AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वस्तू तुटण्याचे आवाज,रात्रभर पायऱ्यांवर बसून राहयचो; रणबीरवर झालाय कौटुंबिक वादाचा वाईट परिणाम

नीतू कपूर आणि ऋषी कपूर यांचे नाते कसे होते आणि त्याचा रणबीरच्या आयुष्यावर कसा परिणाम झाला हे त्याने एका मुलाखतीत सांगितलं आहे. एवढंच नाही तर त्यांची सतत भांडणं व्हायची याचा त्यांच्या आयुष्यावर कसा परिणाम व्हायचा हे देखील रणबीरने सांगितलं,

वस्तू तुटण्याचे आवाज,रात्रभर पायऱ्यांवर बसून राहयचो; रणबीरवर झालाय कौटुंबिक वादाचा वाईट परिणाम
Ranbir Kapoor Reveals Parents Fights Image Credit source: Instagram
| Updated on: Aug 09, 2025 | 1:38 PM
Share

रणबीर कपूर हा बॉलिवूडमधील टॉप अभिनेत्यांपैकी एक आहे. तो कपूर कुटुंबाचा लाडका आहे. त्याच्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती एक उत्तम अभिनेता- अभिनेत्री आहेत. रणबीर कपूरचे पालक ऋषी कपूर आणि नीतू कपूर हे बॉलिवूडमधील आवडत्या जोडप्यांपैकी एक. दोघांनीही अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले.रणबीर कपूर त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे देखील बऱ्याचदा चर्चेत असतो.एका मुलाखतीमध्ये त्याने त्याच्या आई-वडिलांच्या नात्याबद्दलचा खुलासा केला होता. नीतू कपूर आणि ऋषी कपूर यांचे नाते कसे होते आणि त्याचा रणबीरच्या आयुष्यावर कसा परिणाम झाला हे देखील त्याने सांगितलं.

ते रात्रभर भांडत असत…

खरंतर नीतू कपूर आणि ऋषी कपूर यांना चित्रपटाच्या सेटवर प्रेम झाले, त्यानंतर दोघांनीही लग्न केले. मात्र लग्नानंतर ऋषी कपूर आणि नीतू कपूरच्या आयुष्यात समस्या येऊ लागल्या. दोघेही खूप भांडायचे. रणबीर कपूरने स्वतः याबद्दल खुलासा केला होता. रणबीर कपूरने स्वतः त्याचे आईवडील ऋषी कपूर आणि नीतू कपूर यांच्यातील भांडण पाहिले आहे. ते रात्रभर भांडत असत आणि वस्तू तुटण्याचे आवाज येत असत. रणबीरही त्याच्या आईवडीलांमधील भांडणामुळे खूप अस्वस्थ व्हायचा. त्याचे लहानपण नेहमीच अशी भांडणं पाहण्यात गेल्याचं त्याने एका मुलाखतीत सांगितलं.

मी तेव्हा 4-4 तास पायऱ्यांवर बसून….

रणबीर कपूर म्हणाला होता- ‘मी माझ्या पालकांसोबत राहत होतो. मी त्यांना एका वेगळ्याच टप्प्यातून जाताना पाहत होतो. मीही त्या टप्प्याचा एक भाग होतो. मी त्यांच्यासोबत एका बंगल्यात राहत होतो. ते तळमजल्यावर राहत होते आणि मी वरच्या मजल्यावर राहत होतो. मला आठवते की रात्री 1 ते पहाटे 5 वाजेपर्यंत त्यांचे भांडण चाललेलं. अशी भांडणं रात्रभर नेहमीच व्हायची. मी तेव्हा 4-4 तास पायऱ्यांवर बसून त्यांचे भांडण ऐकत असायचो. मला अनेक वस्तू तुटल्याचा आवाजही ऐकू यायचा. मी खूप अस्वस्थ व्हायचो’

शाळेत जायची देखील लाज वाटायची

रणबीर पुढे म्हणाला की त्याच्या पालकांच्या भांडणाच्या बातम्या बातम्यांमध्ये प्रसिद्ध होत असत. त्यामुळे त्याला शाळेत जायची देखील लाज वाटायची. मात्र काही काळाने त्याच्या पालकांमध्ये सर्व काही ठीक झाले आणि ते एकमेकांचे चांगले मित्र बनले.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.