल सिब्बल...
अपात्र होणाऱ्या... एकनाथ शिंदेंच्या अडचणी वाढल्या? कपिल सिब्बल यांनी नेमका युक्तिवाद काय लढवला?
मोठी बातमी! निकाल कोणाच्या बाजून झुकतोय? सिब्बल यांचा नेमक्या...
मोठी बातमी! निकाल कोणाच्या बाजूने झुकतोय? सिब्बल यांचा नेमक्या मुद्यावर युक्तिवाद, कोर्टाचं निदर्शन काय?
कपिल सिब्बल यांचा निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान
शिवसेना पक्षचिन्ह प्रकरण: कपिल सिब्बल यांचा निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान
पेगलवाडी रस्त्याची पाहणी. विद्यार्थ्यांशी साधला संवाद.
आदित्य ठाकरे यांच्याकडून त्र्यंबकेश्वरमधील पेगलवाडी रस्त्याची पाहणी. विद्यार्थ्यांशी साधला संवाद.
कोर्टातील निकालाच मोठा परिणाम हा... शिंदेंच्या गट नेत्याचं मोठं विधान
कोर्टातील निकालाच मोठा परिणाम हा... एकीकडे कोर्टात सुनावणी सुरू दुसरीकडे शिंदेंच्या गट नेत्याचं मोठं विधान
विरोधकांच्या गोंधळामुळे संसदेचं 61% कामकाज ठप्प
विनोद तावडे: विरोधकांच्या गोंधळामुळे संसदेचं 61% कामकाज ठप्प
कंगना राणावत यांची टीका: गृह मंत्रालयाबाबत दुहेरी भूमिका
राहुल गांधींच्या भूमिकेवर कंगना राणावत यांची टीका: गृह मंत्रालयाबाबत दुहेरी भूमिका
रायगडचा पालकमंत्री मीच, लवकरच निर्णय
भरत गोगावले यांची घोषणा: रायगडचा पालकमंत्री मीच, लवकरच निर्णय