AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Bigg Boss Marathi 3 |लोकांची गर्दी, फटाक्यांची आतषबाजी! ‘बिग बॉस मराठी 3’ची ट्रॉफी घेऊन विशाल घरी परतला  

यंदाच्या बिग बॉस मराठी 3' (Bigg Boss Marathi 3) या पर्वाचा विजेता मुळचा सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील देवीखिंडी गावचा असलेला विशाल निकम (Vishal nikam) ठरला आहे. त्याच्या या विजयाने गावात जल्लोष केला जात आहे.

Bigg Boss Marathi 3 |लोकांची गर्दी, फटाक्यांची आतषबाजी! ‘बिग बॉस मराठी 3’ची ट्रॉफी घेऊन विशाल घरी परतला  
Vishal Nikam
| Edited By: | Updated on: Dec 27, 2021 | 4:30 PM
Share

मुंबई : यंदाच्या बिग बॉस मराठी 3′ (Bigg Boss Marathi 3) या पर्वाचा विजेता मुळचा सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील देवीखिंडी गावचा असलेला विशाल निकम (Vishal nikam) ठरला आहे. त्याच्या या विजयाने गावात जल्लोष केला जात आहे. विशालला ‘बिग बॉस मराठी’च्या ट्रॉफीसोबतच 20 लाख रुपयांचा धनादेशही निर्मात्यांनी दिला. या विजयाबद्दल विशालने देवाचे आभार मानले. याचबरोबर तो म्हणाला की, ‘बिग बॉस’मध्ये सामील झालेल्या सर्व स्पर्धकांचे देखील मला आभार मानायचे आहेत, कारण आज जो विशाल निकम उभा आहे तो केवळ त्यांच्यामुळेच!

स्प्लिट्सव्हिलाचा विजेता जय दुधाणे आणि विशाल यांच्यात शेवटचा सामना झाला होता. मात्र जनतेच्या अधिक मतांमुळे विशालने जयला हरवत या हंगामाचे विजेतेपद पटकावले. शोच्या पहिल्या एपिसोडपासून विशालने नेहमीच आपला खेळ सचोटीने खेळला आहे. मित्रासोबत असो की शत्रूसोबत, विशालने नेहमीच ‘न्याय्य’ पद्धतीने गेम खेळण्याचा प्रयत्न केला आणि त्याचा हाच प्रामाणिक प्रयत्न सर्वांनाच आवडला.

कोण आहे विशाल निकम?

विशालच्या करिअरची सुरुवात ‘मिथुन’ या चित्रपटातुन झाली. या चित्रपटात विशालने मुख्य भूमिका साकारली होती. त्यानंतर विशालने ‘धुमस’ या मराठी चित्रपटात काम केलं. पण चित्रपटापेक्षा मालिकाच्या माध्यमातून विशाल प्रसिद्धीच्या झोतात आला. विशालने ‘सात जलमाच्या गाठी’ या मालिकेतून मनोरंजन विश्वात पाऊल ठेवले आहे. तसेच विशालने ‘दक्खनचा राजा जोतिबा’, ‘जय भवानी जय शिवाजी’ या सारख्या मालिकांमध्ये काम केले आहे. त्याच्या घरासमोर रात्री फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. आणि त्याला भेटण्यासाठी लोकांची गर्दी होत आहे. विशाल याने आपल्या महाराष्ट्र राज्यातील सर्वांची मन जिंकली आहेत.

माझं स्वप्न पूर्ण झालं!

या विजयाविषयी बोलताना विशाल म्हणाला की, आता खूप भारी वाटतंय. हे माझं स्वप्न होतं जे आता पूर्ण झालं आहे. ज्या दिवशी ‘बिग बॉस मराठी 3’च्या घरात पाऊल टाकलं, त्याच दिवशी हे स्वप्न पाहिलं होतं. आनंद वाटतो की, उघड्या डोळ्यांनी पाहिलेलं स्वप्न, डोळे बंद केल्यावर दिसणारं ध्येय आज 100व्या दिवशी पूर्ण झालं. या सगळ्या यशात माझ्या कुटुंबाचा आणि प्रेक्षक वर्गाचा वाटा आहे.’

हेही वाचा :

Happy Birthday Salman Khan | एका सुपरहिट चित्रपटानंतर तब्बल 6 महिने रिकामा बसून राहिला सलमान खान! वाचा नेमकं काय झालं?

Sunny Leone | ‘शाब्दिक’ वादानंतर सारेगामा बॅकफूटवर, अखेर सनी लिओनच्या ‘मधुबन’ गाण्यात बदल होणार!

ज्या वडिलांच्या उपचारासाठी स्पर्धेत सहभागी झाला, नियतीने त्यांनाच हिरावून नेलं! India’s Best Dancer फेम संकेतला पितृशोक

Follow Us
सांगता सभेत मुख्यमंत्री फडणवीसांकडून अजित पवारांच्या कार्याचा गौरव
सांगता सभेत मुख्यमंत्री फडणवीसांकडून अजित पवारांच्या कार्याचा गौरव.
मध्य रेल्वे ठप्प! CSMTवर गाड्या रखडल्या, प्रवाशांचा संताप वाढला, नेमक
मध्य रेल्वे ठप्प! CSMTवर गाड्या रखडल्या, प्रवाशांचा संताप वाढला, नेमक.
माझ्यावर दुःखाचा डोंगर कोसळलाय, मात्र हे कटुसत्य...सभेत बोलताना सुनेत्
माझ्यावर दुःखाचा डोंगर कोसळलाय, मात्र हे कटुसत्य...सभेत बोलताना सुनेत्.
सुनेत्रा पवारांसाठी सुळे मैदानात; बारामतीकरांना भावनिक साद
सुनेत्रा पवारांसाठी सुळे मैदानात; बारामतीकरांना भावनिक साद.
...म्हणूनच दिल्लीत होणाऱ्या एका चर्चेत आवर्जून बारामतीचं नाव घेतलं,
...म्हणूनच दिल्लीत होणाऱ्या एका चर्चेत आवर्जून बारामतीचं नाव घेतलं,.
हवामानाच्या लहरीपणामुळे शेती उद्ध्वस्त; नाशिकमध्ये कांद्याचं नुकसान
हवामानाच्या लहरीपणामुळे शेती उद्ध्वस्त; नाशिकमध्ये कांद्याचं नुकसान.
छगन भुजबळ यांचं मोठं विधान, 'सुनेत्रा पवार मुख्यमंत्री होतील पण हे...
छगन भुजबळ यांचं मोठं विधान, 'सुनेत्रा पवार मुख्यमंत्री होतील पण हे....
महिला आरक्षणावरून अंधारेंचा मुख्यमंत्री फडणवीसांना सवाल
महिला आरक्षणावरून अंधारेंचा मुख्यमंत्री फडणवीसांना सवाल.
उद्धव ठाकरेंचं पश्चिम बंगाल निवडणूकीबाबत मोठं विधान
उद्धव ठाकरेंचं पश्चिम बंगाल निवडणूकीबाबत मोठं विधान.
जिथे जास्त बोली लागते तिथे नेते जातात, उद्धव ठाकरेंच मोठं विधान
जिथे जास्त बोली लागते तिथे नेते जातात, उद्धव ठाकरेंच मोठं विधान.