AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

SS Rajamouli: 16 वर्षांनंतर राजामौलींनी स्वीकारली ‘ती’ चूक; हृतिकबद्दलच्या ‘त्या’ वक्तव्यावर दिलं स्पष्टीकरण

विशेष म्हणजे राजामौलींनी त्यांची चूक स्वीकारत शब्दांची निवड चुकल्याचं म्हटलं आहे. त्यांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

SS Rajamouli: 16 वर्षांनंतर राजामौलींनी स्वीकारली 'ती' चूक; हृतिकबद्दलच्या 'त्या' वक्तव्यावर दिलं स्पष्टीकरण
SS Rajamouli: हृतिकबद्दलच्या 'त्या' वक्तव्यानंतर अखेर राजामौलींना द्यावं लागलं स्पष्टीकरणImage Credit source: Instagram
| Updated on: Jan 16, 2023 | 8:59 AM
Share

मुंबई: ‘बाहुबली’, ‘RRR’ यांसारख्या चित्रपटांचे दिग्दर्शक एस. एस. राजामौली हे त्यांच्या एका जुन्या वक्तव्यामुळे चर्चेत आले होते. बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन आणि दाक्षिणात्य अभिनेता प्रभास यांची एकमेकांशी तुलना केल्याने राजामौलींना ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता. “प्रभाससमोर हृतिक काहीच नाही” असं ते म्हणाले होते. आता याच वक्तव्यावर त्यांना स्पष्टीकरण द्यावं लागलं आहे. विशेष म्हणजे राजामौलींनी त्यांची चूक स्वीकारत शब्दांची निवड चुकल्याचं म्हटलं आहे. त्यांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

“मी खूप म्हणजे खूप आधी ते म्हटलं होतं. मला वाटतं जवळपास 15-16 वर्षांपूर्वी मी ते वक्तव्य केलं होतं. पण होय, माझ्या शब्दांची निवड चुकली होती, हे मी स्वीकारलं पाहिजे. त्याला कमी लेखण्याचा माझा हेतू कधीच नव्हता. मी त्याचा खूप आदर करतो आणि त्या घटनेला आता बरीच वर्षे झाली आहेत”, असं ते म्हणाले.

राजामौली नेमकं काय म्हणाले होते?

“दोन वर्षांपूर्वी जेव्हा धूम 2 प्रदर्शित झाला होता, तेव्हा मला वाटायचं की फक्त बॉलिवूडच असे चित्रपट का बनवू शकते? आपल्याकडे हृतिक रोशनसारखे हिरो नाहीत का? पण आता मी ‘बिल्ला’ या चित्रपटातील गाणं, पोस्टर आणि त्याचा ट्रेलर पाहिला. त्यानंतर मी फक्त इतकंच म्हणू शकतो की प्रभाससमोर हृतिक रोशन काहीच नाही. दिग्दर्शक मेहेर रमेश मी यांचे आभार मानतो, कारण त्यांनी तेलुगू चित्रपटाला हॉलिवूडच्या पातळीवर नेलं आहे”, असं ते म्हणाले होते.

राजामौली यांच्या ‘बाहुबली: द बिगनिंग’ आणि ‘बाहुबली: द कन्क्लुजन’ या ब्लॉकबस्टर चित्रपटांमध्ये प्रभासने मुख्य भूमिका साकारल्या आहेत. या दोन्ही चित्रपटांनी जगभरात दमदार कमाई केली होती. सध्या राजामौली हे त्यांच्या RRR या चित्रपटामुळे चर्चेत आहेत. या चित्रपटातील ‘नाटू नाटू’ या गाण्याला प्रतिष्ठित गोल्डन ग्लोब पुरस्कार मिळाला आहे.

Follow Us
गणेशोत्सवात मुंबईत आंदोलन करणं म्हणजे... फडणवीसांचं मराठा आंदोनलनाबाबत
गणेशोत्सवात मुंबईत आंदोलन करणं म्हणजे... देवेंद्र फडणवीस यांचे मराठा आरक्षणावर मोठे विधान
राज्यातले सर्वात श्रीमंत आमदार पराग शहा एका दिवसासाठी बनले भिकारी
Parag Shah | गुरूंच्या आदेशाने राज्यातले सर्वात श्रीमंत आमदार पराग शहा एका दिवसासाठी बनले भिकारी
पुणेकारांनी कमालच केली! 21 हजार पाणीपुरीपासून साकारली 13 फुटांची सुबक
पुणेकारांनी कमालच केली! 21 हजार पाणीपुरीपासून साकारली 13 फुटांची सुबक गणेश मूर्ती
मराठमोळ्या अभिनेत्याच्या घरी सुरेख डेकोरेशन; सामाजिक संदेश देत केलं बा
मराठमोळ्या अभिनेत्याच्या घरी सुरेख डेकोरेशन; सामाजिक संदेश देत केलं बाप्पांचं स्वागत
विनयभंगाच्या तक्रार प्रकरणी शिंदे गटातील आमदार संजय गायकवाडांची मोठी..
विनयभंगाच्या तक्रार प्रकरणी शिंदे गटातील आमदार संजय गायकवाडांची मोठी प्रतिक्रिया; थेट म्हणाले...
देवेंद्र फडणवीस यांचा राजभाषा दिनी मातृभाषा, भारतीय भाषांच्या गौरव...
देवेंद्र फडणवीस यांचा राजभाषा दिनी मातृभाषा आणि भारतीय भाषांच्या गौरवाचा संदेश
अमित शहा, फडणवीस, शिंदे अन् सुनेत्रा पवार एकाच मंचावर; राजभाषा...
अमित शहा, फडणवीस, शिंदे अन् सुनेत्रा पवार एकाच मंचावर; वाशीत राजभाषा संमेलनाचा थाट!
अखेर दिशा सालियन मृत्यू प्रकरणात CBI FIR दाखल; संशयितांच्या यादीत...
अखेर दिशा सालियन मृत्यू प्रकरणात CBI FIR दाखल; संशयितांच्या यादीत मोठी नावे
परत येईन की नाही, माहीत नाही; मी... मनोज जरांगे अचानक असं का म्हणाले?
परत येईन की नाही, माहीत नाही; मी... मनोज जरांगे अचानक असं का म्हणाले?
Ganeshotsav 2026 : नाशिकमध्ये 27 हजार रुपये किलोचा गोल्डन मोदक चर्चेत,
Ganeshotsav 2026 : नाशिकमध्ये 27 हजार रुपये किलोचा गोल्डन मोदक चर्चेत, खास काय?