AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कानाखाली मारल्याने भाषेला..; मराठी-हिंदी वादावर रेणुका शहाणे स्पष्टच म्हणाल्या

राज्यातील मराठी-हिंदी भाषेवरून सुरू असलेल्या वादावर अभिनेत्री रेणुका शहाणे यांनी पहिल्यांदा प्रतिक्रिया दिली आहे. महाराष्ट्रात राहायचं असेल तर मराठी बोललंच पाहिजे, अशी भूमिका मनसेनं मांडली आहे. भाषेबद्दल रेणुका यांनी आपलं स्पष्ट मत मांडलं आहे.

कानाखाली मारल्याने भाषेला..; मराठी-हिंदी वादावर रेणुका शहाणे स्पष्टच म्हणाल्या
Renuka ShahaneImage Credit source: Instagram
| Updated on: Jul 18, 2025 | 9:19 AM
Share

महाराष्ट्रात सुरू असलेल्या भाषिक वादावर अभिनेत्री रेणुका शहाणे यांनी मौन सोडलं आहे. भाषिक अभिमानाच्या नावाखाली कोणत्याही प्रकारच्या आक्रमकतेला किंवा हिंसेला त्यांनी ठामपणे विरोध केला आहे. त्याचसोबत स्थानिक भाषा आणि संस्कृतींचा आदर करण्याचं त्यांनी आवाहन केलं आहे. राज्यात गेल्या काही दिवसांपासून मराठी आणि हिंदी भाषेवरून मोठा वाद सुरू असून त्याला राजकीय वळण मिळालं आहे. भाषेवरून निर्माण झालेल्या वादावरून रेणुका शहाणे यांनी आपले विचार मोकळेपणे मांडले आहेत.

भाषिक वादावर रेणुका शहाणेंची प्रतिक्रिया

‘इनकंट्रोव्हर्शियल विथ पूजा चौधरी’ पॉडकास्टमध्ये रेणुका म्हणाल्या, “जर तुम्ही बऱ्याच काळापासून एखाद्या ठिकाणी राहत असाल, तर स्थानिक भाषा, संस्कृती समजून घेणं आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे त्याविषयी आदर बाळगणं ही चांगली गोष्ट आहे. ती भाषा बोलता येण्याचा मुद्दा नाही, पण ती शिकून घेण्याची इच्छा आणि त्याचा आदर करणं महत्त्वाचं आहे. मला असे लोक आवडत नाहीत, ज्यांना स्थानिक भाषा आणि स्थानिक संस्कृतीला सामावून घेण्याची आवश्यकता वाटत नाही.”

भाषेवरून हिंसाचार नको- रेणुका शहाणे

दुसरीकडे मीरा रोडमध्ये मराठी बोलण्यावरून एका रेस्टॉरंटच्या मालकाला मनसेच्या कार्यकर्त्यांनी मारलं होतं. यावर प्रतिक्रिया देताना त्या पुढे म्हणाल्या, “मला हिंसाचार अजिबात आवडत नाही. लोकांचं असभ्य वागणं मला आवडत नाही. जिथे मराठी बोलली जात नाही, अशा ठिकाणी जाऊन दोन-तीन लोकांच्या कानाखाली मारल्याने त्याचा भाषेला काहीही फायदा होणार नाही. आपल्याला ती भाषा लोकांपर्यंत अशा प्रकारे पोहोचवण्याचे मार्ग शोधावे लागतील, की लोकांना ती सोयीची वाटेल आणि ते आनंदाने त्याचा स्वीकार करतील. भाषा ही काही बळजबरीने लादण्याची गोष्ट नाही. म्हणूनच मी महाराष्ट्रात अगदी लहानपणापासूनच हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात होते. मला वाटतं की ती एक निवड असावी, जी मीसुद्धा लहानपणी केली होती.”

आशुतोष राणा काय म्हणाले?

रेणुका शहाणे यांचे पती आणि अभिनेते आशुतोष राणा यांनीसुद्धा नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत भाषेच्या वादावर प्रतिक्रिया दिली होती. “माझ्या मुलांची मातृभाषा मराठी आहे आणि माझ्या बायकोची मातृभाषा मराठी आहे”, असं त्यांनी आधी मराठीत उत्तर दिलं. त्यानंतर ते पुढे म्हणाले, “मी असं मानतो की भाषा ही नेहमीच संवादाचा विषय असते. ती कधीच वादाचा विषय नसते. भारत हा इतका परिपक्व आणि अद्भुत देश आहे, जिथे सर्व गोष्टी स्वीकारल्या जातात. भारताचा विश्वास संवादावर आहे, वादावर नाही.”

INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.